Women Attacked and Molested at Naigaon Dhaba Parking; Police Investigation Underway.

पुणे: कामशेत परिसरातील नायगाव येथील धाब्यावर महिलेवर जीवघेणा हल्ला आणि विनयभंग; पार्किंगमधील वाद विकोपाला.



Continue Reading
First Photo of Rebel Shiv Sena MPs Surfaces from Five-Star Hotel; Who is the 'Big Leader' with Them?

'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?



Continue Reading
Today's Horoscope 20 June 2026: Financial Gains and Career Growth – Will Luck Favor Your Zodiac Sign?

आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!



Continue Reading

डॉ. राम चरण यांचा कॉलम:शिकणे कधी थांबवत नाहीत ‎अशाच नेत्यांचे जग असते‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपल्या आजूबाजूचे जग बहुतांश नेत्यांच्या अपेक्षेपेक्षा‎कितीतरी वेगाने बदलत आहे. पाच वर्षांपूर्वी ‎अस्तित्वातही नसलेले तंत्रज्ञान आज संपूर्ण उद्योगांचे‎ स्वरूप बदलत आहेत. व्यवसाय मॉडेल्स उभारण्यासाठी ‎दशके लागली. ती काही महिन्यांतच डळमळीत होत‎ आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याकडे असलेला‎ सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे अनुभव नव्हे, तर‎सातत्याने शिकत राहण्याची तयारी.‎ सहा दशकांत मी जगभरातील अनेक नेत्यांसोबत काम‎केले. काही नेते दीर्घकाळ टिकतात, मजबूत संस्था‎उभ्या करतात व अनेक दशकांपर्यंत सुसंगत राहतात.‎त्यांच्यात एक समान सवय आढळते. ते आपली‎जिज्ञासा कधीच संपुष्टात येऊ देत नाहीत. त्यांना आपण ‎‎सर्व काही जाणतो, असा कधीच भ्रम होत नाही. कारण ‎‎नेतृत्व हे एखादे अंतिम ध्येय नसून अखंड प्रवास आहे. ‎‎अलीकडच्या काळात तरुण नेत्यांसोबत चर्चा करताना‎एक महत्त्वाचा प्रश्न वारंवार समोर आला आहे—‎भरपूर संसाधने असूनही अनेक कंपन्या अपयशी का ‎‎ठरतात? याचे उत्तर जवळपास नेहमी एकच असते. ‎‎एखाद्या टप्प्यावर नेतृत्वाने शिकणे थांबवलेले असते.‎त्यांनी प्रश्न विचारणे सोडून दिलेले असते. काल यशस्वी ‎‎ठरलेले सूत्र उद्याही तितकेच परिणामकारक ठरेल, असा‎त्यांचा समज झालेला असतो. पण प्रत्यक्षात तसे कधीच‎घडत नाही. डिजिटल परिवर्तनाचे उदाहरण घ्या. अनेक‎मोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञान प्रकल्पांवर प्रचंड गुंतवणूक‎केली तरी त्या अपयशी ठरल्या. त्यामागची कारणे‎क्वचितच तांत्रिक असतात; ती मानवी असतात. बदल‎स्वीकारण्याची क्षमता नसते. मुख्य कार्यकारी‎अधिकाऱ्यांची बांधिलकी दिसून येत नाही. संस्थेने‎भावनिक व व्यावहारिक पातळीवर बदल स्वीकारलेला‎नसतो. केवळ तंत्रज्ञान कंपनी बदलू शकत नाही; ते काम‎नेतृत्व करते. एलअँडटीसारख्या कंपन्यांचे यश दाखवते‎की नेतृत्व पूर्णपणे कटिबद्ध असेल, बदल स्वीकारणे‎संस्थेच्या संस्कृतीचा भाग बनला असेल आणि संपूर्ण‎संस्था एकत्र पुढे सरकली, तर मोठे परिवर्तन शक्य होते.‎नेतृत्व म्हणजे ऊर्जाही आहे. एखाद्या एकट्या प्रतिभावान‎व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण संघात निर्माण होणाऱ्या‎ऊर्जेची. मी पाहिलेले सर्वोत्तम नेते केवळ वर्चस्व‎गाजवत नाहीत; तर ते त्या वातावरणात ऊर्जा निर्माण‎करतात. ते आपल्या सहकाऱ्यांमधील सर्वोत्तम विचार‎बाहेर आणतात. कल्पना कुठूनही समोर येऊ शकतील,‎असे वातावरण ते तयार करतात. याच ठिकाणी मी अशा‎शिकवणीकडे येतो. माझा आता दृढ विश्वास आहे—‎बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक प्रभावी असते. बहुतांश नेते‎इतरांवर प्रभाव पाडण्यात बराच वेळ घालवतात; पण‎समजून घेण्याचा प्रयत्न कमी करतात. प्रत्यक्षात खरी‎ताकद ऐकण्यात असते. आपण ऐकतो, तेव्हा ग्राहकांना‎नेमके काय हवे आहे. कर्मचारी कोणत्या अनुभवातून‎जात आहेत आणि बाजार कोणते संकेत देत आहे, हे‎समजते. पण आपण सतत बोलत राहिलो, तर‎आपल्यालाच फक्त स्वतःचा आवाज ऐकू येतो. आधी‎स्वतः समजून घ्या. मग इतरांनी आपल्याला समजून‎घ्यावे, अशी अपेक्षा ठेवा. व्यवसायविश्वात आयुष्य हे‎अनेक क्षणांची साखळी असते. काही क्षण छोटे‎असतात, तर काही आयुष्य बदलणारे ठरतात. मात्र‎त्यांच्यात एक समान गोष्ट असते— ते कोणाची वाट‎पाहत नाहीत. संकोच करणारा, पूर्ण खात्री झाल्याशिवाय‎पाऊल टाकत नाही, त्याला उशिरा का होईना हे जाणवते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎की संधी हातातून निसटून गेली आहे.‎ मी हे अनेकदा घडताना पाहिले आहे. नोकियाच्या‎अध्यक्षांनी आयफोनचे आगमन पाहिले होते.‎त्यांच्याकडे संसाधने होती. क्षमता होती आणि बाजारात‎मजबूत स्थानही होते. तरी काहीतरी त्यांना त्या‎बदलाच्या लाटेवर स्वार होण्यापासून रोखून धरत होते.‎प्रत्येक नेत्याने स्वतःला एवढेच विचारू नये की त्याला‎संधी दिसते का; तर त्याने त्या संधीचा लाभ घेण्यासाठी‎आवश्यक सवयी, विचारसरणी व धाडस स्वतःमध्ये‎विकसित केले आहे का, हेदेखील तपासावे. याच गोष्टी‎महान नेत्यांना चांगल्या नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात.‎तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा व शिस्तबद्धपणे‎तिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षा जास्त ऐका. इतरांना‎विचारण्याची भीती वाटते असे प्रश्न विचारा. संधी समोर‎आली, तर परवानगीची वाट पाहू नका. पुढे व्हा. कारण‎कधीही शिकणे थांबवत नाहीत अशाच नेत्यांचे हे जग‎आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)‎ तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा आणि ‎शिस्तीने तिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षा‎अधिक ऐका. इतरांना विचारण्याची भीती‎वाटते असे प्रश्न विचारा. आणि संधी समोर‎आली, तर परवानगीची वाट पाहू नका— पुढे‎व्हा.‎


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:योग लोकप्रिय झाला, पण‎ जीवनावश्यक होणे बाकी


This post was originally published on this site.


Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:महिन्यातून किमान एकदा आपल्या ‘कॅफे ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स’मध्ये जा



Continue Reading
Mumbai Horror: 28-Year-Old Jalgaon Youth Who Came to Visit Mumbai with Girlfriend Jumps to Death from Versova Society Building

मुंबईत भयंकर घटना! प्रेयसीसोबत फिरायला आलेल्या जळगावच्या २८ वर्षीय तरुणाची वर्सोवा येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या



Continue Reading
Will Rohit Sharma and Virat Kohli Play the 2027 ODI World Cup? BCCI Breaks Silence on the Duo's Future!

रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार का? बीसीसीआयने अखेर स्पष्टच सांगून चर्चांना पूर्णविराम दिला!



Continue Reading
ITR Deadline 2026: Don't Wait Until Last Date! File Your Income Tax Return Now or Face ₹5,000 Penalty

शेवटच्या तारखेची वाट पाहू नका! 'या' तारखेपूर्वी आयटीआर भरा, नाहीतर बसेल ५,००० रुपयांचा फटका!



Continue Reading