IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचं बिगूल वाजलं आहे. स्पर्धा सुरु व्हायरला अवघे 2 दिवस बाकी असून क्रिकेट चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह पाहिला मिळतोय. यंदा आयपीएलचा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रात खेळवला जाणार आहे. एकूण 70 सामने खेळले जाणार असून मुंबईतल्या तीन आणि पुण्यातल्या एका स्टेडिअमवर हे सामने रंगतील.
कोरोनामुळे आयपीएल 2020 स्पर्धा UAE मध्ये खेळवण्यात आली. त्यानंतर 2021 (IPL 2021) चा हंगाम भारतात सुरु झाला पण संपला यूएईमध्ये. कोरोनामुळे आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवण्यात आला. पण यावेळी बीसीसीआयने (BCCI) खबरदारी म्हणून सर्व सामने एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये (IPL 2022) मोठे बदल पाहिला मिळणार आहेत.
1. आयपीएल कधी आणि कुठे सुरु होणार? आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात होईल गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) लढतीने. पहिला सामना 26 मार्च रोजी मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. या हंगामात एका दिवसात दोन सामने 12 वेळा खेळवले जाणार आहेत. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता आणि दुसरा सामना 7:30 वाजता खेळवला जाईल.
2. 10 संघांच्या समावेशानंतर आयपीएलचं स्वरूप काय? IPL 2022 मध्ये 10 संघांचा समावेश आहे. लखनौ सुपर जायंट्स (lucknow supergiants) आणि गुजरात टायटन्स (gujarat titans) पहिल्यांदाच सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. साखळी फेरीसाठी 10 संघांची 5-5 च्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. आयपीएलचे दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) वेगवेगळ्या गटात आहेत. सर्व संघ 14 सामने खेळणार असून साखळी फेरीत एकूण 70 सामने होणार आहेत. एका गटातील सर्व संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळतील. यानंतर दुसऱ्या गटातील एका संघाविरुद्ध दोन सामने आणि चार संघाविरुद्ध एक सामना खेळावा लागणार आहे.
उदा. चेन्नई सुपर किंग्जचा संघ त्यांच्या गटातील चार संघांविरुद्ध दोन सामने खेळणार आहे. याशिवाय अ गटातील मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन सामने आणि इतर चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. अशाप्रकारे चेन्नईचा संघाचे एकूण 14 साखळी सामने होतील.
3. लीग सामने कुठे खेळवले जातील? कोरोनाचा धोका लक्षात घेता, यावेळी साखळीतले सर्व सामने दोन शहरांच्या चार स्टेडिअमवर खेळवले जातील. मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामने होणार आहेत. तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामने होणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना विमानतळावर जाण्याची गरज भासणार नाही. खेळाडू स्टेडियम दरम्यान बसने प्रवास करू शकतील
4. यावेळी होम आणि अवे सामने होणार का? वानखेडे आणि डीवाय पाटील इथं प्रत्येकी चार सामने तर ब्रेबॉर्न आणि एमसीए स्टेडियमवर प्रत्येकी तीन सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे होम आणि अवे पद्धत यावेळी नसणार. मुंबईचा संघ 2019 नंतर पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे.
5. किती दिवस रंगणार स्पर्धा साखळी फेरीत एकूण 70 सामने खेळवले जातील. हे सामने 26 मार्च ते 22 मे या कालावधीत 58 दिवस चालतील. यानंतर चार प्लेऑफ (Play Off) सामने होतील. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. प्लेऑफचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही.
6. खेळाडू कोरोनाबाधित झाला तर? स्पर्धेदरम्यान, एखादा खेळाडू किंवा सदस्य कोरोना बाधित आढळल्यास त्याला सात दिवसांसाठी आयसोलेट केलं जाईल. या दरम्यान सहाव्या आणि सातव्या दिवशी त्याची कोविड चाचणी केली जाईल. संघाच्या बायो-बबलमध्ये सामील होण्यासाठी, त्याच्या 24 तासांच्या कालावधीत सलग दोन आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये निगेटीव्ह असाव्या लागतील.
7. कोरोनामुळे खेळाडू उपलब्ध नसल्यास काय? 12 सदस्य उपलब्ध असल्यास फ्रेंचायझीला आहे त्या 11 खेळाडूंसोबत खेळण्यास सांगितले जाईल. यामध्ये सात भारतीय खेळाडू आणि एक बदली खेळाडू असेल. एखाद्या संघाकडे किमान 12 खेळाडू उपलब्ध नसतील तर BCCI दुसऱ्या दिवशी तो सामना आयोजित करेल. तसं न झाल्यास हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल. तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम असेल.
8. आयपीएलमध्ये यंदा कोणते नवे नियम संघांना आता एका डावात एका ऐवजी दोन रिव्ह्यू मिळतील. कॅच आऊट झाल्यास नवीन फलंदाजाला पुढच्या चेंडूला सामोरे जावं लागेल. आतापर्यंत असं होतं की शॉट मारणाऱ्या खेळाडूने दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाला ओलांडलं तर दुसऱ्या टोकावरील फलंदाज स्ट्राइक रेट घेतो. नवीन करारात असं होणार नाही. जर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाज पुढच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइक घेणार नाही. तो दुसऱ्या टोकाला जाईल.
9. प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये परवानगी स्टेडियमच्या क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल
10. बायो-बबलमध्ये किती बदल झाला? नवीन नियम काय आहेत? यावेळी बायो बबलचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी खेळाडू आणि सदस्यांना सात दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. यावेळी तो कालवधी कमी करण्यात आला आहे. खेळाड आणि सदस्यांना यंदा फक्त तीन दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. तीन दिवसांच्या कालावधीत २४ तासांच्या अंतराने कोरोना चाचणी केली जाईल.
शहर
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
महाराष्ट्र
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



