
लातूर : निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसले यामुळे १९९३ मधील भूकंपाच्या कटू आठवणींना उजाळा मिळाला आहे. गेला महिनाभरापासून निलंगा तालुक्यातील हासोरी गावात जमिनीखालून आवाज येत होता. जमीन हादरल्यासारखी स्थिती होते व हा आवाज म्हणजे भूकंपाचा धक्का आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यानंतर ग्रामस्थांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे तक्रार केली व प्रशासन आपले म्हणणे गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. आमदार अभिमन्यू पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे बोलणे करून दिले .फडणवीस यांनी प्रशासनाला या बाबी गांभीर्याने पाहा व लोकांच्या मनातील भीती दूर करा अशा सूचना केल्या. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र दिल्ली येथील दोन शास्त्रज्ञांचे पथक हासोरी परिसरात दाखल झाले व या पथकाने सर्व पाहणी केली. नोंदी घेतल्या.
भूकंपाच्या सूक्ष्म नोंदी व्हाव्यात यासाठी निलंगा तालुक्यातील औराद व औसा तालुक्यातील आशिव या गावात भूकंपमापन यंत्र बसवले व त्या यंत्रावर सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसल्याची नोंद झाल्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर अजयकुमार वर्मा यांनी सांगितले. १२ सप्टेंबर रोजी २.२ रिश्टर स्केलचा धक्का, १५ सप्टेंबर रोजी १.३ रिश्टर स्केलचा तर २३ सप्टेंबर रोजी २ रिश्टर स्केलचा धक्का बसल्याचे भूकंपमापक यंत्रात नोंद आहे. डॉक्टर अजयकुमार वर्मा यांनी लातूर हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या झोन -३ मध्ये येतो.
खबरदारी काय घ्याल?
तेरणा नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये थोडा भूकंपाचा धोका जाणवतो, नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे. भूकंपरोधक घरे बांधली पाहिजेत. पत्र्याचे घर असेल तर पत्र्यावर लाकूड अथवा दगड वजन म्हणून ठेवू नये किंवा घरामध्ये खुंटीला शेतातील अवजारे अडकवून ठेवू नयेत. त्यामुळे हानी होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. हासोरी परिसरात सुमारे पाच किलोमीटर जमिनीखालून भूगर्भात हालचाली होत्या, ज्या भागात पाण्याचा अतिउपसा होतो त्या भागात असे जमिनीखालून आवाज होऊ शकतात, त्यातील ते एक कारण आहे.
जमिनीत खाली केवळ पाच किलोमीटर अंतरावर हालचाली असल्यामुळे आवाज होता, त्या खालच्या बाजूला पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर या हालचाली झाल्या असत्या तर त्याचा तेवढा धोका किंवा गांभीर्य लोकांना जाणवले नसते असे वर्मा म्हणाले. ३० सप्टेंबर १९९३ ते २०२२ या कालावधीत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ५३ भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद आहे. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५, २००३ मध्ये ५, २००४ मध्ये ७ धक्के बसले. २०१२ ते २०२२ या काळात २१ धक्क्यांची नोंद भूकंपमापन यंत्रावरती आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यातच भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. १९९३ प्रमाणेच या वर्षी जास्त पाऊस होता त्यामुळे लोकांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भूकंपानंतर लातूर, उस्मानाबाद व सर्वच परिसरांत भूकंपरोधक घरे बांधली पाहिजेत यासाठी शासन आग्रही होते. लातूर व परिसरातील बांधकामांना परवानगी देताना बांधले जाणारे घर भूकंपरोधक आहे की नाही याची काळजी घेतली जात होती. ९३ चा भूकंप होऊन बराच कालावधी उलटून गेल्यामुळे ही काळजी घेण्याचे प्रशासन व जनता दोघेही विसरले. आता बांधकाम परवानगी न घेता करण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे ते भूकंपरोधक होत आहे की नाही हे पाहण्याची तसदी घेतली जात नाही.
शासनाच्या वतीने गरिबांना म्हाडा व विविध योजना अंतर्गत घरे बांधून दिली जातात ,बांधून दिली जाणारी घरे तरी भूकंपरोधक आहेत का ? याबाबत निश्चित माहिती सांगण्यास प्रशासन धजावत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की ही बांधकामे भूकंपरोधक होत नाहीत. आपल्याकडे बैल गेला आणि झोपा केला अशी सवय आहे. एखादी आपत्ती घडून गेल्यानंतर त्याची कारणमीमांसा सांगितली जाते व त्यानंतर लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते. प्रशासनाने आता तरी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या लोकांची सुरक्षितता गांभीर्याने घेतली पाहिजे. बांधली जाणारी घरे ही भूकंपरोधक आहेत का जे कच्चे बांधकाम आहेत त्यात लोक राहत आहेत का? याबाबतीत सर्वेक्षण करून लोकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
शहर
- मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! दहिसरमध्ये भव्य 'ट्रांसपोर्ट हब' उभारणार; खासगी ट्रॅव्हल्स बसेसना शहरात प्रवेशबंदी?
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- जरांगे पाटलांच्या नव्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! राज्यातील 'बोगस' कुणबी प्रमाणपत्रे रद्द होणार?
- ठाणे आरटीओची मोठी कारवाई! विशेष मोहिमेत २,३१७ चालकांची तपासणी; १४२ रिक्षाचालक 'मराठी'त नापास!
महाराष्ट्र
- नाशिक वन विभागात 'एसीबी'चा महाब्लास्ट! सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी लाच घेणारे तब्बल ८ कर्मचारी रंगेहात जाळ्यात.
- मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! दहिसरमध्ये भव्य 'ट्रांसपोर्ट हब' उभारणार; खासगी ट्रॅव्हल्स बसेसना शहरात प्रवेशबंदी?
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेपासून जंजिरा आणि सिंधुदुर्ग किल्ला राहणार बंद; प्रवासी बोट सेवा ३ महिने ठप्प!
गुन्हा
- प्रियकरासोबत रंगेहात पकडलं! संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं; बिहारमधील जमुई हादरलं.
- संतापजनक! बलात्काराच्या आरोपीवर थेट पुष्पवृषाव, जामिनावर सुटताच काढली 'हिरो'सारखी मिरवणूक; व्हिडिओ व्हायरल!
- मुंबई शिक्षण विभागात एसीबीचा मोठा दणका! लाचखोर लिपिक राहुल शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात.
- जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर धारदार चाकूने सपासप वार; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद.
राजकीय
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
इतर
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
मनोरंजन
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
- खलनायिकांची हातमिळवणी! अनिका आणि समायरा रचणार दुष्ट कारस्थान; कमळी अन् शर्वरी संकटात.
- "मी पीआर आणि मार्केटिंगमध्ये कमी पडले!" भूमिका चावलाने २५ वर्षांच्या अनुभवानंतर व्यक्त केली मनातील खंत!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.
- नराधमांना थेट धडा! महिलांच्या रक्षणासाठी महिला डॉक्टरचा अजब शोध; 'Rape-Axe' उपकरणाची जगभर चर्चा.
- भारतीय सैन्यात खळबळ! तब्बल ५० लाखांची लाच घेताना लष्कराच्या कर्नलला सीबीआयकडून अटक.
- भारताच्या शेजारी देशात गरिबीचा हाहाकार; ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
























Subscribe to my channel




