
पुणे : पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संभाव्य दरडप्रवण, भूस्खलन होणाऱ्या अतिसंवेदनशील गावांची प्रशासकीय पातळीवर तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार धोक्याच्या ठिकाणावरील स्थानिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे. सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होत राहिल्यास कमी धोका असणाऱ्या गावातील नागरिकांचे देखील तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची दहा पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात माळीण येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत मदत व पुनर्वसन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य धोका असणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तत्पूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या विभागामार्फत स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ गावांना पावसाळय़ामध्ये धोका निर्माण होईल अशी शक्यता सर्वेक्षणाअंती व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या आठवडय़ात आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये संभाव्य धोका असणाऱ्या गावांमधील सुरक्षिततेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला आदेश दिले आहेत. हवामान विभागाने यंदाही सरासरीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांतील पाऊस पाहता प्रथम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दहा तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. तालुकानिहाय एका तुकडीत ५०० प्रशिक्षित अधिकारी, जवान, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गावांची पाहणी करून त्या गावात ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांना संबंधित गावांमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सलग तीन दिवस संततधार पाऊस झाल्यास तत्काळ स्थानिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सात तालुक्यांमधील धोकादायक गावांमध्ये स्वतंत्र तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. या तुकडय़ांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी संपर्क कक्ष स्थापन करम्ण्यात आला असून तुकडय़ांमधील संपर्क प्रमुखाने २४ तास संपर्कात रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तुकडय़ा तैनात करम्ण्यात आल्या असून प्रशासनातील सर्व विभागांना सूचना करण्यात आल्या असल्या, तरी स्थानिक पातळीवरील माहिती प्रशासनापर्यंत पोचण्यासाठी किंवा प्रशासकीय व्यक्ती घटनास्थळी पोचण्यापर्यंत कालावधी लागत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांनी परस्पर संपर्कात रहावे. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रालगत असणाऱ्या गावांनी आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करावे. त्यांचे सहकार्य लाभल्यास शासकीय पातळीवर प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




