फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा

बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे अनेकदा आपल्या गावी येऊन गेल्याचा धक्कादायक आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. ही माहिती सीआयडी कार्यालयाला कळवूनही पोलिसांनी त्याचा पत्ता का शोधला नाही, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या हेतूवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धनंजय देशमुख यांच्या मते, मागील सहा महिन्यांत तीन वेळा कृष्णा आंधळे गावात येऊन गेला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाला मिळाली होती आणि ती सीआयडीला कळवण्यात आली होती. सीआयडीनेही ही माहिती खरी असल्याचे मान्य केले होते. आरोपी हे सैतानी वृत्तीचे लोक असून, त्यांच्या समर्थकांकडून कुटुंबाला जीविताचा धोका असल्याची भीती देशमुख कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे लवकरात लवकर कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून त्याला जिल्हाभरात धिंड काढून अटक करण्याची मागणी केली आहे. हप्तेखोरी आणि वॉचमनला मारल्याचा विरोध केल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडसह पाच आरोपी अटकेत आहेत, मात्र कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *