औरंगाबाद:गुढीपाडव्याला वडील दारु पिऊन आले; म्हणून मुलानं केली वडिलांची हत्या

औरंगाबाद: औरंगाबादेमध्ये हत्या  करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हत्येची घटना उघडकीस आल्यामुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. मुलाने वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडील दारु पिऊन घरी आल्यामुळे संतापलेल्या मुलाने लोखंडी दांड्याने आपल्याच वडिलांवर प्रहार केला आहे.

यामध्ये वडिलांचा जीव गेला असून, हत्या करणारा आरोपी मुलाचा सध्या शोध सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी वडिलांनी दारु प्यायलाने मुलाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. औरंगाबाद तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. कडुबा रामभाऊ घुगे असे त्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नानासाहेब कडुबा घुगे असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

आपल्याच वडिलांची मुलाने हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नानासाहेब घुगे याने जन्मदात्याची हत्या केल्यामुळे परिसर हादरुन गेला आहे. सणाच्या दिवशी कडुबा घुगे हे घरात दारु पिऊन आल्यामुळे नानासाहेब यास संताप अनावर झाला होता. रागाच्या भरामध्ये नानासाहेब याने लोखंडी घनाने आपल्या वडिलांच्या डोक्यात हल्ला केला आहे. हा हल्ला इतका जोरदार होता, की यामध्ये कडुबा घुगे यांचा जागीच जीव गेला आहे.

या धक्कादायक घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, वडिलांचा जीव घेणाऱ्या मुलाचा अद्याप शोध लागला नाही. सध्या पोलिस संशयित आरोपी असलेल्या मुलाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *