
जव्हारचा ज्ञात इतिहास इ. स. १२व्या शतकापर्यंत मागे जातो. प्राचीन महिकावतीच्या बखरीमधील ग्रामनामांमध्ये जव्हारचा उल्लेख यवसाहार प्रेक्षादिगण म्हणून आलेला आहे. इ. स. १२३९ मध्ये मुहंमदीन सरदाराने इथे हल्ला केला होता. तेव्हा इथे स्थानिक कोळी व आदिवासी लोकांचे राज्य होते. इ. स. १३व्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता. या आदिवासी राजांनी इ. स. १३४१ मध्ये दिल्लीच्या महम्मद तुघलकाचे मांडलिकत्व पत्करले होते. त्यानंतर इ. स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला. तेव्हाच्या राजाने शिवाजी महाराजांची भेट घेतलेले ठिकाण म्हणजे जव्हारमधील शिरपाचा माळ होय. इ. स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मात्र इथले राजे मोगलांच्या भीतीने तटस्थ राहिले. ५ जून १६७२ रोजी मोरोपंत पिंगळे यांनी जव्हार जिंकले. स्वातंत्र्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका मुकणे राजघराण्याचे संस्थान होते. २० मार्च १९४८ रोजी जव्हार संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले. या संस्थानाची साक्ष देणारा जय विलास पॅलेस म्हणजेच जव्हारचा राजवाडा आज विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे.
जव्हारमध्ये एकूण दोन राजवाडे आहेत. त्यापैकी जुना राजवाडा एसटी स्टँडजवळ असून नवीन राजवाडा जव्हार-विक्रमगड रस्त्यावर आहे. जुना राजवाडा राजे पतंगशहा यांनी बांधला असून नवीन राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी १९३८ ते १९४२ मध्ये बांधला आहे. त्यापैकी जुन्या राजवाड्याची वाताहत झाली असून नवीन राजवाडा जय विलास पॅलेस मात्र आजही सुस्थितीत आहे. अतिशय देखणी, भव्य आणि प्रशस्त अशी एक मजली वास्तू आहे. त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी ५० हजार रुपये इतका खर्च आला होता. या वास्तुसाठी वापरलेला दगड जव्हारपासून १५ किलोमीटरवरील साखरे या गावातून आणलेला आहे. या राजवाड्यात सध्या कुणीही वास्तव्य करत नाही. मुकणे राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत. वर्षातून अनेकदा ते येथे येत असतात. दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे दसऱ्याला इथे आल्यास ही वास्तू आतूनही पाहायचे भाग्य लाभू शकते. या पॅलेसच्या आवारात फेरफटका मारल्यास मागील बाजूच्या पॉइंटवरून जव्हारच्या परिसराचे अतिशय प्रेक्षणीय आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसते. पॅलेसमध्ये मुकणे राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे, प्राचीन वस्तू, झुंबर, तोफा, राजकुमारांची खेळणी इत्यादी आहेत. मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवलेले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्याची छायाचित्रेही काढता येतात. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. तसेच राजवाड्याच्या छतावरील घुमट्यांमधून सूर्यास्ताचे होणारे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते. हा राजवाडा उत्तर-मध्ययुगीन काळातील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून येथे लवकरच करमणुकीचे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.
इतिहासाची आवड असल्यास जुना राजवाडा पाहणे ही पर्वणी आहे. जुन्या राजवाड्याचा कोट आणि नगारखाना आपल्याला गतवैभवाची झलक देऊन जातो. जुन्या राजवाड्याचे कोरीव लाकडी स्तंभ, तुळया, राजे दिग्विजयसिंह व राणी प्रियंवदा यांची तैलचित्रे, तटबंदी, मनोरे, प्रवेशद्वाराची दगडी कमान अशा वास्तुविशेषांनी हा राजवाडा आजही अविस्मरणीय ठरतो. रयतेसाठी स्वखर्चाने धरण बांधणाऱ्या प्रजाप्रिय राजघराण्याने उभारलेला राजवाडा पाहणे एक पर्वणी आहे.
कसे जाल?
पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकापासून ४२ किमी अंतरावर आणि मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकापासून १०० किमी अंतरावर जव्हार आहे. इथे जाण्यासाठी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, डहाणू इथून एसटी बसेसची सोय आहे. जय विलास पॅलेसकडे (नवा राजवाडा) जाण्यासाठी, मुंबईकडून विक्रमगडकडे जाताना शिवनेरी ढाबा लागतो. तिथून पॅलेसकडे जायला उजवीकडे कच्चा रस्ता आहे. स्वतःच्या वाहनाने गेल्यास आजूबाजूला असणारी भूपतगड, कोपरा धबधबा, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा इत्यादी स्थळे पाहता येतील. जव्हारमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल उपलब्ध आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

