मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती वर्दळ कमी करण्यासाठी, तसेच कल्याण – नवी मुंबई परस्परांना जोडण्यासाठी कळवा आणि ऐरोलीदरम्यान उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र या प्रकल्पाआड आलेल्या झोपडपट्टीमधील १०८० पैकी ८७१ प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतरास नकार दिला आहे. त्यामुळे ऐरोली – कळवा उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याचे स्वप्न धूसर बनले आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी भूसंपादनास विरोध केल्यामुळे प्रकल्प रखडल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) अधिकाऱ्यांनी दिली. या वादात आता स्थानिक लोकप्रतिनिधींनीही उडी घेतली आहे. हा उन्नत मार्ग डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा एमआरव्हीसीचा मानस होता. परंतु आता हा मुहूर्त हुकण्याचीच चिन्हे आहेत.
प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे – पनवेल ट्रान्स हार्बर सेवा सुरू करण्यात आली आहे. कल्याणहून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल पकडण्यासाठी ठाणे स्थानकात यावे लागते. त्यामुळे ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. प्रवाशांची वाढती वर्दळ कमी करण्यासाठी व कल्याण रेल्वेमार्ग नवी मुंबईला जोडण्यासाठी कळवा आणि ऐरोलीदरम्यान उन्नत रेल्वे मार्ग उभारण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला होता. डिसेंबर २०१६ मध्ये एमयूटीपी ३ योजनेला मंजुरी मिळाली. मात्र मार्गिकेच्या कामाला २०१८ पासून सुरुवात झाली. परंतु मार्गिकेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
मुकुंद आरयूबी, पारसिक बोगदा आणि कळव्याजवळच १०८० झोपडीधारक असून ते प्रकल्पाआड येत आहेत. त्यामुळे भांईंदरपाडा येथील एमएमआरडीएच्या जागेत त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १०८० पैकी २०९ झोपडीधारकांची पात्रता पडताळणी करण्यात आली. त्यांनी पुनर्वसनास होकारही दिला. मात्र स्थानिकांनी भूसंपादन आणि पुनर्वसनास केलेल्या विरोधामुळे ८७१ जणांची पात्रता पडताळणी रखडली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकल्प तीन वर्षांत म्हणजेच डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटल्यानंतर आणि मोकळी जमीन उपलब्ध झाल्यानंतरच उन्नत रेल्वे मार्गिका पूर्ण होईल. त्यासाठी तीन वर्षे लागतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
प्रकल्प खर्च वाढला
ऐरोली – कळवा उन्नत मार्गिका चार किलोमीटर लांबीची असून त्यासाठी ४७६ कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र प्रकल्प खर्च ५१९ कोटी ५६ लाख रुपयांवर पोहोचला आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण येथून थेट लोकलने कळवामार्गे ऐरोली, वाशी, पनवेलला जाणे शक्य होईल. त्यासाठी उन्नत मार्ग कळवा स्थानकाजवळ मुख्य मार्गाला जोडण्यात येणार आहे. कल्याण व्हाया कळवा ऐरोलीसाठीही दर दहा ते पंधरा मिनिटांनी लोकल उपलब्ध होऊ शकणार आहे.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर