Category: Latest news
सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:एकाच प्रकारच्या विध्वंसाची वेगवेगळी कारणे असू शकतात
मी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा(एनडीएमए) सदस्य राहिलो आहे. त्यामुळे मीनेपाळमधील संकटाकडे या विषयातील तज्ज्ञाच्यादृष्टिकोनातून पाहतो. जेव्हा हिमालयाच्या एखाद्या खोऱ्यातपाणी, चिखल आणि मोठे दगड अचानक खाली येतात,तेव्हा आपला पहिला अंदाज ढगफुटीचाच असतो. हे खरेआहे की, पर्वतीय भागात ढगफुटी ही एक सर्वसामान्यनैसर्गिक घटना आहे. यामुळे विनाशकारी पूर येतो. पणनेपाळच्या पार्श्वभूमीवर, हिमालयाच्या उंचावर नेमकेकाय घडत आहे, हे अधिक काळजीपूर्वक पाहिले पाहिजे. प्रत्येक अचानक येणारा पूर केवळ अतिवृष्टीमुळे येतनाही. कधीकधी त्याचा उगम खूप उंचावर असतो. तिथेबर्फ, खडक, पाणी, तापमान आणि गुरुत्वाकर्षण अशीकाही परिस्थिती निर्माण करतात, जी समजून घ्यायलाआपण अजून शिकत आहोत. फेब्रुवारी 2021 मध्ये उत्तराखंडमधील ऋषिगंगा-तपोवन आपत्तीने हे अत्यंत भयंकर पद्धतीने दाखवून दिले. ती हिवाळ्यातील एक स्वच्छ सकाळ होती. पण खोऱ्यात खूप उंचावर खडक आणि बर्फाचा एक मोठा भाग तुटला. तोवेगाने खाली आला आणि त्याचे एका विनाशकारी ढिगाऱ्याच्या प्रवाहात रूपांतर झाले. या घटनेत 200 हूनअधिक लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले. ऑक्टोबर2023 मध्ये सिक्कीममधील दक्षिण ल्होनाकच्या घटनेतएक वेगळीच प्रक्रिया पाहायला मिळाली. खूप जड ढिगाराहिमनदीच्या सरोवरात (ग्लेशियल लेक) पडला. यामुळेमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि पाणी अडवून ठेवणारानैसर्गिक अडथळा तुटला. यानंतर अत्यंत विनाशकारीवेगाने तिस्ता खोऱ्यात पूर आला. नेपाळची घटना याचाआणखी एक वेगळा प्रकार सांगते. सुरुवातीच्याअहवालांमध्ये भूकंपामुळे हिमनदी फुटण्याची शक्यतावर्तवण्यात आली होती. पण नंतरच्या वैज्ञानिकमूल्यांकनातून असे संकेत मिळाले की, हिमनदीफुटल्यामुळेच कदाचित भूकंपासारख्या हालचाली निर्माणझाल्या असाव्यात. उंच बर्फाळ पर्वतावरून खडक आणिबर्फाचा मोठा भाग तुटून वेगाने खाली पडला. यातून तयारझालेला ढिगारा आणि पाणी नदीच्या प्रवाहात मिसळले. यातीनही घटनांमधून एक महत्त्वाचा धडा मिळतो. खालीसारखाच दिसणारा विध्वंस असू शकतो, पण उंचावरत्याची कारणे अगदी वेगळी असू शकतात. आणखी एक नैसर्गिक घटना आहे, जिच्याबद्दललोकांमध्ये अधिक जागृती होण्याची गरज आहे. तीम्हणजे ‘पर्माफ्रॉस्ट’. ही अशी खडकाळ जमीन असते,जी किमान सलग दोन वर्षे गोठलेलीच असते. खूपउंचावरील भेगांमध्ये असलेला बर्फ पर्वताच्या खडकांनाएकमेकांशी जोडून ठेवण्यास मदत करू शकतो.तापमानातील बदल, वारंवार गोठण्याची आणिवितळण्याची प्रक्रिया, तसेच पर्माफ्रॉस्टची हळूहळू होणारीझीज या नैसर्गिक जोडणीला कमकुवत करू शकते. याचाअर्थ असा नाही की, हिमालयाचे पर्वत आता सगळीकडेतुटून पडणार आहेत. पण हवामान बदलाच्या काळातआपल्याला पर्वतांच्या स्थिरतेचाही गांभीर्याने अभ्यासकरावा लागेल. पाणी आणि ढिगारा खाली जाण्यासाठी सर्वात सोपारस्ता शोधतात. खोरी ही पाणी, बर्फ, दगड आणि गाळयांच्या अमर्याद ऊर्जेला एका मर्यादित मार्गात वळवतात.दुर्दैवाने, मानवी हालचालीही नेमक्या याच ठिकाणीहोतात. नद्यांच्या खोऱ्यालगत रस्ते बांधले जातात. याचनद्यांवरून पूल बांधले जातात. जलविद्युत प्रकल्पही याचखोऱ्यांवर अवलंबून असतात. पिढ्यान््पिढ्या गावेनद्यांच्या काठावरच वसलेली आहेत. भाविक, पर्यटकआणि ट्रेकिंग करणारेही याच मार्गावरून जातात. अशावेळी अनेक किलोमीटर दूर आणि हजारो मीटर उंचीवरसुरू झालेली आपत्ती अचानक या लोकांसाठी धोका बनूशकते. आपत्तीला खालपर्यंत आणू शकणारा हा संपूर्णखालचा प्रवाह (डाउनस्ट्रीम कॉरिडॉर) आपण समजूनघेण्याची गरज आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) प्रत्येक अचानक येणारा पूर केवळअतिवृष्टीमुळे येत नाही. कधी कधीत्याचा उगम खूप उंचावर असतो. तिथेबर्फ, खडक, पाणी, तापमान आणिगुरुत्वाकर्षण अशी काही परिस्थितीनिर्माण करतात, जी समजून घ्यायलाआपण अजून शिकत आहोत.
Continue Reading
