पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या १० लाख ५९ हजार शेतकऱ्यांना ८३६ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ४९७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २.६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. अन्य शेतकऱ्यांच्या खात्यावरही लवकरच मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे.
कृषी विभागाचे सहसंचालक आणि मुख्य सांख्यिक विनय कुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत राज्यात ९६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ४९७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २.६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
जालना, गोंदिया, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील १,४९,६४८ शेतकऱ्यांना ४७.४१ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.
महसूल-कृषी विभागाच्या समन्वयाचे यश
राज्यात सातबारा ऑनलाइन झाल्यामुळे ही योजनेची अंमलबजावणी वेगाने आणि पारदर्शी पद्धतीने करण्यात यश आले. ऑनलाइन सातबाराबरोबर पीकविमा संकेतस्थळ संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रमाची बचत झाली आहे. यापूर्वी सातबारा, आठ अ चुकीच्या पद्धतीने जोडले जायचे. क्षेत्र कमी असूनही जास्त क्षेत्रावर विमा काढला जायचा. चुकीच्या पद्धतीने अनुदान घेतले जायचे. या सर्व प्रकाराला आळा बसला आहे. त्यामुळे आता योग्य, पात्र शेतकऱ्याला विमा संरक्षणाचा लाभ मिळतो आहे.
राज्य देशात अव्वल
राज्यात कृषी विभागाच्या वतीने पंतप्रधान पीकविमा योजनेना राबविण्यात येते. ही योजना उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राज्याला कोची (केरळ) येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येते. देशात राबविण्यात येणाऱ्या पीकविमा योजनेत महाराष्ट्राचा सहभाग साधारणत: २० टक्केपर्यंत असतो. पीकविमा योजनेबाबत राज्यात सातत्याने नवनवीन सुधारणा केल्या जात आहेत.
आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या मदत जमा
मुंबई: नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ५० रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असून, या प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील ८ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम येत्या गुरुवारी जमा होणार आहे.
कर्जाचे नियमित हप्ते भरतात त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये इतका भत्ता देण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर करोनाच्या सावटामुळे राज्याच्या महसुलात घट आणि प्रशासकीय कामाकाजावरील विपरीत परिणाम यामुळे या योजनेची अंमलबजावणी झाली नाही.
सहकार विभागाने स्टेट बँकेला समन्वयक बँक म्हणून नेमले आहे. या प्रोत्साहन योजनेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर २५०० कोटी इतका निधी वर्ग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आणखी काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दुसरा टप्पा पुढील १० दिवसांत सुरू होणार आहे.
जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात.त्यांना ही प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये कर्ज घेणे-कर्ज फेडणे याबाबत एक चांगला पायंडा पाडण्यासाठी सहकार विभागाचा हा प्रयत्न आहे. – अनुपकुमार,अपर मुख्य सचिव, सहकार विभाग
‘ओला दुष्काळ जाहीर करा’
मुंबई: राज्यात सततच्या पावसाने शेतकऱ्यांची खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून अडचणीतील शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली.
शहर
- Mumbai Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी नकार, नवऱ्याचं क्रूर कृत्य, मुंबई हादरली
- Dombivli crime : डोंबिवलीत लोकलमध्ये मोबाईलची चोरी, हाताला फटका मारून चोरटा मोबाईल घेऊन पसार
- Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
- Tejas Express : मुंबईतून धावणार दोन स्पेशल तेजस एक्सप्रेस, जाणून घ्या तिकिट अन् मार्ग
महाराष्ट्र
- Dhule : प्रेमसंबंधामध्ये अडथळा, आईच्या साथीनं नवऱ्यानं डोक्यावर वार केला, पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन बायकोची हत्या; महाराष्ट्र हादरला
- Buldhana Crime : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती?; BJP कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण
- Ahilyanagar News : पावसाने रस्त्यावर चिखल, आदिवासी महिलेला प्रसुतीच्या कळा; उघड्यावर दिलं बाळाला जन्म
- Chhatrapati sambhajinagar : उद्योगपती लड्डांचा घात खास मित्रांनी केला, दरोडेखोरांना सगळं सांगितलं, संभाजीनगरात नेमकं काय घडलं?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट