
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही तर विचार आहे. शिवाजी महाराज यांनी सुरू केलेला स्वराज्य संघर्ष अजूनही सुरू आहे. स्वराज्याचा अर्थ फक्त शासन बदलणे नाही तर आपल्या धर्मानुसार सरकार चालणे असा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केले. मंदिर पुनर्निर्मितीचे काम शिवाजी महाराजांनी केले होते. या प्रकारचे काम आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. राममंदिर, काशी विश्वनाथ, सोमनाथ मंदिर ही त्याची उदाहरणे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे नऱ्हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाअंतर्गत सरकारवाड्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेेळी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रसाद लोढा, आमदार, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाहक प्रवीण दबडघाव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर यावेळी उपस्थित होते.
स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा हा शिवाजी महाराजांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचे काम या शिवसृष्टीद्वारे होईल. ही शिवसृष्टी आशियातील सर्वात मोठा ‘थीम पार्क’ ठरणार आहे. शिवसृष्टीचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल, असे अमित शाह यांनी सांगितले.
शाह म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवले. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज यांचा विचार देशभर पोहोचवला. ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ कार्य केले. शिवाजी महाराज यांच्या विचारासाठी पुरंदरे यांनी जगभरातून संदर्भ जमा केले. शिवरायांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी शिवरायांचा विचार सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवला. पुरंदरे यांनी हे काम केले नसते, तर शिवाजी महाराज यांची ओळख मोठ्या प्रमाणात देशभर पोहोचली नसती, पुरंदरे यांचे स्वप्न आज सत्यात उतरत आहे, याचा आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या कामासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




