पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधारांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या शहरात पाणीकपातीला सोमवारपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. रविवारच्या तुलनेत चारही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर धरणांच्या क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याची बाब समाधानकारक आहे.
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये २.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९.४१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी ४ जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६८ टीएमसी म्हणजेच २९.७६ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ५.९४ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून या चार धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असून दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारी सकाळी टेमघर धरण परिसरात ३५ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात १८ मि.मी. पानशेत धरण परिसरात १९ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात चार मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात चार मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे सात आणि सहा मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात दोन मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारच्या तुलनेत चारही धरणांमध्ये ०.१४ टीएमसी म्हणजेच ०.५० टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, धरणांमधील पाण्याने तळ गाठल्याने पुणे महानगरपालिकेकडून सोमवारपासून पाणीकपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही पाणीकपात ११ जुलैपर्यंत सात दिवस करण्यात आली आहे. या कालावधीत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाचे प्रमाण, धरणांमध्ये जमा होणारा पाणीसाठा, हवामान विभागाचे अंदाज यांचा विचार करून पुढील आठवड्यात पाणीकपात सुरूच ठेवायची किंवा कसे?, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या धरणांमध्ये संततधार पाऊस पडत असून पुढील पाच दिवसांत मुसळधारांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये
टेमघर ०.०१ ०.३३
वरसगाव १.०४ ८.१४
पानशेत १.११ १०.४३
खडकवासला ०.५८ २९.१५
एकूण २.७४ ९.४१
शहरात जोरदार सरींची हजेरी
पुणे शहर आणि परिसरात सोमवारी दुपारी जोरदार सरीनी हजेरी लावली. शहरात दिवसभर पावसाळी वातावरण होते. त्यामुळे तापमानात झपाट्याने घट झाली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील घाट विभागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ७ आणि ८ जुलैला पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या दोन दिवसांत शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकूणच शहर आणि परिसरात तसेच घाट विभागात आठवडाभर पावसाची शक्यता आहे.
पुण्याच्या चार धरण क्षेत्रात पाऊस
पुणे: सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६६ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ५३ मि.मी, पानशेत धरण परिसरात ५०मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १९ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २.९६ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १०.१४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवार रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी ०.२२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर