संसदेत महिलांचा सहभाग वाढवण्याची खंबीर समर्थकम्हणून, सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयकमंजूर झाले, तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता. 33%आरक्षण अपेक्षेपेक्षा कमी असले तरी, एक मार्ग मोकळाझाला हे महत्त्वाचे होते. पुढे त्यात वाढ होण्याची शक्यतानिर्माण होऊ शकते. पण यात एक अट होती. संसद आणिविधानसभांमध्ये महिला आरक्षण तेव्हाच लागू होईल,जेव्हा नवीन जनगणना पूर्ण होईल व लोकसंख्येच्या ताज्याआकडेवारीनुसार मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणारी‘मतदारसंघ पुनर्रचना’ (परिसीमन) प्रक्रियाही पार पडेल. या अटीमुळे आरक्षण लागू होण्याच्या कालमर्यादेबाबतचिंता निर्माण झाली. जनगणना आधीच दोन वर्षे लांबणीवर पडली होती आणि ती कधी सुरू होईल हे त्या वेळी स्पष्टनव्हते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेची अट तर अधिकच चिंताजनक होती. कारण ही प्रक्रिया यापूर्वीही दोनदा स्थगित करण्यात आली होती, जेणेकरून ज्या राज्यांनी कुटुंबनियोजन कार्यक्रमांच्या यशातून लोकसंख्या वाढ स्थिरकेली आहे, त्यांचे नुकसान होऊ नये. कोणतेही सरकारउत्तर आणि दक्षिण भारतामध्ये संघर्ष किंवा घटनात्मकसंकट ओढवून घेण्यास तयार नसल्यामुळे, 1976 मध्येचसंसदेतील जागांची संख्या ‘फ्रीझ’ करण्यात आली होती. आता सरकारने अचानक 16 एप्रिल रोजी संसदेचे विशेषअधिवेशन बोलावले आहे, जेणेकरून महिला आरक्षणलागू करण्याची प्रक्रिया जलद करता येईल आणि ती 2029च्या लोकसभा निवडणुकीशी जोडता येईल. विशेषअधिवेशनाची वेळ आणि अजेंडा हे दोन्ही चिंतेचे विषयआहेत. चिंतेचा पहिला विषय म्हणजे पश्चिम बंगाल आणितामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यानचविशेष अधिवेशन बोलावणे. या दोन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये29 एप्रिलपर्यंत मतदान पूर्ण होईल. हा महिला मतदारांनाआकर्षित करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंकाअनेकांना येत आहे. कारण हे विशेष अधिवेशननिवडणुकीनंतरही बोलावता आले असते. प. बंगालनिवडणुकीसंदर्भात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते, जिथेभाजप ‘आरपारची’ लढाई लढत आहे. महिला सक्षमीकरण हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्याचेफायदे अद्याप संबंधित वर्गालाही पूर्णपणे समजलेले नाहीत.निवडणुकीच्या प्रचाराच्या शिखरावर असताना त्याचेराजकीय हत्यारात रूपांतर करू नये. यामुळे अविश्वासवाढेल. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. विशेष अधिवेशनात केवळ ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा होईल. आरक्षण तर 2029 मध्येचप्रभावी होऊ शकेल. त्याच्या तीन वर्षे आधीच घोषणाकरण्याची घाई महिला आरक्षणाप्रति असलेल्यावचनबद्धतेपेक्षा मतांच्या राजकारणाचे प्रदर्शन अधिक करते.दुसरी मोठी चिंता म्हणजे महिला आरक्षण विधेयकातीलसुधारणा ही मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसीमन)जोडण्याबाबत आहे. कोणत्याही लोकशाही मानकांनुसार,मतदारसंघांची पुनर्रचना ताज्या जनगणनेशी संबंधितअसायला हवी. ही प्रक्रिया नुकतीच 1 एप्रिलपासून सुरूझाली आहे आणि राजकीय पक्षांना दिलेल्या माहितीनुसार,ती पूर्ण होण्यास 2029 पर्यंत किंवा त्याहून अधिक वेळ लागूशकतो. महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यादोन्हीसाठी इतकी प्रदीर्घ वाट पाहता येणार नाही, असासरकारचा तर्क आहे. म्हणूनच सरकारने दोन्ही गोष्टींनासध्याच्या जनगणना प्रक्रियेपासून वेगळे (डी-लिंक)करून, संसदेच्या जागांची संख्या मनमानी पद्धतीने 542वरून 813 करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संख्या नवीनसंसद भवनातील लोकसभेच्या एकूण आसनक्षमतेच्याजवळपास बरोबर आहे. यामागे असा तर्क दिला गेला आहेकी, दाक्षिणात्य राज्यांच्या खासदारांचे प्रमाण बदलणारनाही, त्यामुळे त्यांना आक्षेप नसावा. उत्तर भारतातीलराज्यांमध्ये वर्चस्व असलेल्या पक्षाला केवळ संख्याबळाचाफायदा करून देण्यासाठी जर लोकशाहीतील महिलांच्यासहभागाला ‘जुमला’ बनवले जात असेल, तर ती फारशीभूषणावह गोष्ट ठरणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) महिला सक्षमीकरण हा गंभीर मुद्दा आहे.याचे फायदे अद्याप संबंधित वर्गालानीटपणे समजलेले नाहीत. महिलाआरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. अधिवेशनात ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा केली जाईल.
हे पण वाचा-
शहर
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
























Subscribe to my channel




