Ahilyanagar : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे 2 उमेदवार बेपत्ता, अपहरणाचा संशय व्यक्त

Ahilyanagar : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रिंगणात उतरलेले दोन उमेदवार अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खडबड उडाली आहे. गेल्या चोवीस तासांपासून उमेदवारांचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नसल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिली आहे. बेपत्ता झाल्याच्या या घटनेने केडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केडगाव भाग संवेदनशील मानला जात असल्याने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीच उमेदवारांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा गंभीर आरोप विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केला आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता झालेल्या दोन्ही उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात, तर दुसरा उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात निवडणुकीच्या मैदानात होता.

Pune : पुण्यात आंदेकर-मारणे कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्यानंतर टीकेचा भडका; अजित पवारांचे अजब स्पष्टीकरण, खापर नेमकं कोणावर फोडलं?

प्रभाग क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी बेपत्ता झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी थेट कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लावणाऱ्या या प्रकारामुळे लोकशाहीला आव्हान दिले जात असल्याचा आरोप होत आहेत. पोलीस प्रशासन पुढील कारवाई काय करणार? याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाची वेळ येण्याआधीच राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) थेट बिनविरोध विजय मिळवत जोरदार सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेतच राष्ट्रवादीचे खाते उघडले असून, विरोधकांना पहिल्याच टप्प्यात धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया सुरू झाली. अनेक प्रभागांत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हरकती घेतल्याने सुनावणी उशिरापर्यंत सुरू होती. एबी फॉर्मवरील खडाखोडी, कागदपत्रांतील त्रुटी यामुळे काही उमेदवार अडचणीत सापडले. या गोंधळातच प्रभाग क्रमांक ७ (ड – सर्वसाधारण) मधून मोठी अपडेट समोर आली.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कुमार वाकळे बबनराव आणि अपक्ष मुरलीधर कोलते रामा मात्र आज सकाळीच अपक्ष उमेदवार मुरलीधर कोलते यांनी आपला अर्ज माघारी घेतला, आणि त्यामुळे मैदानात एकमेव उमेदवार म्हणून कुमार वाकळे राहिले. परिणामी, कुमार वाकळे बिनविरोध निवडून आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला महापालिकेत पहिला विजय मिळाला आहे.

उमेदवारी माघारीच्या पहिल्याच दिवशी बिनविरोध विजय झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं खाते उघडलं असून निवडणुकीपूर्वीच राजकीय संदेश ठळक हा बिनविरोध विजय म्हणजे केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, तो आगामी महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरणार आहे. आता पुढील प्रभागांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *