पुणे : करोनाकाळानंतर यंदा पहिल्यांदाच शेती उत्पादन मुबलक येणार असून गेल्या पाच वर्षांतील विक्रमी आकडा गाठण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, पावसाचे बिघडलेले चक्र या पार्श्वभूमीवर देखील शेतकऱ्यांनी नियोजन करीत उत्पादनाचा उच्चांक गाठण्यासाठी कष्ट केले आहेत.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी देशातील कृषी उत्पादनाविषयीचा चौथा सुधारित अंदाज जाहीर केला. या वेळी तोमर म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा २५ दशलक्ष टनांनी अन्नधान्याचे उत्पादन जास्त होणार आहे. प्रामुख्याने तांदूळ, मका, हरभरा, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, मोहरीसह अन्य तेलबिया आणि उसाच्या उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. केंद्र सरकारचे शेतीपूरक धोरण आणि शेतकऱ्यांच्या कष्टाच्या जोरावर हे विक्रमी उत्पादन निघत आहे.’’
चौथ्या सुधारित अंदाजानुसार अन्नधान्यांचे ३१५.७२ दशलक्ष टन उत्पादन होईल. त्यात तांदूळ १३०.२९ दशलक्ष टन आणि गव्हाचे १०६.८४ दशलक्ष टन उत्पादन होईल. भरड धान्याचे उत्पादन ५०.९० दशलक्ष टन, मका ३३.६२ दशलक्ष टन, डाळी २७.६९ दशलक्ष टन, तूर ४.३४ दशलक्ष टन, हरभरा १३.७५ दशलक्ष टन, तेलबिया ३७.७० दशलक्ष टन, भुईमूग १०.११ दशलक्ष टन, सोयाबीन १२.९९ दशलक्ष टन, मोहरी ११.७५ दशलक्ष टन, ऊस ४३१.८१ दशलक्ष टन, कापूस ३१.२० दशलक्ष गाठी (एका गाठ १७० किलो), ज्यूट (ताग) आणि मेस्ता १०.३२ दशलक्ष गाठींच्या (एक गाठ १८० किलो) उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उसाचे काय?
उसाचा विचार करता देशात २०२१-२२मध्ये उसाचे ४३१.८१ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशात उसाचे सरासरी उत्पादन ३७३.४६ दशलक्ष टन होते. यंदा त्यात ५८.३५ दशलक्ष टनांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कापूस मात्र..
देशात यंदा ३१२.०३ दशलक्ष गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे उत्पादन मागील वर्षांपेक्षा कमी आहे. मागील वर्षी (२०२०-२१) ३५२.४८ दशलक्ष गाठींचे उत्पादन झाले होते. अतिवृष्टी, अवेळी पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून कमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष काय? देशात २०२१-२२ या वर्षांत अन्नधान्याचे विक्रमी ३१५.७२ दशलक्ष टन उत्पादन होईल, हे गेल्या वर्षीपेक्षा ४.९८ दशलक्ष टनांनी जास्त असेल, असा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्तविला आहे.
तांदूळ उच्चांकी..
२०२१-२२ या वर्षांत विक्रमी तांदूळ उत्पादनाचा अंदाज आहे. सुमारे १३०.२९ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या १३.८५ दशलक्ष टनांनी अधिक उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी ११६.८४ दशलक्ष टन उत्पादन होत आहे.
शहर
- Mumbai Water : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २४ तास पाणीपुरवठा बंद, पाहा कोणत्या भागांना बसणार फटका
- KEM Hospital : मांडीवर अन् पाठीवर हात टाकला, वरिष्ठ डॉक्टरावर ६ महिला डॉक्टरांचा विनयभंगाचा आरोप
- Mumbai Local : केबल चोरली, लोकल थांबली! कसारा ते कल्याण वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल, एक्स्प्रेसही रखडल्या
- Today Weather Update : नागरिकांनो काळजी घ्या! आज सूर्यदेव आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट
महाराष्ट्र
- Raigad News: श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू, २ सख्ख्या भावांनी गमावला जीव
- Amravati Crime : 'तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन' ६२ वर्षीय पोस्टमॅनकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- Supriya Sule : 'तो अहवाल जाळून टाका'; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया
- Gold-Silver Price Hike: सोनं-चांदीला पुन्हा लखाखी! ६ दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांची वाढ, चांदीही महागली
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे