
जव्हारचा ज्ञात इतिहास इ. स. १२व्या शतकापर्यंत मागे जातो. प्राचीन महिकावतीच्या बखरीमधील ग्रामनामांमध्ये जव्हारचा उल्लेख यवसाहार प्रेक्षादिगण म्हणून आलेला आहे. इ. स. १२३९ मध्ये मुहंमदीन सरदाराने इथे हल्ला केला होता. तेव्हा इथे स्थानिक कोळी व आदिवासी लोकांचे राज्य होते. इ. स. १३व्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता. या आदिवासी राजांनी इ. स. १३४१ मध्ये दिल्लीच्या महम्मद तुघलकाचे मांडलिकत्व पत्करले होते. त्यानंतर इ. स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला. तेव्हाच्या राजाने शिवाजी महाराजांची भेट घेतलेले ठिकाण म्हणजे जव्हारमधील शिरपाचा माळ होय. इ. स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मात्र इथले राजे मोगलांच्या भीतीने तटस्थ राहिले. ५ जून १६७२ रोजी मोरोपंत पिंगळे यांनी जव्हार जिंकले. स्वातंत्र्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका मुकणे राजघराण्याचे संस्थान होते. २० मार्च १९४८ रोजी जव्हार संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले. या संस्थानाची साक्ष देणारा जय विलास पॅलेस म्हणजेच जव्हारचा राजवाडा आज विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे.
जव्हारमध्ये एकूण दोन राजवाडे आहेत. त्यापैकी जुना राजवाडा एसटी स्टँडजवळ असून नवीन राजवाडा जव्हार-विक्रमगड रस्त्यावर आहे. जुना राजवाडा राजे पतंगशहा यांनी बांधला असून नवीन राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी १९३८ ते १९४२ मध्ये बांधला आहे. त्यापैकी जुन्या राजवाड्याची वाताहत झाली असून नवीन राजवाडा जय विलास पॅलेस मात्र आजही सुस्थितीत आहे. अतिशय देखणी, भव्य आणि प्रशस्त अशी एक मजली वास्तू आहे. त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी ५० हजार रुपये इतका खर्च आला होता. या वास्तुसाठी वापरलेला दगड जव्हारपासून १५ किलोमीटरवरील साखरे या गावातून आणलेला आहे. या राजवाड्यात सध्या कुणीही वास्तव्य करत नाही. मुकणे राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत. वर्षातून अनेकदा ते येथे येत असतात. दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे दसऱ्याला इथे आल्यास ही वास्तू आतूनही पाहायचे भाग्य लाभू शकते. या पॅलेसच्या आवारात फेरफटका मारल्यास मागील बाजूच्या पॉइंटवरून जव्हारच्या परिसराचे अतिशय प्रेक्षणीय आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसते. पॅलेसमध्ये मुकणे राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे, प्राचीन वस्तू, झुंबर, तोफा, राजकुमारांची खेळणी इत्यादी आहेत. मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवलेले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्याची छायाचित्रेही काढता येतात. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. तसेच राजवाड्याच्या छतावरील घुमट्यांमधून सूर्यास्ताचे होणारे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते. हा राजवाडा उत्तर-मध्ययुगीन काळातील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून येथे लवकरच करमणुकीचे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.
इतिहासाची आवड असल्यास जुना राजवाडा पाहणे ही पर्वणी आहे. जुन्या राजवाड्याचा कोट आणि नगारखाना आपल्याला गतवैभवाची झलक देऊन जातो. जुन्या राजवाड्याचे कोरीव लाकडी स्तंभ, तुळया, राजे दिग्विजयसिंह व राणी प्रियंवदा यांची तैलचित्रे, तटबंदी, मनोरे, प्रवेशद्वाराची दगडी कमान अशा वास्तुविशेषांनी हा राजवाडा आजही अविस्मरणीय ठरतो. रयतेसाठी स्वखर्चाने धरण बांधणाऱ्या प्रजाप्रिय राजघराण्याने उभारलेला राजवाडा पाहणे एक पर्वणी आहे.
कसे जाल?
पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकापासून ४२ किमी अंतरावर आणि मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकापासून १०० किमी अंतरावर जव्हार आहे. इथे जाण्यासाठी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, डहाणू इथून एसटी बसेसची सोय आहे. जय विलास पॅलेसकडे (नवा राजवाडा) जाण्यासाठी, मुंबईकडून विक्रमगडकडे जाताना शिवनेरी ढाबा लागतो. तिथून पॅलेसकडे जायला उजवीकडे कच्चा रस्ता आहे. स्वतःच्या वाहनाने गेल्यास आजूबाजूला असणारी भूपतगड, कोपरा धबधबा, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा इत्यादी स्थळे पाहता येतील. जव्हारमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल उपलब्ध आहेत.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




