पुणे : पावसाळा संपल्यानंतर पुढे महिनाभर ओढे, नाल्यांमधून काही प्रमाणात पाणी वाहत असते. हे पाणी एक लाख वनराई बंधारे बांधून अडविण्याचा कृषी विभागाचा संकल्प आहे. लोकसहभागातून कच्चे बांध घालून अडविलेल्या या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामासाठी करण्याचा आणि जास्तीत-जास्त पाणी जमिनी मुरवून जलसंधारणाला गती देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जाणार आहे.
राज्यात पेरणी योग्य क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामातील क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर इतके आहे, तर रब्बी हंगामातील क्षेत्र ५१.२० लाख हेक्टर इतके आहे. खरिपाच्या तुलनेत रब्बीचे क्षेत्र खूपच कमी आहे. पिकाला पाणी देण्याची खात्रीशीर सोय नसल्यामुळे रब्बीचे क्षेत्र राज्यात कमी आहे. या रब्बीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या, तरीही सिंचनाच्या सोयींअभावी अपेक्षित यश मिळत नाही.
यंदा कृषी विभागाने राज्यातील सुमारे ८,५०० कृषी सहायकांना प्रत्येकी दहा वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्टे दिले आहे. त्याचे जिल्हानिहाय नियोजनही तयार करण्यात आले आहे. सिमेंट, रासायनिक खतांच्या रिकाम्या पोत्यांमध्ये, वाळू, माती, मुरुम भरून ओढे, नाल्यांचे वाहते प्रवाह अडविण्यात येणार आहेत. या वनराई बंधाऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर पाणी अडविले जाणार आहे. शिवाय पुढील दोन, अडीच महिने पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. रब्बीतील पिकांना किमान एक आणि जास्तीत-जास्त दोन पाण्याच्या पाळय़ा हमखास देता येईल, असे नियोजन सुरू आहे. राज्यभरात एक मोहीम म्हणून लोकसहभागातून आणि कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून हे बंधारे बांधले जाणार आहेत.
लोकसहभाग कळीचा मुद्दा
कृषी विभागाने प्रत्येक कृषी सहायकाला दहा बंधारे लोक सहभाग आणि कंपन्यांच्या सामाजिक दायित्व फंडातून बांधण्याचे उद्दिष्टय़ दिले असले, तरीही लोकसहभाग हा अडचणीचा विषय ठरणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे करण्यासाठी मजूर लागतात, ते शेतकरी श्रमदानासाठी कसे येणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे हे बंधारे कृषी सहायकांना आपल्या खिशातील पैसे मोजून बांधावे लागणार आहेत. सिमेंट, खतांची रिकामी पोत्यांसाठीही पदरमोड करावी लागणार आहे. शिवाय यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सिंचनाच्या पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही, असेही एक कृषी सहायकाने म्हटले आहे.
रब्बी हंगामातील क्षेत्र वाढीसाठी दरवर्षी नियोजन केले जाते. पण, पाण्याअभावी क्षेत्रात फारशी वाढ होत नाही. अखेरच्या टप्प्यात पिकांना पाणी कमी पडते. वनराई बंधारे बांधून किमान एक आणि जास्तीत-जास्त दोन पाण्याच्या पाळय़ा रब्बी पिकांना देता येतील, असे नियोजन आहे. दोन-अडीच महिने बंधाऱ्यांमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे जलसंधारणाचा हेतूही साध्य होणार आहे.
– विकास पाटील, संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण
राज्यात एक लाख वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून चांगला पाऊस पडत असला तरीही पावसाचे पडणारे पाणी वाहून जाते आणि फेब्रुवारी अखेरपासूनच टंचाई निर्माण होते, असे चित्र आहे. हे टाळण्यासाठी वनराई बंधारे उपयोगी ठरणार आहेत. लोकसहभागातून बंधारे बांधले जावेत, असे नियोजन आहे. बंधाऱ्यांसाठी सरकारकडून कोणताही निधी दिला जाणार नाही. – रवींद्र भोसले, संचालक, मृदा संधारण
शहर
- Pune : रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी कोंंडी, पोलिसांकडून ठेकेदारांविरुद्ध कारवाईचा इशारा
- Pune : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे ध्यान सत्राचे आयोजन
- Pune : समाविष्ट गावांतील बंधारे, तलावांचे पालिकेकडून संरक्षण; अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
महाराष्ट्र
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
- Pahalgam Terror Attack : सिंधू पाणी करार थांबवला, अटारी-वाघा बॉर्डर बंद; भारताचा पाकिस्तानवर 'कायदेशीर स्ट्राइक', सरकारने घेतले ५ मोठे निर्णय
- Akola News: भाजप आमदाराला शिव्या देणं भोवलं, अकोल्यात पोलीस निरीक्षकावर मोठी कारवाई
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pahalgam Attack : आमच्या नावाखाली दहशतवाद नको; नागरिकांचा दहशतवाद्यांना इशारा; हल्ल्याच्या निषेधार्थ बंद..
- Pahalgam Terror Hits Tourism : दहशतवादी हल्ल्याचा फटका पर्यटनाला; विमानाच्या तिकीट दरात घसरण, पण श्रीनगरहून परतीचा प्रवास महाग
- Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली
- Pahalgam Terror Attack : मुलीच्या डोळ्यासमोर बापाचा जीव घेतला, पुण्यातील दोघांना दहशतवाद्यांनी मारले