प्रियदर्शन यांचा कॉलम:शांततेतही हळूहळू एखादा‎प्रतिकार सामील असायला हवा‎

‎‎‎‎‎‎‎‎नेटफ्लिक्सवर सध्या सुरू असलेल्या ‘द नाइट एजंट’ या‎वेबसिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये थेट अमेरिकन ‎राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी संशय आणि आरोपांच्या‎भोवऱ्यात अडकले आहेत. असे समोर येते की, त्यांनी‎ आपल्या निवडणूक प्रचारासाठी अशा संशयास्पद‎ लोकांकडून पैसे घेतले आहेत, ज्यांचा संबंध दहशतवादी ‎स्फोटांशीदेखील आहे. अमेरिकेच्या मनोरंजन उद्योगात सध्या अशा आणखीही अनेक चित्रपट किंवा वेबसिरीज‎ आहेत, ज्यात सर्वोच्च स्तरावरील नेते, अधिकारी किंवा ‎गुप्तहेर स्वतःच्याच देशाशी गद्दारी करताना दिसतात.‎ ज्या अमेरिकेला जगातील सर्वात यशस्वी लोकशाही‎मानले जाते तिथे हे चित्रपट किंवा सिरीज बनत आहेत.‎साहजिकच, सामान्य अमेरिकन लोकांमध्ये लोकशाही‎प्रणालीतून आलेल्या नेतृत्वाबद्दल मोहभंग झाला आहे,‎ज्याची अभिव्यक्ती या कलाकृतींमध्ये दिसते. ट्रम्प यांच्या ‎‎काळात या व्यवस्थेत श्वेत वर्णद्वेष, लष्करी वर्चस्ववाद‎आणि कुंठित पुरुषार्थाचा जो नवा त्रिकोण विकसित‎होताना दिसतोय. इराणवरील अमेरिकन हल्ल्याच्या ‎‎पार्श्वभूमीवर ‘एपस्टीन फाइल्स’मधून समोर येणारे‎हादरवून टाकणारे सत्य सांगते की, आपण सभ्यतेच्या‎किती भयंकर ढोंगीपणाच्या काळात जगत आहोत.‎एपस्टीन फाइल्समधील नावांवर नजर टाकली तरी समजते‎की, जगातील शक्तिशाली लोक-जे राजकीय, आर्थिक‎आणि बौद्धिक निकष ठरवतात-तेसुद्धा या काळ्या आणि‎घृणास्पद यादीत सामील आहेत. असे असूनही कोणतीही‎व्यवस्था त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाहीये. उलट,‎ते स्वतःचे काळे कुकृत्य लपवण्यासाठी किंवा त्यांची चर्चा‎थंड करण्यासाठी इराणवर हल्ले करत आहेत, संसदेचे‎कामकाज ठप्प होऊ देत आहेत व प्रकरणे न्यायालयांत‎प्रलंबित असल्याची कारणे देत आहेत. परंतु, हे‎शक्तिशाली लोक एकमेकांचे मित्र बनून आहेत,‎एकमेकांच्या कृतींचे समर्थन करत आहेत आणि शांतपणे‎ही व्यवस्था अधिक मजबूत करत आहेत, जेणेकरून‎त्यांचा हा गड अधिक अभेद्य होईल. हे आधुनिक‎लोकशाहीचे अपयश आहे का? हे त्या अवाढव्य‎भांडवलशाहीचे विकृत रूप आहे का, जी पर्यायी‎व्यवस्थेअभावी स्वतःच्या अपरिहार्यतेचा अहंकार बाळगून‎सर्व प्रकारची पापे करत आहे? हे त्या नवीन चंगळवादी‎वृत्तीचे फळ आहे का, ज्यामध्ये सर्व काही उपभोग,‎मनोरंजन, वैयक्तिक समाधान आणि तृप्तीसाठीच आहे?‎हे प्रश्न वरवर सोपे वाटू शकतात, पण हे सत्य आहे की या‎सर्व व्यवस्था शेवटी जगाला तथाकथित विकासाच्या‎चकचकीत कागदात गुंडाळून युद्ध आणि विनाशाच्या‎उंबरठ्यावर घेऊन जात आहेत. या विनाशाच्या आधी जे‎काही उरले आहे ती एक भयंकर विषमता आहे. जगात‎नसेल तरी आपल्या देशात तर नक्कीच—जितके‎अब्जाधीश वाढत आहेत, तितकेच गरीबही वाढत चालले‎आहेत.‎ प्रश्न अजूनही आहेत. आपण या परिस्थितीतून सुटका‎करून घेऊ शकतो का? किंवा आपल्याला यातून सुटका‎करून घ्यायची तरी आहे का? आपल्या देशाच्या संदर्भात‎पाहिले तर एकीकडे विकासाची भुरळ घालणारी गोष्ट‎आहे, जिचे काही पैलू लखलखते बाजार, फ्लाय ओव्हर‎आणि विविध प्रकारच्या गाड्यांमध्ये दिसतात; तर‎दुसरीकडे कट्टरतावाद, धर्मांधता आणि द्वेषावर पोसल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जाणाऱ्या जातीयवादाकडे झुकणाऱ्या समाजाचे वास्तव‎आहे. ज्यामध्ये मंदिर-मशीद, दर्गा, बाबा, साधू-संत आणि‎मठ यांनाच सर्वाधिक चर्चा आणि मान्यता मिळत आहे.‎यांच्यात एक खाऊन-पिऊन सुखी असलेला असा ग्राहक‎वर्ग आहे, ज्याला सर्व ‘मलई’ स्वतःसाठीच हवी आहे.‎ हे भाष्य निराशाजनक वाटत असेल तर यात आशेचा‎किरण कुठे शोधायचा? नक्की तो कुठेतरी असेलच.‎कारण इतक्या जुन्या सभ्यता आणि संस्कृतीच्या रंध्रांमध्ये‎आजही इतका प्रकाश शिल्लक असतोच की तो एखादा‎रस्ता दाखवू शकेल. हा गांधींचा मार्ग आहे का? तो संयम‎आणि पश्चात्तापातून तयार होतो का? पण आपण त्या‎संयम व पश्चात्तापाच्या जवळपास तरी आहोत का? या‎शांततेतही एखादा प्रतिकार सामील असायला हवा. डॉ.‎लोहिया उगीच म्हणायचे नाहीत की, निराशेचीदेखील‎काही कर्तव्ये असतात!‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत‎ आहे.)‎ सभ्यतेच्या रंध्रांमध्ये आजही इतका प्रकाश‎शिल्लक असतोच की, तो एखादा रस्ता‎दाखवू शकेल. हा गांधींचा मार्ग आहे का?‎तो संयम आणि पश्चात्तापातून तयार होतो‎का? डॉ. लोहिया उगाच म्हणायचे नाहीत‎की, निराशेचीही काही कर्तव्ये असतात!‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *