रोहित पवारांचा गौप्यस्फोट! विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावरून रोहित पवारांनी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. विलिनीकरण झाले असते, तर अजित पवारांनी डॉ. अमोल कोल्हे यांना एकत्रित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. “दादांची (अजित पवार) ही इच्छा होती आणि त्यांना पक्ष वाढवायचा होता,” असे रोहित पवार म्हणाले. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवारांनुसार, विलिनीकरणानंतर विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पत्ता कट होणार होता. डॉ. अमोल कोल्हे यांनीही यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या एबी फॉर्मवरून प्रश्न उपस्थित करत विलिनीकरणाच्या चर्चांना दुजोरा दिला होता. दरम्यान, सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा होणार नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे, तर सुप्रिया सुळे यांच्या देहबोलीतूनही विलिनीकरणाची आशा मावळल्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण अधिकच तापले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *