जव्हारचा ज्ञात इतिहास इ. स. १२व्या शतकापर्यंत मागे जातो. प्राचीन महिकावतीच्या बखरीमधील ग्रामनामांमध्ये जव्हारचा उल्लेख यवसाहार प्रेक्षादिगण म्हणून आलेला आहे. इ. स. १२३९ मध्ये मुहंमदीन सरदाराने इथे हल्ला केला होता. तेव्हा इथे स्थानिक कोळी व आदिवासी लोकांचे राज्य होते. इ. स. १३व्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता. या आदिवासी राजांनी इ. स. १३४१ मध्ये दिल्लीच्या महम्मद तुघलकाचे मांडलिकत्व पत्करले होते. त्यानंतर इ. स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला. तेव्हाच्या राजाने शिवाजी महाराजांची भेट घेतलेले ठिकाण म्हणजे जव्हारमधील शिरपाचा माळ होय. इ. स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मात्र इथले राजे मोगलांच्या भीतीने तटस्थ राहिले. ५ जून १६७२ रोजी मोरोपंत पिंगळे यांनी जव्हार जिंकले. स्वातंत्र्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका मुकणे राजघराण्याचे संस्थान होते. २० मार्च १९४८ रोजी जव्हार संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले. या संस्थानाची साक्ष देणारा जय विलास पॅलेस म्हणजेच जव्हारचा राजवाडा आज विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे.
जव्हारमध्ये एकूण दोन राजवाडे आहेत. त्यापैकी जुना राजवाडा एसटी स्टँडजवळ असून नवीन राजवाडा जव्हार-विक्रमगड रस्त्यावर आहे. जुना राजवाडा राजे पतंगशहा यांनी बांधला असून नवीन राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी १९३८ ते १९४२ मध्ये बांधला आहे. त्यापैकी जुन्या राजवाड्याची वाताहत झाली असून नवीन राजवाडा जय विलास पॅलेस मात्र आजही सुस्थितीत आहे. अतिशय देखणी, भव्य आणि प्रशस्त अशी एक मजली वास्तू आहे. त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी ५० हजार रुपये इतका खर्च आला होता. या वास्तुसाठी वापरलेला दगड जव्हारपासून १५ किलोमीटरवरील साखरे या गावातून आणलेला आहे. या राजवाड्यात सध्या कुणीही वास्तव्य करत नाही. मुकणे राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत. वर्षातून अनेकदा ते येथे येत असतात. दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे दसऱ्याला इथे आल्यास ही वास्तू आतूनही पाहायचे भाग्य लाभू शकते. या पॅलेसच्या आवारात फेरफटका मारल्यास मागील बाजूच्या पॉइंटवरून जव्हारच्या परिसराचे अतिशय प्रेक्षणीय आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसते. पॅलेसमध्ये मुकणे राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे, प्राचीन वस्तू, झुंबर, तोफा, राजकुमारांची खेळणी इत्यादी आहेत. मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवलेले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्याची छायाचित्रेही काढता येतात. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. तसेच राजवाड्याच्या छतावरील घुमट्यांमधून सूर्यास्ताचे होणारे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते. हा राजवाडा उत्तर-मध्ययुगीन काळातील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून येथे लवकरच करमणुकीचे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.
इतिहासाची आवड असल्यास जुना राजवाडा पाहणे ही पर्वणी आहे. जुन्या राजवाड्याचा कोट आणि नगारखाना आपल्याला गतवैभवाची झलक देऊन जातो. जुन्या राजवाड्याचे कोरीव लाकडी स्तंभ, तुळया, राजे दिग्विजयसिंह व राणी प्रियंवदा यांची तैलचित्रे, तटबंदी, मनोरे, प्रवेशद्वाराची दगडी कमान अशा वास्तुविशेषांनी हा राजवाडा आजही अविस्मरणीय ठरतो. रयतेसाठी स्वखर्चाने धरण बांधणाऱ्या प्रजाप्रिय राजघराण्याने उभारलेला राजवाडा पाहणे एक पर्वणी आहे.
कसे जाल?
पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकापासून ४२ किमी अंतरावर आणि मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकापासून १०० किमी अंतरावर जव्हार आहे. इथे जाण्यासाठी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, डहाणू इथून एसटी बसेसची सोय आहे. जय विलास पॅलेसकडे (नवा राजवाडा) जाण्यासाठी, मुंबईकडून विक्रमगडकडे जाताना शिवनेरी ढाबा लागतो. तिथून पॅलेसकडे जायला उजवीकडे कच्चा रस्ता आहे. स्वतःच्या वाहनाने गेल्यास आजूबाजूला असणारी भूपतगड, कोपरा धबधबा, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा इत्यादी स्थळे पाहता येतील. जव्हारमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल उपलब्ध आहेत.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा