संसदेत महिलांचा सहभाग वाढवण्याची खंबीर समर्थकम्हणून, सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयकमंजूर झाले, तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता. 33%आरक्षण अपेक्षेपेक्षा कमी असले तरी, एक मार्ग मोकळाझाला हे महत्त्वाचे होते. पुढे त्यात वाढ होण्याची शक्यतानिर्माण होऊ शकते. पण यात एक अट होती. संसद आणिविधानसभांमध्ये महिला आरक्षण तेव्हाच लागू होईल,जेव्हा नवीन जनगणना पूर्ण होईल व लोकसंख्येच्या ताज्याआकडेवारीनुसार मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणारी‘मतदारसंघ पुनर्रचना’ (परिसीमन) प्रक्रियाही पार पडेल. या अटीमुळे आरक्षण लागू होण्याच्या कालमर्यादेबाबतचिंता निर्माण झाली. जनगणना आधीच दोन वर्षे लांबणीवर पडली होती आणि ती कधी सुरू होईल हे त्या वेळी स्पष्टनव्हते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेची अट तर अधिकच चिंताजनक होती. कारण ही प्रक्रिया यापूर्वीही दोनदा स्थगित करण्यात आली होती, जेणेकरून ज्या राज्यांनी कुटुंबनियोजन कार्यक्रमांच्या यशातून लोकसंख्या वाढ स्थिरकेली आहे, त्यांचे नुकसान होऊ नये. कोणतेही सरकारउत्तर आणि दक्षिण भारतामध्ये संघर्ष किंवा घटनात्मकसंकट ओढवून घेण्यास तयार नसल्यामुळे, 1976 मध्येचसंसदेतील जागांची संख्या ‘फ्रीझ’ करण्यात आली होती. आता सरकारने अचानक 16 एप्रिल रोजी संसदेचे विशेषअधिवेशन बोलावले आहे, जेणेकरून महिला आरक्षणलागू करण्याची प्रक्रिया जलद करता येईल आणि ती 2029च्या लोकसभा निवडणुकीशी जोडता येईल. विशेषअधिवेशनाची वेळ आणि अजेंडा हे दोन्ही चिंतेचे विषयआहेत. चिंतेचा पहिला विषय म्हणजे पश्चिम बंगाल आणितामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यानचविशेष अधिवेशन बोलावणे. या दोन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये29 एप्रिलपर्यंत मतदान पूर्ण होईल. हा महिला मतदारांनाआकर्षित करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंकाअनेकांना येत आहे. कारण हे विशेष अधिवेशननिवडणुकीनंतरही बोलावता आले असते. प. बंगालनिवडणुकीसंदर्भात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते, जिथेभाजप ‘आरपारची’ लढाई लढत आहे. महिला सक्षमीकरण हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्याचेफायदे अद्याप संबंधित वर्गालाही पूर्णपणे समजलेले नाहीत.निवडणुकीच्या प्रचाराच्या शिखरावर असताना त्याचेराजकीय हत्यारात रूपांतर करू नये. यामुळे अविश्वासवाढेल. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. विशेष अधिवेशनात केवळ ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा होईल. आरक्षण तर 2029 मध्येचप्रभावी होऊ शकेल. त्याच्या तीन वर्षे आधीच घोषणाकरण्याची घाई महिला आरक्षणाप्रति असलेल्यावचनबद्धतेपेक्षा मतांच्या राजकारणाचे प्रदर्शन अधिक करते.दुसरी मोठी चिंता म्हणजे महिला आरक्षण विधेयकातीलसुधारणा ही मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसीमन)जोडण्याबाबत आहे. कोणत्याही लोकशाही मानकांनुसार,मतदारसंघांची पुनर्रचना ताज्या जनगणनेशी संबंधितअसायला हवी. ही प्रक्रिया नुकतीच 1 एप्रिलपासून सुरूझाली आहे आणि राजकीय पक्षांना दिलेल्या माहितीनुसार,ती पूर्ण होण्यास 2029 पर्यंत किंवा त्याहून अधिक वेळ लागूशकतो. महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यादोन्हीसाठी इतकी प्रदीर्घ वाट पाहता येणार नाही, असासरकारचा तर्क आहे. म्हणूनच सरकारने दोन्ही गोष्टींनासध्याच्या जनगणना प्रक्रियेपासून वेगळे (डी-लिंक)करून, संसदेच्या जागांची संख्या मनमानी पद्धतीने 542वरून 813 करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संख्या नवीनसंसद भवनातील लोकसभेच्या एकूण आसनक्षमतेच्याजवळपास बरोबर आहे. यामागे असा तर्क दिला गेला आहेकी, दाक्षिणात्य राज्यांच्या खासदारांचे प्रमाण बदलणारनाही, त्यामुळे त्यांना आक्षेप नसावा. उत्तर भारतातीलराज्यांमध्ये वर्चस्व असलेल्या पक्षाला केवळ संख्याबळाचाफायदा करून देण्यासाठी जर लोकशाहीतील महिलांच्यासहभागाला ‘जुमला’ बनवले जात असेल, तर ती फारशीभूषणावह गोष्ट ठरणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) महिला सक्षमीकरण हा गंभीर मुद्दा आहे.याचे फायदे अद्याप संबंधित वर्गालानीटपणे समजलेले नाहीत. महिलाआरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. अधिवेशनात ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा केली जाईल.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




