Biparjoy Cyclone : अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले. यावेळी वादळातील वाऱ्यांचा वेग १४५ किमी प्रतितास इतका होता, तर वादळ १५ किमी वेगाने पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून येथे सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. वादळ धडकण्याची प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ मागील दहा दिवसांपासून वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत होते. चक्रीवादळ दुपारी धडकण्याचा पूर्वीचा अंदाज होता. प्रत्यक्षात ते संध्याकाळी ते धडकण्यास सुरुवात झाली.
यावेळी वादळ जखाऊ बंदरापासून ७० किलोमीटर दूर समुद्रात होते. समुद्रातून वादळ पूर्णपणे जमिनीवर सरकण्यास किमान चार तास लागतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.
हे श्रेणी-३ मधील वादळ आहे. चक्रीवादळाच्या डोळ्याची, म्हणजेच केंद्रबिंदूची रुंदी ५० किलोमीटर आहे. हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने सरकताना वाऱ्याचा वेग वाढत जाईल, असे डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले. कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि जुनागड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
याशिवाय, पिके, घरे, रस्ते, वीजेचे खांब यांचेही नुकसान होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळाची पूर्वकल्पना असल्याने गुजरात सरकारने सुमारे एक लाखांहून अधिक जणांना सुरक्षितस्थळी आधीच हलविले होते.
यामुळे कोणतीही जीवित हानी न होण्याची आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे. वादळाच्या प्रभावामुळे आज सकाळपासूनच मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर उंच लाटा उसळत होत्या.
सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईतही समुद्रकिनारी जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली होती. वादळामुळे किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळला असून वादळी वाऱ्यांमुळे अनेक झाडे उन्मळून पडली.
तापमानबदलाचा परिणाम
बिपोरजॉय हे भारताला धडकणारे या वर्षातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे चक्रीवादळ आहे. हे वादळ पाकिस्तानातही घुसणार आहे. मागील काही दशकांत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १.२ अंश सेल्सिअसवरून १.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने अरबी समुद्रात तयार होणारी वादळे अधिक शक्तिशाली ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सरकारकडून आढावा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारीच्या उपायांचा आढावा घेतला. वादळाची पूर्वकल्पना असल्याने केंद्र आणि गुजरात सरकारने किनारपट्टीवर राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांची मिळून ३० पथके तैनात केली आहेत.
याशिवाय, राज्याच्या रस्ते आणि बांधकाम विभागाची ११५ पथके, वीज मंडळाची ३९७ पथके तैनात आहेत. याशिवाय, तिन्ही संरक्षण दलांची पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिक आणि हजारो जनावरांना सुरक्षितस्थळी हलविल्याने जीवित हानी होणार नाही, अशी सरकारला आशा आहे.
दीर्घकाळ टिकलेले वादळ
‘बिपोरजॉय’ हे अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ठरले असल्याचे भारतीय हवामान विभागाकडील नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. सहा जून रोजी पहाटे साडे पाच वाजता तयार झालेले हे वादळ दहा दिवस आणि बारा तासांपासून (गुरुवारी संध्याकाळपर्यंत) समुद्रांत घोंघावत आहे. आधीच्या नोंदीनुसार, २०१९ मध्ये तयार झालेले क्यार हे चक्रीवादळ नऊ दिवस १५ तास टिकले होते.
बिपोरजॉय’चा परिणाम
-
किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट
-
किनारपट्टीपासून १० किमीच्या अंतरावरील वीस गावांमधील लोक सुरक्षितस्थळी
-
वादळी वाऱ्यांमुळे २४० गावांमधील वीजपुरवठा खंडित
-
सखल भागांमध्ये पुराचा धोका, अनेक वृक्ष उन्मळून पडले
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं