लातूर : निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसले यामुळे १९९३ मधील भूकंपाच्या कटू आठवणींना उजाळा मिळाला आहे. गेला महिनाभरापासून निलंगा तालुक्यातील हासोरी गावात जमिनीखालून आवाज येत होता. जमीन हादरल्यासारखी स्थिती होते व हा आवाज म्हणजे भूकंपाचा धक्का आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यानंतर ग्रामस्थांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे तक्रार केली व प्रशासन आपले म्हणणे गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. आमदार अभिमन्यू पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे बोलणे करून दिले .फडणवीस यांनी प्रशासनाला या बाबी गांभीर्याने पाहा व लोकांच्या मनातील भीती दूर करा अशा सूचना केल्या. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र दिल्ली येथील दोन शास्त्रज्ञांचे पथक हासोरी परिसरात दाखल झाले व या पथकाने सर्व पाहणी केली. नोंदी घेतल्या.
भूकंपाच्या सूक्ष्म नोंदी व्हाव्यात यासाठी निलंगा तालुक्यातील औराद व औसा तालुक्यातील आशिव या गावात भूकंपमापन यंत्र बसवले व त्या यंत्रावर सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसल्याची नोंद झाल्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर अजयकुमार वर्मा यांनी सांगितले. १२ सप्टेंबर रोजी २.२ रिश्टर स्केलचा धक्का, १५ सप्टेंबर रोजी १.३ रिश्टर स्केलचा तर २३ सप्टेंबर रोजी २ रिश्टर स्केलचा धक्का बसल्याचे भूकंपमापक यंत्रात नोंद आहे. डॉक्टर अजयकुमार वर्मा यांनी लातूर हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या झोन -३ मध्ये येतो.
खबरदारी काय घ्याल?
तेरणा नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये थोडा भूकंपाचा धोका जाणवतो, नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे. भूकंपरोधक घरे बांधली पाहिजेत. पत्र्याचे घर असेल तर पत्र्यावर लाकूड अथवा दगड वजन म्हणून ठेवू नये किंवा घरामध्ये खुंटीला शेतातील अवजारे अडकवून ठेवू नयेत. त्यामुळे हानी होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. हासोरी परिसरात सुमारे पाच किलोमीटर जमिनीखालून भूगर्भात हालचाली होत्या, ज्या भागात पाण्याचा अतिउपसा होतो त्या भागात असे जमिनीखालून आवाज होऊ शकतात, त्यातील ते एक कारण आहे.
जमिनीत खाली केवळ पाच किलोमीटर अंतरावर हालचाली असल्यामुळे आवाज होता, त्या खालच्या बाजूला पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर या हालचाली झाल्या असत्या तर त्याचा तेवढा धोका किंवा गांभीर्य लोकांना जाणवले नसते असे वर्मा म्हणाले. ३० सप्टेंबर १९९३ ते २०२२ या कालावधीत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ५३ भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद आहे. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५, २००३ मध्ये ५, २००४ मध्ये ७ धक्के बसले. २०१२ ते २०२२ या काळात २१ धक्क्यांची नोंद भूकंपमापन यंत्रावरती आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यातच भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. १९९३ प्रमाणेच या वर्षी जास्त पाऊस होता त्यामुळे लोकांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भूकंपानंतर लातूर, उस्मानाबाद व सर्वच परिसरांत भूकंपरोधक घरे बांधली पाहिजेत यासाठी शासन आग्रही होते. लातूर व परिसरातील बांधकामांना परवानगी देताना बांधले जाणारे घर भूकंपरोधक आहे की नाही याची काळजी घेतली जात होती. ९३ चा भूकंप होऊन बराच कालावधी उलटून गेल्यामुळे ही काळजी घेण्याचे प्रशासन व जनता दोघेही विसरले. आता बांधकाम परवानगी न घेता करण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे ते भूकंपरोधक होत आहे की नाही हे पाहण्याची तसदी घेतली जात नाही.
शासनाच्या वतीने गरिबांना म्हाडा व विविध योजना अंतर्गत घरे बांधून दिली जातात ,बांधून दिली जाणारी घरे तरी भूकंपरोधक आहेत का ? याबाबत निश्चित माहिती सांगण्यास प्रशासन धजावत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की ही बांधकामे भूकंपरोधक होत नाहीत. आपल्याकडे बैल गेला आणि झोपा केला अशी सवय आहे. एखादी आपत्ती घडून गेल्यानंतर त्याची कारणमीमांसा सांगितली जाते व त्यानंतर लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते. प्रशासनाने आता तरी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या लोकांची सुरक्षितता गांभीर्याने घेतली पाहिजे. बांधली जाणारी घरे ही भूकंपरोधक आहेत का जे कच्चे बांधकाम आहेत त्यात लोक राहत आहेत का? याबाबतीत सर्वेक्षण करून लोकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा