ऑपरेशन सिंदूरच्या 88 व्या तासाला भारताने युद्धविराम करण्याची पाकिस्तानची विनंती मान्य करण्यात घाई केली होती की शहाणपण दाखवले होते? भारताने लढाई सुरू ठेवायला हवी होती का आणि ती कधीपर्यंत? अशा प्रकारचे प्रश्न अलीकडेच तेव्हा उपस्थित झाले, जेव्हा या ऑपरेशनवर स्वित्झर्लंडच्या एका संस्थेच्या ‘सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्सपेक्टिव्ह स्टडीज’साठी एका उच्चाधिकार गटाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालातील निष्कर्षांचे भारतात स्वागत झाले आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या दाव्यांच्या तुलनेत भारताचे हवाई सुरक्षेमध्ये निम्मेच नुकसान झाले. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युद्धविराम होईपर्यंत भारतीय हवाई दलाने शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे मोठे नुकसान केले होते आणि या संघर्षाचा शेवट पाकिस्तानी हवाई दलाच्या मुख्य तळांवर सलग अनेक जबरदस्त हल्ले करून करण्यात आला. अशा प्रकारे, हवाई हल्ल्यात स्पष्ट सरशी मिळवून भारताने पाकिस्तानला युद्धविरामाची विनंती करण्यास भाग पाडले. अहवालात असेही म्हटले आहे की, 10 मे 2025 च्या सकाळपर्यंत भारतीय हवाई दल पाकिस्तानी हवाई क्षेत्राच्या मोठ्या भागावर वर्चस्व मिळवण्यात यशस्वी झाले होते, असे दर्शवणारे पुरेसे पुरावे समोर आले आहेत. यामुळे भारताला शत्रूच्या पायाभूत सुविधांवर लांब पल्ल्यावरून हल्ले करत राहण्याच्या स्थितीत आणले होते. या अहवालाचे निष्कर्ष पाश्चात्त्य ‘थिंक टँक’कडून आलेल्या अहवालांच्या तुलनेत अधिक निष्पक्ष आणि स्पष्ट वाटतात. यामध्ये असेही म्हटले आहे की, 6/7 मे च्या रात्री पीएएफ बहावलपूर किंवा मुरिदकेवरील भारताच्या हल्ल्यांमध्ये अडथळा आणण्यात किंवा ते रोखण्यात यशस्वी ठरले नव्हते. अशा वेळी दोन प्रश्न लगेच समोर येतात. एक प्रश्न संशयवाद्यांकडून येतो, जे विचारतात की, आयएएफ आपल्याच क्षेत्रातून आतून हल्ले करत असताना त्यांनी हवाई क्षेत्रावर वर्चस्व मिळवले होते असे आपण म्हणू शकता का? परंतु वास्तव हे आहे की, आज बहुतेक युद्धे आणि विशेषतः हवाई युद्धे लांब पल्ल्यावरून लढली जात आहेत आणि तुम्हाला शत्रूच्या क्षेत्राच्या आतच काय, तर त्याच्या जवळ जाण्याचीही गरज नसते. दुसरा आणि मोठा प्रश्न तो आहे, जो आपण आधीच उपस्थित केला होता की, भारताने युद्धविराम खूप आधीच स्वीकारला का? अनेक गंभीर लोकही युद्धविरामाला घाईने घेतलेला निर्णय मानतात आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची जी संधी मिळाली होती, ती गमावली गेल्याबद्दल खेद व्यक्त करतात. याच्या उत्तरात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की, भारत आपला विजय कशा प्रकारे परिभाषित करणार होता आणि तो विजय कधी झाला असता? तो पीएएफच्या संपूर्ण विनाशाने झाला असता का? की 1971 मध्ये ढाक्यामध्ये जे झाले होते, तसे काही झाल्यावर तो विजय मानला गेला असता? 10 मेच्या संध्याकाळपासून भारत सांगत आला आहे की त्याची उद्दिष्टे पूर्ण झाली होती, युद्धात वर्चस्व त्याला मिळाले होते आणि युद्ध कधी थांबवायचे हे त्याच्या हातात होते. कोणत्याही युद्धाची व्याख्या प्रामुख्याने ते सुरू करणाऱ्या पक्षाच्या उद्दिष्टांवरूनच केली जावी. हा प्रश्न अटलबिहारी वाजपेयी यांनीही तेव्हा उपस्थित केला होता, जेव्हा जानेवारी 2002 मध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’ अंतर्गत सीमांवर लष्कराची तैनाती उच्च पातळीवर होती. देशाचा मूड पूर्णपणे तापलेला होता आणि तो आरपारच्या लढाईची मागणी करत होता. युद्ध हा पूर्णपणे राजकीय विषय असतो. तो ना भावनिक असतो, ना पूर्णपणे लष्करी. उद्दिष्टांची स्पष्टता नसल्यामुळे भारत ऑपरेशन पराक्रममध्ये अडकून राहिला होता. लष्कर पूर्णपणे तैनात करण्यात आले होते आणि ते दहा महिने ठाम राहिले. अखेरीस, काहीही साध्य न होता, थकल्यामुळे ते छावण्यांमध्ये परतले. भारताने तेव्हा एक संधी गमावली होती का? 1999 आणि 1971 मध्ये आपण स्पष्ट उद्दिष्टे ठेवली होती - कारगिलमधील पाकिस्तानच्या ताब्यातील क्षेत्र मुक्त करणे आणि बांगलादेशला स्वतंत्र करणे. 1999 मध्ये लढाई एलओसीच्या पलीकडे नेण्यासाठी लष्कराकडून जो दबाव होता, त्यासमोर वाजपेयी झुकले नाहीत. 1971 मध्ये पाकने पूर्वेकडे आत्मसमर्पण केले, तेव्हा इंदिरा गांधींनी पश्चिम सेक्टरमध्ये तातडीने युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. काही वर्तुळात हा शाश्वत वाद आणि खेद कायम आहे की इंदिराजींनी पश्चिम सेक्टरमध्ये ‘काम’ फत्ते केले नाही. परंतु त्यांच्यासमोर उद्दिष्टे स्पष्ट होती आणि त्यांनी 13 दिवसांच्या लढाईनंतर विजयाची घोषणा केली. युद्ध ही इतकी गंभीर बाब आहे की ती लष्करी जनरल्सवर सोडून चालत नाही. हा निर्णय राजकीय नेत्यांवर सोडला पाहिजे, जे परिस्थितीच्या व्यापक कॅनव्हासवर लक्ष ठेवून असतात.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) युद्ध कधी सुरू करायचे हे जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षा ते केव्हा, कधी व कसे संपवायचे हे समजणेही महत्वाचे आहे. युद्ध ही एक गंभीर बाब आहे जी केवळ सेनापतींच्या भरवशावर सोडता येत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel


88jl44? First time I’ve heard of it actually but I’m always up for trying a new site. Let’s see if it will become a good place for betting 88jl44.
Been using the sv368app myself. Good for keeping up with all my stuff on the go. I suggest you to download the app sv368app.
If you’re after the Bodog poker download, this is the place to get it. Easy peasy, and you’re playing in minutes. Check here to download download bodog poker.