Accident News : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! भरधाव पिकअपने भाविकांना चिरडले; ४ जागीच ठार; ५ जखमी

Accident News :  हिंगोलीमधून  एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम गावचे रहिवासी आहेत.

Sharad Pawar : डोलीतून गड सर केला, रायगडावर 'तुतारी'चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण

आज (२४, फेब्रुवारी) शनिवारचा दिवस असल्याने हे भाविक सिरसम येथून माळहिवरा पाटी येथील मारुतीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र या भीषण अपघातात  पाच जणांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी भाविकांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

जत-जांबोटी महामार्गावर भीषण अपघात..

 जत-जांबोटी राज्य महामार्गावरील मुगळखोडजवळ (ता. रायबाग) शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply