पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नातेसंबंधांत स्थिरतेपेक्षा ‎आत्मीयता बाळगावी

सार्वजनिक जीवनात मित्र शत्रू बनणे आणि शत्रू मित्र बनणे हे‎सामान्य आहे. जीवनात मोठी ध्येये साध्य करायची असल्यास स्थिर‎नातेसंबंधांचा काळ संपत आला आहे. आज तुमची असलेली व्यक्ती‎उद्या तुमच्या विरोधात असू शकते. तोच विरोधक कधीही पाठिंबा देऊ‎शकतो. संतांनी म्हटले आहे- ‘समय फिरे रिपु होई पीरिते।’ म्हणजे‎काळ बदलतो, शत्रूही तुमचा प्रिय बनतो. देवकीच्या लग्नात कंस खूप‎आनंदी होता. तो हुंड्याच्या वस्तू त्याच्या रथात भरत होता . त्याच्या‎बहिणीला व भावाला निरोप देत होता. तेवढ्यात आकाशवाणी झाली-‎"मूर्ख कंस, बहिणीच्या लग्नाबद्दल तू इतका आनंदी आहेस. तिचा‎आठवा मुलगा तुझ्या मृत्यूचे कारण बनेल.’ कंस रथावरून उडी‎मारतो. त्याच्या बहिणीला खाली फेकतो मारण्याचा प्रयत्न करतो. ही‎घटना दर्शवते की लोक किती लवकर बदलतात. नातेसंबंधांत स्थैर्य‎राखू शकत नाही. परंतु आत्मीयता ठेवू शकता. अन्यथा तुम्ही दुःखी‎राहाल. ‎‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नातेसंबंधांत स्थिरतेपेक्षा ‎आत्मीयता बाळगावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *