राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असंच चित्र दिसत आहे.
विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे -
भाजपा - राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
शिवसेना - आमश्या पाडवी, सचिन अहिर
राष्ट्रवादी - रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस - चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे.
काँग्रेसचा भाजपच्या मतांवर केलेला आक्षेप निवडणूक आयोगाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी फेटाळले असून हा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. दरम्यान काँग्रेसच्या आक्षेपावर भाजपची उत्तर देण्याची तयारी असून आम्ही रीतसर परवानगी काढली होती असं भाजपने सांगितलं आहे.
काँग्रेसच्या आक्षेपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक सुरू झाली आहे. काँग्रेसने आयोगाकडे तक्रारीचा मेल केला होता. आयोगाच्या निकालानंतर मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
शिवसेनेने आपल्या पहिल्या पसंतीच्या आमदाराला ३२ मतांचा कोटा दिला आहे. तर भाजपने ३० मतांचा, काँग्रेसने २९ आणि राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवारांसाठी २९ मतांचा कोटा ठरवल्याची माहिती आहे.
काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे.
सुधीर मुनगंटीवार : काँग्रेसला पराभव दिसत असल्याने त्यांच्याकडून आरोप केले जात आहेत
थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार असून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर काँग्रेसने आरोप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका इतर सहकाऱ्यांनी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
विधान परिषदेसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झाले आहे. ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रत्येकी २६ मतांची गरज आहे.
सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा मिळालेला नाही. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला शेवटचा अर्धा तास शिल्लक असतानाही सुप्रीम कोर्टाने सुनावणीवर निकाल जाहिर केला.
विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना विधानभवनात भेटीगाठींचा जोर वाढला आहे. कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांची घेतली भेट.
दुपारी 3 वाजेपर्यंत 279 जणांचं मतदान, अद्याप सहा आमदारांचं मतदान बाकी आहे. मतदानासाठी केवळ ५० मिनिटं उरली आहेत. राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच मतदान राहिलं आहे.
विधानपरिषद निवडणूक : दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 275 जणांचं मतदान, अद्याप दहा आमदारांचं मतदान बाकी
लक्ष्मण जगताप मतदानासाठी रुगणवाहिकेतून विधानभवनात दाखल झाले आहे. त्यांना काल ताप होता. मात्र जिद्दीने ते मतदान करण्यासाठी आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पक्षाप्रती त्यांच्या कमिटमेंटला आम्ही सलाम करतो, असं फडणवीस म्हणाले.
विधानपरिषद निवडणूक दुपारी १ वाजेपर्यंत एकूण मतदान २४६ पूर्ण
नाराजी सर्वांची दूर केली आहे. ५ वाजता चित्र स्पष्ट होईल. मतदान बाद होणार नाही याची काळजी घेतली आहे. वरिष्ठ नेते चर्चा करुन निर्णय घेत आहेत. अशी प्रतिक्रीया दत्ता भरणे यांनी यावेळी व्यक्त केली.
फोडाफोडीचं राजकारण यशस्वी होणार नाही, आमचा कोटा ठरवून आम्ही समीकरण योग्य जुळवलं आहे. मतांच्या समीकरणाचा फायदा मविआच्या सहाव्या उमेदवाराला. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी यावेळी दिली.
भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना आणण्यासाठी गेले आहेत. मात्र, मनसेने गृहीत धरु नये असे म्हटले आहे.
गोपिचंद पडळकर मतदानासाठी मुंबईत दाखल. पाचही जागेवर भाजपचे उमेदवार येणार असा दावा पडळकर यांनी केला. तसेच, पावसात कितीही भिजले तरीही निवडणुक जिंकणार नाही. पडळकरांचा राष्ट्रवादीला टोला. 161 आमदार युतीचे आहेत. चार तासात निकाल येईल. असंही पडकर म्हणाले.
विधानपरिषदेत मतदान करण्यासाठी रवी राणा हनुमार चालिसा घेऊन विधानभवनात दाखल. १०० टक्के शिवसेनेचे मतदार पडणार आहे. भाजपचे पाच उमेदवार निवडुण येणार. असा दावा त्यांनी यावेळी केला.
तसेच महाविकासआघाडीवर निशाणा साधत मतदान व्हाव यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. माझ्या घरी पोलिस पाठवण्यात आले. असा आरोप राणा यांनी केला.
अजित पवारांनी फोन केल्यानंतर मोहिते पाटील विधानभवनात दादांच्या भेटीला पोहोचले आहेत
भाजपाच्या ५० आमदारांनी मतदान केलं आहे. आत्तापर्यंत ६८ जणांचं मतदान पूर्ण झालं आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले. मतदान बाकी असलेले आमदार - धनंजय मुंडे, सरोज अहिरे, निलेश लंके, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते, छगन भुजबळ, सुमन पाटील, अशोक पवार
मतदानाला सुरुवात; १५ आमदारांनी नोंदवली मतं
मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या १५ मिनिटांत १५ आमदारांनी आपली मते नोंदवली आहेत. हरिभाऊ बागडे यांनी सर्वात आधी मतदान केलं आहे.तर आत्तापर्यंत भाजपाच्या आठ आमदारांनी मतदान केलं आहे. अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमर राजूरकर हे काँग्रेसचे पोलिंग एजंट आहे.
राष्ट्रवादीचे तीन आमदार अजूनही मुंबईत पोहोचले नाहीत!
राष्ट्रवादीचे 3 आमदार अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते-पाटील, आशुतोष काळे अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेलाही हे तिघे उशिरा पोहोचणार असं चित्र आहे.
मते देणार नसाल तर सरकार धोक्यात येईल; कॉंग्रेसने पहाटे दिला निर्वाणीचा इशारा
शिवसेनेकडे अतिरिक्त मते असतानाही ती हस्तांतरीत करण्याचा विचार नसेल तर आमचा उमेदवार पडू शकेल अन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यामुळे धोक्यात येईल असा निर्वाणीचा इशारा कॉंग्रेसने रात्रभर चाललेल्या चर्चांनंतर दिला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत अप्रत्यक्ष कमळबळ मिळावे यासाठी बाण जरा बोथट होताहेत काय असा थेट प्रश्नही कॉंग्रेसने केला आहे.विधानसभेच्या अध्यक्षाची निवड सतत पुढे ढकलली जाते आहे.शक्य असूनही मते दिली जात नाहीत हा प्रकार आहे तरी काय अशी संतप्त विचारणा पहाटे पहाटे केली गेली.
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड सिद्धिविनायकाच्या चरणी
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रसाद लाड देखील उपस्थित होते.
बविआचे आमदार क्षितीज ठाकूर अमेरिकेहून मुंबईत दाखल झाले आहेत. ते नालासोपारा मतदार संघाचे आमदार आहेत.
मुक्ता टिळक पुन्हा ऍम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना
निवडणुकीसाठी कसब्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाल्या पक्षाला गरज असल्यामुळे मी मतदानासाठी जात असल्याचे मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केलंय, मुक्ता टिळक या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत राज्यसभा निवडणुकी वेळीही मुक्ता टिळक या मुंबईला मतदानासाठी गेल्या होत्या त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचा विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं