मानसी वैद्य। कवयित्री4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

आपण नुकताच महिला दिन साजरा केला. त्यानिमित्तानं खूप काळ प्रसिद्धीपासून काहीशा दूर राहिलेल्या एका स्त्री लेखिकेच्या कथासंग्रहाबद्दल!
सोलापूरच्या साहित्यविश्वात कथा-लघुकथांसाठी ज्यांचं नाव फार आदरानं घेतलं जातं, त्या जयश्री आलूरकर! मी त्यांना कधीही भेटू शकले नाही, पण त्यांच्या कथांचा त्यांच्या पश्चात नुकताच आलेला हा संग्रह आणि लेखनातून का होईना आमची भेट झाली. पेशानं शिक्षिका असलेल्या आलूरकरबाईंनी ललना, वाङ्मयशोभा, दीपलक्ष्मी, संचार, विश्व समाचार इत्यादींमधून जवळपास 100 कथा लिहिल्या . शिवाय एक कादंबरी. पण तरीही त्या नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिल्या. साधारण 40 वर्ष जुना काळ उलगडणारा 20 कथांचा कथांजली हा त्यांचा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला.
मला आवडलेल्या काही कथांबद्दल सांगायचं, तर ‘तुकयाचे अभंग’ ही मला विशेष आवडलेली कथा. लहानगा तुकाराम, आई-वडिलांनी गरिबी असूनही शाळेत धाडलेला. बाईंकडून संत तुकारामांबद्दल नि त्यांच्या अभंगांबद्दल ऐकतो. अभंग म्हणजे कधीच भंग न पावणारं, असं ऐकून आपणही काहीतरी टिकून राहील असं, नष्ट न होणारं निखळ लिहावं असं वाटणारा छोटा तुकाराम, जेव्हा स्वतःच्या मनातल्या इच्छांची यादी आठवायला लागतो, तेव्हा मात्र त्याला गरिबीशी झगडणारे त्याचे आई-वडीलच आठवत राहतात. मग अभंग लिहिण्याच्या वही ऐवजी तो फार वेगळं काहीतरी घेतो. त्याच्या मायेनं भरलेल्या त्या कृतीइतकं ‘अभंग’ खरोखर दुसरं काय आहे? असंच वाचकाला वाटत राहतं.
‘हॅम्लेट आणि ऑथेल्लो’मधे दोन मैत्रिणींच्या आयुष्यात विचाररहित कृती आणि कृतीरहित विचार यामुळे घडलेली, सगळं बदलून टाकणारी उलथापालथ आणि तिचा त्या दोघींच्याही आयुष्यावर झालेला दूरगामी परिणाम मांडलेला आहे. या दोन मैत्रिणींच्या आयुष्याला बदलून टाकू शकणारे ‘जर-तर’ लेखिका वाचकांना दिसू देतात, कळू देतात, पण कथा संपते ती मात्र हे सगळं फार न खेचता आणि वाचकांना गोष्टीमधलं कारुण्य फक्त जाणवत राहतं.
‘आणि बाल्य गवसले’मधल्या शिक्षिकेला नव्याने बालवाडी शाळेत आलेला एक मुलगा संदीप इतरांहून वेगळाच, अकाली मोठा वाटत असतो. त्यामुळेच त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत घडलेली दुर्घटना समजून घेऊन, त्याच्या आई-वडिलांशी बोलल्यानंतरही त्याला पूर्णतः स्वीकारणं त्यांना जमत नसतं. कथेच्या शेवटी मात्र एक तरल लोभस प्रसंग येतो. आपल्या स्वतःवर विनोद करूनही समोरच्याला हसवू पाहणं, हे एका निरागस भाबडेपणाशिवाय जमत नाही. आणि तोच भाबडेपणा लहानग्या मेघाला हसवू पाहणाऱ्या संदीपच्या डोळ्यांत शिक्षिका पाहतात आणि त्यांच्या मनाचे सगळे बांध तुटून मायेचा प्रवाह त्या भाबड्या मुलाकरता त्यांच्या मनात वाहू लागतो!
कितीतरी सुंदर कथा आहेत. काहींमध्ये लेखिका एका त्रयस्थाच्या भूमिकेतून गोष्ट सांगतात तर काहींमध्ये स्वतःलाच त्या पात्राच्या जागी ठेवून. काही कथा प्रसंग उलगडतात, तर काही कालखंड. ‘एक होकार एक नकार’ सारखे मोजके अपवाद वगळता बहुतांश कथांमधून मला जाणवला तो कारुण्यभाव.
माणूस समोरच्याचं दुःख न अनुभवताही समजून घेतो, घेऊ शकतो. समोरच्या त्रासानं तो त्रस्त होतो आणि त्याच्या अश्रूंनी व्यथित होतो. ह्यातच त्याच्या माणूसपणाचे झरे लपलेले असतात आणि ते तेव्हाच मोकळेपणाने वाहतात. जेव्हा माणसाला करुणेचा अर्थ उमगलेला असतो. या कथांमधली पात्र काही जगावेगळी नाहीत. त्यांचे प्रश्नही जगावेगळे नाहीत. पण त्यांचं तसं नसणं हेच या कथांचं एक बलस्थान आहे. समाजातल्या साध्यासुध्या आणि नेहमीच्या भासणाऱ्या घटनांवरती नेमकं भाष्य करणाऱ्या सकस आणि दर्जेदार कथांचा हा अतिशय वाचनीय असा संग्रह आहे.
संबंधित कॉलमचे इतर भाग
मुक्तछंद:अंतिम क्षणी थोडे रंग आणि 'हायकू' घेऊन येणारा चंद्र; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...!
शहर
- Mumbai : मुंबईत गॅस टंचाईचं संकट, सिलिंडरसाठी रांगा, ब्लॅक मार्केट सुरू; 30 टक्के हॉटेल बंद
- Pune : पुण्यात 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; आरोपीची फाशीची शिक्षा हायकोर्टाकडून रद्द
- SSC Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर फुटलाच नाही; एडिट फीचरचा गैरवापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक, 18 वर्षीय तरुण अटकेत
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
महाराष्ट्र
गुन्हा
- Pune : पुण्यात मोठी कारवाई, टीप मिळताच पोलिसांचा सापळा, फॉर्च्युनर थांबताच 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
- एन. रघुरामन यांचा कॉलम:वृद्धांना घोटाळ्यांपासून वाचवण्याची वेळ आलीय
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्रत्येक व्यक्ती, परिस्थितीत ईश्वरास पाहायला हवे
- रश्मी बन्सल यांचा कॉलम :थोडीशी काळजी वाटणे चांगले,अवास्तव चिंता काय कामाची?
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
देश विदेश
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
- मुंबईत खलिस्तानी संघटनेच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे स्पष्ट.
- जागतिक संघर्षात होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढत, कच्चे तेल घेऊन ‘शेनलॉन्ग’ मुंबईत दाखल; भारताला तात्पुरता दिलासा.
























Subscribe to my channel



