कार्तिकी यात्रेसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आस घेऊन पंढरपूरकडे पायी चालत निघालेल्या वारक-यांच्या दिंडीत भरधाव वेगातील मोटार घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत मायलेकासह सात वारक-यांचा मृत्यू झाला. तर पाच वारकरी जखमी झाले. सांगोला-मिरज रस्त्यावर जुनोनी येथे सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यानिमित्ताने वारक-यांच्या दिंड्यांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी व आसपासच्या गावांतील वारक-यांच्या दिंडीवर काळाने घाला घातला असून अपघातात मोटारीने दिंडीत घुसून वारक-यांना अक्षरशः चिरडत गेल्याचे दिसून आले. रंजना बळवंत जाधव (वय ५५), सुनीता सुभाष काटे (वय ५५), शांताबाई सुभाष जाधव (वय ५०), सर्जेराव श्रीपती जाधव (वय ४५), शारदा आनंदा घोडके (वय ४०, सर्व रा. जठारवाडी), सुशीला पवार (वय ३५) आणि तिचा मुलगा गौरव पवार (वय १४, रा. वळिवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी या अपघातातील मृत वारक-यांची नावे आहेत. जखमींमध्ये मृत सुनीता काटे यांचे पती सुभाष केशव काटे (वय ६७) यांच्यासह अनिता गोपीनाथ जगदाळे (वय ६०), सरिता अरूण सियेकर (वय ४५), शानूबाई विलास सियेकर (वय ३५), अनिता सरदार जाधव (वय ५५) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगोला ग्रामीण रूग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
सांगोल्यापासून नजीकच असलेल्या जुनोनीजवळ वारकरी दिंडी आली असताना अचानकपणे पाठीमागून भरधाव वेगाने आलेली एमएच १३ डीई ७९३८ ही मोटार कारक चालकाचा ताबा सुटल्याने दिंडीत घुसली आणि वारक-यांना अक्षरशः चिरडत गेली. तेव्हा तेथे एकच हाहाःकार माजला.मोटारचालकाचे नाव तुकाराम दामू काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला) असे असून त्याच्या सोबत दिग्विजय मानसिंग सरदार (रा. पंढरपूर) हा होता. या दोघांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपुरात दरवर्षी आषाढी व कार्तिकीसह माघी आणि चैत्री अशा चार यात्रा होता. या यात्रांमध्ये लाखो वारकरी व भाविकांच्या दिंड्या पायी शेकडो मैल चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता दरवर्षी यात्रांमध्ये वारक-यांच्या दिंड्यांमध्ये मालमोटारी किंवा मोटार कार, टेम्पो घुसतात आणि त्यात निष्पाप वारक-यांचा बळी जातो. गेल्याच वर्षी सोलापूरजवळ मराठवाड्यातील वारक-यांच्या दिंडीमध्ये मालमोटार घुसली होती आणि त्यात १२ वारकरी मृत्युमुखी पडले होते. अशा जीवघेण्या घटना प्रत्येक वारीच्या वेळी घडतात. त्यामुळे वारक-यांची सुरक्षितता धोक्यात येते. अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होते. एकेका दिंडीमध्ये किमान शंभर ते सात-आठशे वारकरी असतात. सायंकाळी अंधारातही पायी चालत मार्गक्रमण केले जाते. यापूर्वी अशा दिंड्यांमध्ये वाहने घुसून झालेल्या बहुसंख्य दुर्घटना सायंकाळनंतर अंधारातच घडल्या आहेत. दिंड्यांची सुरक्षितता जपताना दिंडीप्रमुखाचीही जबाबदारी तेवढीच महत्वाची ठरते.
सायंकाळी अंधारात दिंडी थांबवावी आणि विश्रांती घेणे अपेक्षित असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. दिंडीच्या पुढे-मागे रस्ता सुरक्षितता म्हणून रिफ्लेक्टर लावलेले पोशाख परिधान केलेले सजग तरूण वारकरी नियुक्त करणे अपेक्षित आहे. परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष होते. वाहतुकीची वर्दळ जास्त असलेल्या किंवा धोकादायक अपघातप्रवण भागात किमान मोठ्या दिंड्यांसाठी तरी स्थानिक पोलिसांकडून वाहतूक नियमन होणे अपेक्षित आहे. मात्र त्याबाबत बेफिकीरपणा दाखविला जातो. त्यातूनच वारकरी दिंड्यांमध्ये बाहेरची बेदरकार वाहने घुसतात आणि वारक-यांना चिरडतात. या अपघातानंतर तरी रस्ते सुरक्षिततेविषयक प्रशासनासह वारकरी दिंडीप्रमुखांनी गांभीर्य न राहिल्यास पुढील काळात आणखी वारक-यांचे हकनाक बळी जाण्याचा प्रघात सुरूच राहील. सांगोल्याजवळील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारक-यांना वारसदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. अशी मदत आणखी कितीवेळा देण्याबरोबरच वारक-यांची सुरक्षितता जपण्यासाठी शासनाने उपाययोजना कृतीत आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा