मुंबई: पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का! १७ जुलैपर्यंत अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द

मुंबई: पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने १० जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत मुंबई–पुणे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. घाट विभागात सुरू असलेल्या दुरुस्ती आणि पुनर्स्थापना कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोणावळा–कर्जत घाट विभागात भूस्खलनानंतर रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अनेक रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, काही निवडक गाड्या पूर्ववत सुरू राहणार असून रद्द आणि सुरू असलेल्या गाड्यांची संपूर्ण यादी रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. प्रवाशांनी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ किंवा रेल्वे हेल्पलाइनवरून अद्ययावत माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *