पिंपरी : खासगी जागेत सलग पाच वर्षे गणेशोत्सव साजरा केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांसाठी एकाच वेळी आवश्यक सर्व परवाने देण्यात येतील, अशी घोषणा पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी बैठकीत केली. उत्सवकाळात गणपती मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. दरम्यान, उत्सवाशी संबंधित निर्णय घेताना मंडळांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा मंडळांकडून व्यक्त करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत मुख्यालयात बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे आदी उपस्थित होते.
पाच वर्षासाठी एकदाच परवाने दिले जाणार –
यावर्षीपासून खासगी जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना एक वर्षाऐवजी पुढील पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. अशा मंडळांना पुढील पाच वर्षांपर्यंत अर्ज सादर करावे लागणार नाहीत. अटी शर्तीस अधीन राहून पुढील पाच वर्षासाठी पालिकेकडून एकदाच परवाने दिले जाणार आहेत.
मूर्ती संकलनासाठी फिरते रथ ठेवण्यात येतील –
शाडू मूर्ती, तुरटीच्या किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करावा. लाकूड, दगडांपासून बनविलेल्या पुनर्वापर करता येणाऱ्या मूर्तींचा वापर करावा. गणेश विसर्जनाच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसह सुरक्षा, अग्निशमन, आरोग्य सेवक, जीवरक्षक, मदतनीस, आपत्ती व्यवस्थापन पथकाची नेमणूक केली जाईल. आवश्यक ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्यात येतील. मूर्ती संकलनासाठी फिरते रथ ठेवण्यात येतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यंदा देशभक्तीपर देखावे करावेत –
नागरिकांनी निर्माल्य व पूजा साहित्य कुंडातच टाकावे. विसर्जनाच्या ठिकाणी कचरा, सजावटीचे व पूजेचे साहित्य जाळू नये, गणेश मंडळांनी आरोग्य, सामाजिक संदेश तसेच स्वच्छताविषयक जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभक्तीपर देखावे आणि कार्यक्रमाचे आयोजन करावे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी व्हावे, मंडळांनी जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मंडळांना विश्वासातही घेतले पाहिजे –
“गणेश मंडळांकडून जनजागृती करण्यासह अनेक बाबतीत अपेक्षा ठेवण्यात येतात. त्यानुसार मंडळांना विश्वासातही घेतले पाहिजे. समन्वय ठेवला पाहिजे. खासगी जागेतील मंडळांना परवाना देण्याच्या निर्णयांचा फायदा मोजक्याच मंडळांना होणार आहे. बहुसंख्य मंडळांना या निर्णयाचा उपयोग नाही. अटी, शर्ती निर्धारित करून सर्वच मंडळांना पाच वर्षांसाठी परवाने द्यायला हवेत. आगमन ते विसर्जन या उत्सव कालावधीत मंडळांना अनेक अडचणी येतात. त्याविषयी मंडळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा व्हायला हवी. महापालिकेने एकतर्फी निर्णय घेऊ नये आणि ते मंडळांवर लादू नयेत.” असे चिंचवडमधील गांधीपेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी म्हटले आहे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
- Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार
- Nagpur Crime : नागपूर हादरले; लग्न मंडपातच हत्या, दुसऱ्या घटनेत किरकोळ वादातून मित्राचा खून
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू