संसदेत महिलांचा सहभाग वाढवण्याची खंबीर समर्थकम्हणून, सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयकमंजूर झाले, तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता. 33%आरक्षण अपेक्षेपेक्षा कमी असले तरी, एक मार्ग मोकळाझाला हे महत्त्वाचे होते. पुढे त्यात वाढ होण्याची शक्यतानिर्माण होऊ शकते. पण यात एक अट होती. संसद आणिविधानसभांमध्ये महिला आरक्षण तेव्हाच लागू होईल,जेव्हा नवीन जनगणना पूर्ण होईल व लोकसंख्येच्या ताज्याआकडेवारीनुसार मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणारी‘मतदारसंघ पुनर्रचना’ (परिसीमन) प्रक्रियाही पार पडेल. या अटीमुळे आरक्षण लागू होण्याच्या कालमर्यादेबाबतचिंता निर्माण झाली. जनगणना आधीच दोन वर्षे लांबणीवर पडली होती आणि ती कधी सुरू होईल हे त्या वेळी स्पष्टनव्हते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेची अट तर अधिकच चिंताजनक होती. कारण ही प्रक्रिया यापूर्वीही दोनदा स्थगित करण्यात आली होती, जेणेकरून ज्या राज्यांनी कुटुंबनियोजन कार्यक्रमांच्या यशातून लोकसंख्या वाढ स्थिरकेली आहे, त्यांचे नुकसान होऊ नये. कोणतेही सरकारउत्तर आणि दक्षिण भारतामध्ये संघर्ष किंवा घटनात्मकसंकट ओढवून घेण्यास तयार नसल्यामुळे, 1976 मध्येचसंसदेतील जागांची संख्या ‘फ्रीझ’ करण्यात आली होती. आता सरकारने अचानक 16 एप्रिल रोजी संसदेचे विशेषअधिवेशन बोलावले आहे, जेणेकरून महिला आरक्षणलागू करण्याची प्रक्रिया जलद करता येईल आणि ती 2029च्या लोकसभा निवडणुकीशी जोडता येईल. विशेषअधिवेशनाची वेळ आणि अजेंडा हे दोन्ही चिंतेचे विषयआहेत. चिंतेचा पहिला विषय म्हणजे पश्चिम बंगाल आणितामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यानचविशेष अधिवेशन बोलावणे. या दोन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये29 एप्रिलपर्यंत मतदान पूर्ण होईल. हा महिला मतदारांनाआकर्षित करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंकाअनेकांना येत आहे. कारण हे विशेष अधिवेशननिवडणुकीनंतरही बोलावता आले असते. प. बंगालनिवडणुकीसंदर्भात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते, जिथेभाजप ‘आरपारची’ लढाई लढत आहे. महिला सक्षमीकरण हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्याचेफायदे अद्याप संबंधित वर्गालाही पूर्णपणे समजलेले नाहीत.निवडणुकीच्या प्रचाराच्या शिखरावर असताना त्याचेराजकीय हत्यारात रूपांतर करू नये. यामुळे अविश्वासवाढेल. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. विशेष अधिवेशनात केवळ ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा होईल. आरक्षण तर 2029 मध्येचप्रभावी होऊ शकेल. त्याच्या तीन वर्षे आधीच घोषणाकरण्याची घाई महिला आरक्षणाप्रति असलेल्यावचनबद्धतेपेक्षा मतांच्या राजकारणाचे प्रदर्शन अधिक करते.दुसरी मोठी चिंता म्हणजे महिला आरक्षण विधेयकातीलसुधारणा ही मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसीमन)जोडण्याबाबत आहे. कोणत्याही लोकशाही मानकांनुसार,मतदारसंघांची पुनर्रचना ताज्या जनगणनेशी संबंधितअसायला हवी. ही प्रक्रिया नुकतीच 1 एप्रिलपासून सुरूझाली आहे आणि राजकीय पक्षांना दिलेल्या माहितीनुसार,ती पूर्ण होण्यास 2029 पर्यंत किंवा त्याहून अधिक वेळ लागूशकतो. महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यादोन्हीसाठी इतकी प्रदीर्घ वाट पाहता येणार नाही, असासरकारचा तर्क आहे. म्हणूनच सरकारने दोन्ही गोष्टींनासध्याच्या जनगणना प्रक्रियेपासून वेगळे (डी-लिंक)करून, संसदेच्या जागांची संख्या मनमानी पद्धतीने 542वरून 813 करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संख्या नवीनसंसद भवनातील लोकसभेच्या एकूण आसनक्षमतेच्याजवळपास बरोबर आहे. यामागे असा तर्क दिला गेला आहेकी, दाक्षिणात्य राज्यांच्या खासदारांचे प्रमाण बदलणारनाही, त्यामुळे त्यांना आक्षेप नसावा. उत्तर भारतातीलराज्यांमध्ये वर्चस्व असलेल्या पक्षाला केवळ संख्याबळाचाफायदा करून देण्यासाठी जर लोकशाहीतील महिलांच्यासहभागाला ‘जुमला’ बनवले जात असेल, तर ती फारशीभूषणावह गोष्ट ठरणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) महिला सक्षमीकरण हा गंभीर मुद्दा आहे.याचे फायदे अद्याप संबंधित वर्गालानीटपणे समजलेले नाहीत. महिलाआरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. अधिवेशनात ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा केली जाईल.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



