CM Eknath Shinde : "मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्यासाठी गठित केलेल्या न्यायमूर्ती शिंदेंची समितीचा अहवाल सादर झाला आहे. या समितीने जवळपास दीड कोटी कागदपत्रे तपासली. त्यामध्ये जवळपास 11 हजार कुणबी नोंदी सापडल्या. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उद्यापासून तहसीलदारांमार्फत कुणबी दाखले देऊ. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला अवधी द्यावा, त्यांच्या प्रकृतीची काळजी सरकारला आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांन पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण आणि कुणबी दाखले शोधणे अशा दोन पातळीवर सरकारचं काम सुरु आहे. मराठा आंदोलकांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, शांतता राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
|
सध्या मराठा आंदोलन भरकटत चाललं आहे, दुसऱ्या दिशेला चाललं आहे. याचा विचार मनोज जरांगे पाटील आणि त्यांची टीम, तसेच सकल मराठा समाजाने करणे गरजेचं आहे. या आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे नेते आहेत, त्यांना सुद्धा विचार करण्याची वेळ आहे हे आंदोलक हिंसक का होत आहे, याच्या मागे कोण आहे, ज्या आत्महत्या होत आहेत त्या का होत आहेत? याचा विचार मराठा समाजातील नेत्यांनी करायला हवा. जे नेते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशा भावनेतून काम करत आहेत, त्यांना गावबंदी करुन, आपआपसात मतभेद होऊ लागले, संघर्ष होऊ लागला तर गालबोट लागेल. मराठा समाजाबाबत सहानुभूती आहे, शिस्तीची परंपरा आहे, देशाने शिस्त पाहिली, त्याला गालबोट लागेल. मराठा समाजाबाबत जी सहानुभूती आहे ती कमी होईल, त्यामुळे मराठा आंदोलन यापूर्वी शांततेने झाली त्याला आता गालबोट कोण लावतंय याचा विचार आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे, या पार्श्वभूमीवर उपसमितीची महत्वाची बैठक झाली. त्याला मी सुद्धा हजर होतो. या बैठकीत अतिशय तपशीलवार चर्चा झाली. त्यामध्ये न्यायमूर्ती शिंदेंची समिती जी सरकारने गठीत केली होती, जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी होती. त्यांनी प्रथम अहवाल सादर केला आहे. तो उद्या कॅबिनेट बैठकीत ठेवून स्वीकारला जाईल आणि पुढील प्रक्रिया करु. न्यायमूर्ती शिंदे समितीत जवळपास 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी झाली. त्यामध्ये ११ हजार ५३० कुणबी जुन्या नोंदी आढळल्या. त्या समितीने सविस्तर अहवाल सादर केला. फार जुने जुने रेकॉर्ड तपासले. त्यामध्ये काही रेकॉर्ड उर्दू आणि मोडी लिपितही आहेत. पुढे देखील त्यांनी हैदराबादमध्ये जुने पुरावे, नोंदी त्या कागपत्रांसाठी विनंती केली आहे. काही नोंदी सापडतील म्हणून दोन महिने सरकारकडे मुदत मागितली. या समितीने खूप चांगलं काम केलं. अनेक पुरावे तपासले. १५ -१६ पुरावे तपासले. त्यांनी डिटेलमध्ये काम केलं. सरकारने त्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
आम्ही विनंती केली आहे दोन महिन्यात अंतिम रिपोर्ट सादर केला. 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी झाली. 11 हजार 530 कुणबी जुन्या नोंदी सापडल्या ही समाधानाची बाब. कुणबी नोंदीच्या कागदपत्रांची तपासणी करुन प्रमाणपत्र देऊ.
सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ
दुसरा भाग - मराठा आरक्षण जे आहे सुप्रीम कोर्टात जे रद्द झालं, त्यावर सरकार काम करत आहे. क्यूरेटिव्ह पिटिशनने सुप्रीम कोर्टाने आमचं ऐकू असं सांगितलं तआहे. सरकारचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. आज मागासवर्ग समितीचे अध्यक्षही आजच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांची समिती काम करत आहे त्यांना जे आवश्यक आहे ते उपलब्ध करुन दिलं जाईल. रिजनवाईज काम करतील, त्यासाठी विविध संस्थांची मदत घेतली जाईल. इम्पिरिकल डाटा गोळा करुन मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी या क्यूरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून उपयुक्त ठरेल. कारण सुप्रीम कोर्टाने आपलं आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी काढल्या, त्या त्रुटी दूर करण्यासाठी देखील आज आम्ही नि. न्यायाधीश गायकवाड, न्यायाधीश भोसले साहेब आणि न्यायमूर्ती शिंदे साहेब यांची अॅडवायजरी.
तीन नि. न्यायमूर्तींची समिती
निवृत्त न्यायाधीश गायकवाड ,भोसले, शिंदे यांची तीन सदस्यांची समिती नेमली गेली आहे. ते मराठा आरक्षण जे टिकणारं असेल यावर काम करेल. सोबतच मागास आयोगाला सुद्धा मदत करेल. डेटा गोळा करण्यासाठी नामवंत संस्थांची मदत आम्ही घेणार आहोत. यामध्ये टाटा गोखले इन्स्टिट्यूट ची मदत घेऊ.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाला चालना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण दुर्दैवाने रद्द झाला. कोर्टाला आपण त्यावेळी कन्व्हिन्स करू शकले नाही. मी राजकारणात जाऊ इच्छित नाही. काही कागदपत्र गोळा करण्यासाठी तारखा मागितल्या गेल्या. अनेक गोष्टींना त्यावेळी उशीर झाला. क्युरेटिव्ह पिटीशन मध्ये त्रुटी दूर करण्याचा काम युद्ध पातळीवर करेल. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा काम आम्ही करू. मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी आणि आपले उपसमिती सदस्य आणि अधिकारी यांच्याशी उद्या चर्चा करतील.
मराठा समाजाला शांततेचं आवाहन
मराठा समाज शिस्तप्रिय आहे तरी काही लोक जाळपोळ तोडफोड सुरू आहे. मी विनंती मराठा समाजाला करतो की टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाचा विचार करा !!
आम्ही देणारे आहोत, दोन टप्यात एकीकडे कुणबी आरक्षण देण्याचं काम आणि दुसरीकडे क्युरेटिव्ह पिटीशनचं काम आम्ही करतोय.
मागणी कायदेशीर असली पाहिजे, कायद्याच्या चौकटीत बसणारी पाहिजे. जे होण्यासारखं आहे तेच आम्ही बोलतोय.
मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की थोडा वेळ सरकारला दिला पाहिजे. जस्टीस शिंदे चांगलं काम करतायत. जरांगे यांच्या तब्येतीची आम्हाला चिंता आहे. झटकन निर्णय आम्ही घेऊ शकणार नाही. ज्यांच्या कुणबी म्हणून जुन्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचं काम आपण करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला आहे. तातडीने त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचं काम केलं जाईल. शांततेचं आवाहन आम्ही सगळ्यांना करतो . जुन्या नोंदी समोर येत आहेत त्यामुळे काही वेळ आणखी द्यावे.
मागील सरकारचं अपयश
मागील सरकारचं अपयश आहे त्यांना मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयासमोर टिकवता आलं नाही. कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. हेमंत पाटील यांनी भावनेपोटी राजीनामा दिला असेल माझं त्यांच्याही बोलणं झालंय. हे आंदोलन भरकटत जात आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू