जव्हारचा ज्ञात इतिहास इ. स. १२व्या शतकापर्यंत मागे जातो. प्राचीन महिकावतीच्या बखरीमधील ग्रामनामांमध्ये जव्हारचा उल्लेख यवसाहार प्रेक्षादिगण म्हणून आलेला आहे. इ. स. १२३९ मध्ये मुहंमदीन सरदाराने इथे हल्ला केला होता. तेव्हा इथे स्थानिक कोळी व आदिवासी लोकांचे राज्य होते. इ. स. १३व्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता. या आदिवासी राजांनी इ. स. १३४१ मध्ये दिल्लीच्या महम्मद तुघलकाचे मांडलिकत्व पत्करले होते. त्यानंतर इ. स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला. तेव्हाच्या राजाने शिवाजी महाराजांची भेट घेतलेले ठिकाण म्हणजे जव्हारमधील शिरपाचा माळ होय. इ. स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मात्र इथले राजे मोगलांच्या भीतीने तटस्थ राहिले. ५ जून १६७२ रोजी मोरोपंत पिंगळे यांनी जव्हार जिंकले. स्वातंत्र्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका मुकणे राजघराण्याचे संस्थान होते. २० मार्च १९४८ रोजी जव्हार संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले. या संस्थानाची साक्ष देणारा जय विलास पॅलेस म्हणजेच जव्हारचा राजवाडा आज विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे.
जव्हारमध्ये एकूण दोन राजवाडे आहेत. त्यापैकी जुना राजवाडा एसटी स्टँडजवळ असून नवीन राजवाडा जव्हार-विक्रमगड रस्त्यावर आहे. जुना राजवाडा राजे पतंगशहा यांनी बांधला असून नवीन राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी १९३८ ते १९४२ मध्ये बांधला आहे. त्यापैकी जुन्या राजवाड्याची वाताहत झाली असून नवीन राजवाडा जय विलास पॅलेस मात्र आजही सुस्थितीत आहे. अतिशय देखणी, भव्य आणि प्रशस्त अशी एक मजली वास्तू आहे. त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी ५० हजार रुपये इतका खर्च आला होता. या वास्तुसाठी वापरलेला दगड जव्हारपासून १५ किलोमीटरवरील साखरे या गावातून आणलेला आहे. या राजवाड्यात सध्या कुणीही वास्तव्य करत नाही. मुकणे राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत. वर्षातून अनेकदा ते येथे येत असतात. दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे दसऱ्याला इथे आल्यास ही वास्तू आतूनही पाहायचे भाग्य लाभू शकते. या पॅलेसच्या आवारात फेरफटका मारल्यास मागील बाजूच्या पॉइंटवरून जव्हारच्या परिसराचे अतिशय प्रेक्षणीय आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसते. पॅलेसमध्ये मुकणे राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे, प्राचीन वस्तू, झुंबर, तोफा, राजकुमारांची खेळणी इत्यादी आहेत. मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवलेले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्याची छायाचित्रेही काढता येतात. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. तसेच राजवाड्याच्या छतावरील घुमट्यांमधून सूर्यास्ताचे होणारे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते. हा राजवाडा उत्तर-मध्ययुगीन काळातील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून येथे लवकरच करमणुकीचे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.
इतिहासाची आवड असल्यास जुना राजवाडा पाहणे ही पर्वणी आहे. जुन्या राजवाड्याचा कोट आणि नगारखाना आपल्याला गतवैभवाची झलक देऊन जातो. जुन्या राजवाड्याचे कोरीव लाकडी स्तंभ, तुळया, राजे दिग्विजयसिंह व राणी प्रियंवदा यांची तैलचित्रे, तटबंदी, मनोरे, प्रवेशद्वाराची दगडी कमान अशा वास्तुविशेषांनी हा राजवाडा आजही अविस्मरणीय ठरतो. रयतेसाठी स्वखर्चाने धरण बांधणाऱ्या प्रजाप्रिय राजघराण्याने उभारलेला राजवाडा पाहणे एक पर्वणी आहे.
कसे जाल?
पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकापासून ४२ किमी अंतरावर आणि मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकापासून १०० किमी अंतरावर जव्हार आहे. इथे जाण्यासाठी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, डहाणू इथून एसटी बसेसची सोय आहे. जय विलास पॅलेसकडे (नवा राजवाडा) जाण्यासाठी, मुंबईकडून विक्रमगडकडे जाताना शिवनेरी ढाबा लागतो. तिथून पॅलेसकडे जायला उजवीकडे कच्चा रस्ता आहे. स्वतःच्या वाहनाने गेल्यास आजूबाजूला असणारी भूपतगड, कोपरा धबधबा, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा इत्यादी स्थळे पाहता येतील. जव्हारमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल उपलब्ध आहेत.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं