
रत्नागिरी : राज्यात मुसळधार पावसाचा धडाका सुरु असून रत्नागिरीलाही पावसाने झोडपले आहे. पावसाची संततधार सुरुच असल्याने काही ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. गोवा महामार्गावरील परशुराम घाटात (Parshuram Ghat) तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चौपदीकरणासाठी घाटाचे काम सुरु आहे. मात्र दरड कोसळल्याने घाटातील बांधकामावरही मोठा परिणाम झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून सूरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. वैभववाडीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर अधिक होता. यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी रेल्वे स्थानक परिसरातील रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. तब्बल एक ते दीड तास रेल्वे रुळावर पाणी साचले होते. मात्र, संध्याकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे रुळावरील पाणी ओसरले. त्यामुळे काहीकाळ विस्कळीत झालेली रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातली कोसळधार सुरुच असून सखल भागांत पाणी साचले आहे. महाड शहरातून वाहणारी सावित्री आणि गांधारी नदी पूर रेषा ओलांडून वाहू लागली आहे. महाड शहरामध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहरातील सखल भागात नदीचे पाणी शिरले आहे. नागरिक आपले सामान आणि वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपलं आहे.अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय. त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलेय. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापार्याची तारांबळ उडाली. अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर जवाहर चौकात पाणी शिरलं आहे, तर बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी साचलं आहे. कोदावली आणि अर्जुना नदिनं पात्र सोडल्यानं पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालीय.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. दोन दिवसांपासून उन-पावसाचा लपंडाव नवी मुंबईत सुरू होता. मात्र, आज नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळालाय. सकाळपासून 60 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस नवी मुंबईत बरसला असून मोरबे धरण क्षेत्रातही आज चांगला पाऊस पडला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




