Pune : ‘पुराचे पाणी शिरल्याने घरात सगळा चिखल झाला असून, आता पुन्हा सगळा संसार उभा करण्याशिवाय पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गृहोपयोगी वस्तू नव्याने घ्याव्या लागतील किंवा त्यांची दुरुस्ती करावी लागेल,’ कुटुंबियांसोबत घरात साचलेला चिखल काढताना अनिकेत गरूड सांगत होते; तर पुराच्या पाण्यामुळे किराणा दुकानातील सर्व वाण सामान, साहित्य भिजल्याने झालेल्या नुकसानाचा हिशोब करताना हताश झालेले नारायण प्रजापतीही ‘आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल,’ असे म्हणत होते...
मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडलेल्या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, निंबज नगर, विठ्ठल नगर परिसरातील नदीकाठच्या अनेक सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये मध्यरात्रीपासून पाणी साचण्यास सुरुवात झाली. पहाटेपर्यंत तळमजल्यावर असलेल्या सदनिका आणि पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने स्थानिक रहिवाशांची झोप उडाली. ‘पहाटे तीन वाजता पाणी शिरू लागले अन् पाहता पाहता पार्किंगमध्ये पाणीपातळी छातीपर्यंत वाढली. मध्यरात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे मोबाइलही ‘डिस्चार्ज’ आहे. वाहने अगोदरच लांब चौकात लावून ठेवल्याने वाचली,’ अशी ‘आपबीती’ श्रीगणेश अपार्टमेंटमध्ये राहणारे सुनील चव्हाण सांगत होते.
|
‘रात्रीपासून गेली वीज’
‘एकतानगरीतील इमारतीत पहिल्या मजल्यावर मी राहतो. रात्री दोन वाजल्यापासून वीज गेली. त्यानंतर लोकांचा आरडाओरडा ऐकू येत होता. पहाटेपर्यंत पार्किंगमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले. कुटुंबीय गावाला गेले असल्याने घरी मी एकटाच होतो. बचावकार्य करणाऱ्यांनी मला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. जनता वसाहतीत माझा दवाखाना असून, आता तिथेच मुक्काम करणार आहे,’ असे डॉ. कैलास चरखा यांनी सांगितले.
बोटीने सुरक्षितस्थळी आणले
पुणे महापालिका व ‘पीएमआरडीए’चे अग्निशमन दल, ‘एनडीआरएफ’, लष्कराच्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी नागरिकांच्या बचावासाठी एकतानगरी परिसरात तातडीने धाव घेतली. पाणी शिरलेल्या सोसायट्यांमध्ये अडकलेले ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना बोटीने सुरक्षित ठिकाणी आणले. शिवपुष्प पार्क चौकापासून एकतानगरीकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती.
‘प्रशासनाने ‘अलर्ट’ दिलाच नाही’
आनंद पार्क सोसायटीत राहणाऱ्या स्नेहल केसकर यांनी, प्रशासनाने आधीच माहिती न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही पहाटे साडेतीनपासून जागेच आहोत. पाणी शिरायला सुरुवात झाल्यावर सर्वप्रथम वाहने पार्किंगमधून काढून वरच्या चौकात लावली. साडेपाचच्या सुमारास जिन्यात पाणी आले. घरापासून अवघ्या पाच पायऱ्यांवर पाणी होते. संसारोपयोगी वस्तू कशा सांभाळायच्या, अशी चिंता सतावू लागली. धरणातून विसर्ग करताना पाणी शिरणार असेल, तर प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा दिला जातो. या वेळी काहीच सांगितले नाही. त्यामुळे अनेकांची धावपळ झाली,’ असे त्या म्हणाल्या. त्यावर ‘अग्निशमन दलाचे जवान वगळता महापालिका प्रशासन व अन्य आपत्ती यंत्रणा मदतीला आल्या नाहीत,’ असे वैभव काणेकर यांनी सांगितले.
तरुणांचे प्रसंगावधान
एकता नगर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक जण अडकले होते. त्यांना सुखरूप ठिकाणी जाता यावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते. सनसिटी रस्ता परिसरातील अजय शितोळे आणि त्याच्या मित्रांनी परिसरातील झाड आणि खांबांना दोरी बांधून पाण्यातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात दिला.
चहा, दूधपिशव्या, मेणबत्त्यांचे वाटप
मुसळधार पावसात गुडघाभर साचलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढत योगेश डांगरे हातातील पिशव्यांमध्ये असलेल्या थर्मासमधून बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कागदी कपात गरम चहा देत होते. ‘मी जवळच्या साईटेरेस सोसायटीत राहतो. नदीचे पाणी अचानक शिरल्याने आसपासच्या सोसायट्यांतील रहिवाशांना पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यांच्या सुटकेसाठी महापालिका व पोलिसांसह विविध सरकारी यंत्रणांचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. बचाव व मदतकार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना घोटभर चहा देण्यासाठी मी येथे आलो आहे,’ असे ते सांगत असताना बचाव कार्य कर्मचारी त्यांच्या हातातून चहाचा कप घेत धन्यवाद देत होते. ‘महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही हातात दूधाच्या पिशव्या आणि बिस्किटांचे पुडे वाटत होते. पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने घरात अडकलेल्या लोकांनी खिडकीतून दोरी लावून पिशव्या सोडल्या होत्या. त्यात दूध पिशव्या आणि बिस्किटांचे पुडे ठेवत आहोत,’ असे कर्मचारी गणेश सकट यांनी सांगितले. अनेक घरांमध्ये अंधार असल्याने नाश्ता व मेणबत्त्यांचेही वाटप करण्यात आले.
पहाटेच्या वेळेला पावसाचा, पाण्याचा आवाज येत होता. त्याच्या जोडीला लोकांचा आरडाओरडाही ऐकू येत होता. त्यामुळे काहीतरी संकट आल्याचा अंदाज आला. खिडकीतून पाहिल्यावर पाणी दिसले. त्यामुळे लोकांच्या मदतीसाठी जावे, या विचाराने इमारतीखाली आलो. मात्र, खाली आल्यावर माझी जीवनवाहिनी, भाजी विक्रीची हातगाडीच वाहून जात असल्याचे दिसले. त्यामुळे जिवाच्या आकांताने पाण्यातून पळत जाऊन हातगाडीपर्यंत पोहोचलो. छातीएवढ्या पाण्यातून हातगाडी पुन्हा घेऊन आलो. हातगाडी सुखरूप बाहेर काढल्याने जिवात जीव आला.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर