पुणे : राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलाताना विरोधकांकडून होणाऱ्या टीका, टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं आहे. “आज भारतामध्ये चुकीचे विचार पसरवले जात आहेत. त्यांनी लगतच्या देशांची परिस्थिती पहावी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये.” असं शरद पवारांनी बोलून दाखवलं. पुण्यात कोंढवा भागातील सर्व धर्मीय ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते .
कार्यक्रमातील भाषणात बोलताना शरद पवार म्हणाले, “हा देश अनेक जाती-धर्माने बनला आहे. यात विविधता आहे, ती उठून दिसायची असेल, तर या देशात जी फुलं उमलली आहेत त्या सर्व फुलांचा सन्मान करायला हवा. आज देशात जी वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. जगात तर चमत्कारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. रशिया छोट्याशा युक्रेनवर हल्ला करतोय, हजारोंचे प्राण घेतले जाताय, मानवतेचे दर्शन संपल्याच दिसत आहे. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत सामान्य माणूस रस्त्यावर उतरला आहे, संघर्ष करतोय अन् राज्यकर्ते अंडरग्राउंड झाले आहेत. त्यांच्यावर तोंड लपवायची वेळ आली आहे. पाकिस्तान जिथं तुमचे माझे भाऊबंद देखील आहेत, तिथे एक तरुण पंतप्रधान होतो पण त्याला त्या पदावरून पायउतार व्हावं लागलं हे का घडतंय? कारण त्या ठिकाणचे राज्यकर्ते आणि त्यांच्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे.”
तसेच, “आज भारतामध्ये चुकीचे विचार पसरवले जात आहेत. त्यांनी लगतच्या देशाची परिस्थिती पहावी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये. आज जर कोणी देशाच्या अभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असेल, पिढ्यांपिढ्या एकत्र राहण्याला तोडत असेल, तर आपल्याला एकजुटीने याच्या विरोधात उभे रहावे लागेल. यांना धडा शिकवावे लागेल.” अस म्हणत शरद पवारांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला.
याचबरोबर, “आज आपण इथं कशासाठी जमलो? जात-धर्म बाजूला ठेऊन माणुसकी जपायला जमलो. प्रश्न नक्कीच खूप आहेत. महागाई, विकासाचे प्रश्न उभे आहेत. पण देशात जे चित्र उभं झालंय, त्या अनुषंगाने आपल्याला सध्या बंधुभाव जपणे गरजेचे आहेत. मी पक्ष-बिक्ष मानत नाही, आत्ता ही इथं विविध पक्षाचे नेते आहेत. देशहितासाठी आपण सगळे जमलोय. निवडणुकीचा यात कोणताही विचार नाही. पुण्यातून शांती आणि बंधुभावाचा संदेश जाऊद्या. सर्वांना कळू द्या, हा आपला आदर्श सर्वांपर्यंत पोहचू द्या.” असंही यावेळी शरद पवारांनी आवाहन केलं.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




