
पुणे : पावसाळा संपल्यानंतर पुढे महिनाभर ओढे, नाल्यांमधून काही प्रमाणात पाणी वाहत असते. हे पाणी एक लाख वनराई बंधारे बांधून अडविण्याचा कृषी विभागाचा संकल्प आहे. लोकसहभागातून कच्चे बांध घालून अडविलेल्या या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामासाठी करण्याचा आणि जास्तीत-जास्त पाणी जमिनी मुरवून जलसंधारणाला गती देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जाणार आहे.
राज्यात पेरणी योग्य क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामातील क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर इतके आहे, तर रब्बी हंगामातील क्षेत्र ५१.२० लाख हेक्टर इतके आहे. खरिपाच्या तुलनेत रब्बीचे क्षेत्र खूपच कमी आहे. पिकाला पाणी देण्याची खात्रीशीर सोय नसल्यामुळे रब्बीचे क्षेत्र राज्यात कमी आहे. या रब्बीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या, तरीही सिंचनाच्या सोयींअभावी अपेक्षित यश मिळत नाही.
यंदा कृषी विभागाने राज्यातील सुमारे ८,५०० कृषी सहायकांना प्रत्येकी दहा वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्टे दिले आहे. त्याचे जिल्हानिहाय नियोजनही तयार करण्यात आले आहे. सिमेंट, रासायनिक खतांच्या रिकाम्या पोत्यांमध्ये, वाळू, माती, मुरुम भरून ओढे, नाल्यांचे वाहते प्रवाह अडविण्यात येणार आहेत. या वनराई बंधाऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर पाणी अडविले जाणार आहे. शिवाय पुढील दोन, अडीच महिने पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. रब्बीतील पिकांना किमान एक आणि जास्तीत-जास्त दोन पाण्याच्या पाळय़ा हमखास देता येईल, असे नियोजन सुरू आहे. राज्यभरात एक मोहीम म्हणून लोकसहभागातून आणि कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून हे बंधारे बांधले जाणार आहेत.
लोकसहभाग कळीचा मुद्दा
कृषी विभागाने प्रत्येक कृषी सहायकाला दहा बंधारे लोक सहभाग आणि कंपन्यांच्या सामाजिक दायित्व फंडातून बांधण्याचे उद्दिष्टय़ दिले असले, तरीही लोकसहभाग हा अडचणीचा विषय ठरणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे करण्यासाठी मजूर लागतात, ते शेतकरी श्रमदानासाठी कसे येणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे हे बंधारे कृषी सहायकांना आपल्या खिशातील पैसे मोजून बांधावे लागणार आहेत. सिमेंट, खतांची रिकामी पोत्यांसाठीही पदरमोड करावी लागणार आहे. शिवाय यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सिंचनाच्या पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही, असेही एक कृषी सहायकाने म्हटले आहे.
रब्बी हंगामातील क्षेत्र वाढीसाठी दरवर्षी नियोजन केले जाते. पण, पाण्याअभावी क्षेत्रात फारशी वाढ होत नाही. अखेरच्या टप्प्यात पिकांना पाणी कमी पडते. वनराई बंधारे बांधून किमान एक आणि जास्तीत-जास्त दोन पाण्याच्या पाळय़ा रब्बी पिकांना देता येतील, असे नियोजन आहे. दोन-अडीच महिने बंधाऱ्यांमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे जलसंधारणाचा हेतूही साध्य होणार आहे.
– विकास पाटील, संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण
राज्यात एक लाख वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून चांगला पाऊस पडत असला तरीही पावसाचे पडणारे पाणी वाहून जाते आणि फेब्रुवारी अखेरपासूनच टंचाई निर्माण होते, असे चित्र आहे. हे टाळण्यासाठी वनराई बंधारे उपयोगी ठरणार आहेत. लोकसहभागातून बंधारे बांधले जावेत, असे नियोजन आहे. बंधाऱ्यांसाठी सरकारकडून कोणताही निधी दिला जाणार नाही. – रवींद्र भोसले, संचालक, मृदा संधारण
शहर
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
- एलआयसीचे (LIC) कोट्यवधी रुपये धोक्यात! सेबीच्या कारवाईनंतर 'राजेश एक्स्पोर्ट्स'चा शेअर ९० टक्क्यांनी कोसळला.
- देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! टीएमसी काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी तयार; पण अभिषेक बॅनर्जींनी राहुल गांधींसमोर ठेवली 'ही' मोठी अट!
महाराष्ट्र
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
- एलआयसीचे (LIC) कोट्यवधी रुपये धोक्यात! सेबीच्या कारवाईनंतर 'राजेश एक्स्पोर्ट्स'चा शेअर ९० टक्क्यांनी कोसळला.
गुन्हा
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!

























Subscribe to my channel


