नवी दिल्ली : साताऱ्यातील प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवल्याप्रकरणी दोन आठवडय़ांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
अफजल खानाच्या मूळ कबरीला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही. त्याभोवती उभारलेले बांधकाम वनखात्याच्या जमिनीवर झालेले असल्याने ते बेकायदा ठरते. हे अतिक्रमण हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली.
हे बांधकाम एका रात्रीत पाडण्यात आले असून आता अन्य बांधकाम पाडले जाऊ नये, असा मुद्दा अफजल खान स्मारक समितीच्या वतीने मांडण्यात आला.
राज्य सरकारने गुरुवारी पोलीस बंदोबस्तामध्ये अफजल खानच्या छोटय़ा कबरीच्या नजीक झालेले बांधकाम जमीनदोस्त केले गेले. मात्र, या बांधकामांसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानादेखील राज्य सरकारने कारवाई केली असल्याचा आक्षेप घेण्यात आला. या मुद्दय़ावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.
अतिक्रमण कोणत्या स्वरूपाचे होते, अतिक्रमण पाडताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती का व कशा पद्धतीने अतिक्रमण पाडण्यात आले, याची माहिती सातारा जिल्हाधिकारी व वन विभागाने द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
अफजलखानाच्या कबरीभोवती असलेले अतिक्रमण पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर कारवाई न झाल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाच्या अतिक्रमण पाडण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने अतिक्रमण पाडण्याची कृती योग्य असल्याचा युक्तिवाद न्यायालयात शुक्रवारी करण्यात आला.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं