पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:विचार अन् वीरता जीवनात‎ दोन्ही टिकवून ठेवली पाहिजे‎

मनुष्याचे जीवन विलक्षण आहे. हे आईची कुशी आणि चितेची वेदी‎यांमधील अंतर आहे. तुम्ही पहिल्यांदा डोळे उघडता, तेव्हा स्वतःला‎आईच्या कुशीत पाहता. अनेक लोक आनंदी होतात. तुमच्या आगमनाचा‎उत्सव साजरा करतात . याबद्दल तुम्ही अनभिज्ञ असता, पण तुमचा जन्म‎झालेला असतो. जेव्हा या जगातून जाता, तेव्हा चितेपाशी अनेक लोक‎निरोप द्यायला येतात, त्या वेळीही आपण अनभिज्ञच असतो. आपण‎हतबलही असतो. पहिल्यांदा स्वतः आंघोळ करू शकलो नाही. शेवटच्या‎वेळीही दुसरेच आंघोळ घालून पाठवतात. तरीही माणूस गर्व करतो की,‎‘मी सर्वकाही करून दाखवेन’. म्हणूनच, जे काही कराल, त्यात विचार‎आणि वीरता दोन्ही टिकवून ठेवा. जे विचारवंत असतात, ते वीर नसतात‎आणि जे वीर असतात, ते विचारांपासून दूर राहतात. वाल्मीकी असे‎ऋषी होते, ज्यांना मुनींमधील ‘सिंह’ म्हटले गेले. त्यांना एकाच वेळी‎कोकिळा आणि सिंह अशा दोन्ही उपमा दिल्या गेल्या. वाल्मीकी हे या‎गोष्टीचे प्रतीक आहेत की, आपण जेवढे जगू, त्यात शौर्य, पराक्रम,‎चिंतन, विनम्रता, संस्कार आणि ‘माणूस’ असण्याचे भान कायम टिकून‎राहिले पाहिजे. ‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *