पुणे/लोणावळा : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या मार्गावर वाहतूक नियंत्रणाची अद्ययावत यंत्रणा उभारणे आणि मार्ग आठपदरी करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. राजकीय नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर मार्गाशी संबंधित सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असल्या तरी यापूर्वीही या मार्गावर अपघात घडल्यानंतर वेळोवेळी योजना जाहीर झाल्या. मात्र, त्या कागदावरच राहिल्याचे वास्तव आहे. अतिवेग, मार्गिकांचे नियम धुडकाविणे, यंत्रणांचे दुर्लक्ष आणि पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने हा रस्ता असुरक्षित असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. उपग्रह आणि ड्रोन कॅमेर यांच्याशी संलग्न ‘इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) योजना लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महामार्गावरील अवजड वाहतूक तसेच वाहतूक कोंडीमुळे पडणारा ताण पाहता द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याची योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. मेटे यांच्या मृत्यूनंतर अपघातस्थळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
अतिवेग, मार्गिका सोडून वाहने चालविण्याच्या बेदरकार वृत्तीमुळे अपघात घडल्याचे निरीक्षणही अधिकाऱ्यांनी नोंदविले. २००१ मध्ये मुंबई-पुणे शहरांना जोडणारा द्रुतगती मार्ग सुरू झाला. द्रुतगती मार्गामुळे दोन शहरातील अंतर कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचला. मात्र, गेल्या २२ वर्षांत द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात शेकडो जणांचे बळी गेले आहेत. द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी आखलेल्या उपायोजना कागदावरच आहेत. अपघात रोखण्यासाठी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कामे दिली जातात. या संस्थांकडून अहवालही देण्यात येतो. मात्र, या अहवालातील उपाययोजना कागदावर आहेत. द्रुतगती मार्गावर झालेले बहुतांश अपघात मानवी चुका तसेच अतिवेगामुळे झाले आहेत.
वाहनांचा वेग ८० ते १०० किलोमीटर प्रतितास असावा, असा नियम आहे. मात्र, वाहनचालक नियम धुडकावून १२० ते २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवितात. भरधाव वाहनांवर महामार्ग पोलिसांकडून स्पीडगनद्वारे कारवाई करण्यात येते. मार्गिका सोडून वाहने चालविल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. अवजड वाहनचालक सर्रास मार्गिका सोडून जातात. यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याने द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी मार्ग खचला आहे. घाट क्षेत्रात कामे सुरू असताना त्याची माहिती देणारे फलक यंत्रणा वाहनचालकांना दिसेल अशा पद्धतीने लावत नाहीत. कामापासून काही अंतरावर लोखंडी कठडे लावणे गरजेचे आहे. मात्र, घाटक्षेत्रात ज्या ठिकाणी काम सुरू आहे. तेथे कठडे लावले जातात. अशा वेळी वाहनचालक मार्गिका सोडून वाहन पुढे नेतात. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. महामार्ग पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने वाहनचालक सर्रास नियम धुडकावतात. द्रुतगती मार्गावरील अपघातांमागे यंत्रणाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर