Unseasonal Rain : राज्यामध्ये सर्वत्र जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसतोय. यामध्ये शेतातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना, रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे हिंगोलीतील पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील 500 मेट्रिक टन साखर या पावसामुळे भिजली आहे. पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात होता की, हे पाणी गोडाऊनमध्ये शिरेल याचा अंदाज सुद्धा कारखाना प्रशासनाला नव्हता. त्यामुळे हे साखरेचे नुकसान झाले आहे. 500 मेट्रिक टन साखर भिजल्यामुळे कारखान्याचे तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, गोडाऊनमध्ये सगळीकडे साखरेचा पाक पाहायला मिळत असून, यामुळे कारखान्याचे गाळप पूर्ववत चालू करण्यासाठी तब्बल 24 तासाचा कालावधी लागला आहे. तर, पुढील काही दिवस गाळप करताना याचा अडथळा सुद्धा होणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणत नुकसान होतांना पाहायला मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार स्वरूपाच्या होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कापूस, तूर, हरभरा, ज्वारी यासह भाजीपाला आणि फळ बागांना पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अनेक ठिकाणी ज्वारीचे पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. हिंगोलीच्या वाई गोरखनाथ येथील शेतकरी व्यंकटेश कदम यांनी यांच्या शेतात एक महिन्यापूर्वी ज्वारीच्या पिकाची पेरणी केली होती. या ज्वारीच्या पिकावर शेतातील गुरांच्या चाऱ्याचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे खाण्याचे नियोजन नियोजन असते. परंतु, या वादळी वारे आणि पावसामुळे संपूर्ण अडीच एकर जमिनीवरील ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले आहे.
|
शेतकऱ्याने साकारलेले स्वप्न धुळीस मिळाले...
नांदेड जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याने साकारलेले स्वप्न धुळीस मिळाले असल्याचे चित्र आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी लालबा जाधव या शेतकऱ्याच पपईची बाग वादळीवाऱ्यात आडवी झाल्याने पाच लाख रुपयांचा फटका बसलाय. लालबा जाधव यांनी त्यांच्या शेतीमध्ये एक एकर पपईची लागवड केली. या बागेसाठी मोठा खर्चही केला. मोठ्या कष्टाने बाग वाढवली. भाव यंदा दरवर्षीच्या तुलनेत चांगला असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित होते. दहा ते बारा टन माल काढणीस आला होता. त्यामुळे अंदाजे अडीच लाख रुपयांचा माल शेतात तयार होता. पण, अचानकपणे सोमवारी पहाटे वादळी वारा आणि पाऊस आल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गान हिरावून घेतला.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातील क्षेत्र घटले होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली होती. मात्र जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा पेरणी केलेल्या क्षेत्राला बसला आहे. शेतांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या गहू आणि हरभऱ्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा