पेनी गोल्डबर्ग यांचा कॉलम:एआयचे फायदे घेण्यासाठी शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करावे‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या दोन वर्षांत लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या (एलएलएम)‎वाढीमुळे अशी भीती निर्माण झाली की एआय लवकरच‎महाविद्यालयीन शिक्षण, विशेषतः उदारमतवादी कला‎अभ्यास यांना अप्रासंगिक बनवेल. अशा परिस्थितीत‎तरुणांनी कॉलेज सोडून थेट कामावर जाणे चांगले होईल.‎मी पूर्णपणे असहमत आहे. व्यावहारिक अनुभवातून‎शिकणे मौल्यवान आहे. परंतु भविष्यात कोणत्या नोकऱ्या‎आणि कौशल्यांची मागणी असेल याची लोकांना चांगली‎समज असेल तरच ते कार्य करते. हे खरे आहे की‎रोजगाराचे भविष्य अनिश्चित आहे. परंतु तरुणांना शक्य‎तितक्या लवकर कॉलेज सोडून कामगार बाजारात प्रवेश‎करण्याचा सल्ला देणे दिशाभूल करणारे आहे.‎ आधुनिक एआयचे प्रणेते मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनी‎एकदा त्यांच्या क्षेत्रातील विकासाची तुलना धुक्यातून‎मार्गक्रमण करण्याशी केली : तुम्हाला पुढचा मार्ग दिसतो.‎पण त्यापलीकडे काय आहे ते दिसत नाही.‎शिक्षकांसमोरील आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांना अशा‎परिस्थितीत प्रभावीपणे काम करण्यासाठी तयार करणे.‎उपाय म्हणजे त्यांना लवकरच कालबाह्य होऊ शकणाऱ्या‎कामांसाठी प्रशिक्षित करणे नाही. तर त्यांना अधिक‎अनुकूल बनवणे.‎ या दृष्टिकोनातून शिक्षणाची भूमिका – आणि विशेषतः‎उच्च शिक्षणाची – पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची बनते.‎भविष्यात कोणत्या कौशल्यांची मागणी असेल हे‎आपल्याला माहित नसल्यामुळे मूलभूत गोष्टींकडे परतणे‎आवश्यक आहे. उदारमतवादी शिक्षण काय करावे यावर‎नव्हे तर कसे विचार करावे यावर भर देते. ते विद्यार्थ्यांना‎तर्क करायला, काळजीपूर्वक वाचायला, स्पष्टपणे‎लिहायला आणि पुराव्यांचे मूल्यांकन करायला शिकवते.‎ही कौशल्ये इतर तांत्रिक कौशल्यांपेक्षा काळाच्या‎कसोटीवर खूप चांगल्या प्रकारे उतरतात. याचा अर्थ असा‎नाही की तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. उलट‎विद्यार्थ्यांनी एआयसोबत काम करायला शिकले पाहिजे.‎गणित, तर्कशास्त्र आणि तर्क शिकवणे; मूलभूत‎पाठ्यपुस्तकांमध्ये व्यस्त राहणे; आणि युक्तिवाद कसे‎तयार केले जातात आणि त्यांची चाचणी कशी केली जाते‎हे समजून घेणे – हे सर्व आजही आवश्यक आहे. ही‎अशी कौशल्ये आहेत जी आपल्याला तंत्रज्ञानाच्या पुढे‎राहण्यास सक्षम करतात. आपण काय शिकावे आणि ते‎कसे शिकवावे? पहिला प्रश्न कठीण आहे आणि‎स्वाभाविकपणे वादविवाद निर्माण करेल. मुख्य‎संकल्पनांच्या महत्त्वावर व्यापक सहमती असू शकते,‎परंतु कालांतराने तपशील बदलतील. पूर्वीच्या‎तंत्रज्ञानाबाबतचा आपला अनुभव विचारात घ्या.‎कॅल्क्युलेटर आणि संगणकांनी अंकगणित शिकवण्याची‎गरज दूर केली नाही. विद्यार्थी अजूनही गणना कशी‎करतात हे शिकतात. त्याचप्रमाणे, स्पेलिंग आणि‎व्याकरण महत्वाचे आहे. एआयला अनेक क्षेत्रांमध्ये‎समान समायोजनांची आवश्यकता आहे. एलएलएम‎आता लेखाचा सारांश देणे किंवा त्याची मध्यवर्ती कल्पना‎ओळखणे अशी कामे करण्यास सक्षम आहेत.‎ असा युक्तिवाद केला जातो की एआय औपचारिक‎शिक्षणाची आवश्यकता कमी करेल कारण ते मागणीनुसार‎माहिती आणि मार्गदर्शन प्रदान करू शकते. परंतु ही‎धारणा या गृहीतकावर आधारित आहे की वापरकर्त्यांना‎काय विचारायचे आहे आणि त्यांना मिळालेल्या उत्तरांचा‎अर्थ कसा लावायचा हे माहित आहे. एआयपासून‎समाजाला फायदा करून द्यायचा असेल तर शिक्षणात‎कमी नाही तर अधिक गुंतवणूक गरजेची असेल.‎(@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎


Continue Reading

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:बांगलादेशातील निवडणुका ‎आपल्यासाठीही महत्त्वाच्या‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या‎निवडणुकांमध्ये तीन शक्ती सहभागी होत आहेत.‎पहिली- मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार. त्यास‎पाकिस्तानशी संबंधित इस्लामी गटांचा पाठिंबा आहे.‎दुसरी- बीएनपी. त्याचे नेतृत्व गेल्या महिन्यात निधन‎झालेल्या खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान करत‎आहेत. तिसरी- बांगलादेशच्या अस्थिरतेत स्वतःचे हित‎साधणाऱ्या परदेशी शक्ती. यामध्ये चीन आणि‎पाकिस्तान भारतविरोधी घटकांना पाठिंबा देतात. त्यानंतर‎अमेरिका आहे. ती हसिना सरकारच्या जागी स्वतःला‎अनुकूल असलेले सरकार इच्छिते. वर्षानुवर्षे शेख‎हसिना सरकारने अमेरिकेला बंगालच्या उपसागरातील‎सेंट मार्टिन बेटावर प्रवेश करण्यापासून रोखले. ‎‎म्यानमारपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर‎असलेल्या या बेटाचे भू-सामरिक महत्त्व आहे.‎ गेल्या वर्षी शेख हसीना यांच्या पलायनानंतर भारताने‎युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारशी थेट संघर्ष ‎‎करण्यापेक्षा शांत राजनैतिकतेला प्राधान्य दिले आहे.‎हसीना यांना आश्रय दिल्याने इस्लामी-नियंत्रित युनूस ‎‎सरकार नाराज झाले. हसीनांचे १५ वर्षांचे शासन ‎‎भारत-बांगलादेश संबंधांमध्ये सर्वात उत्पादक आणि‎सौहार्दपूर्ण राहिले आहे. इस्लामिक अतिरेक्यांनी त्यांना‎जबरदस्तीने हटवणे हा भारतासाठी मोठा धक्का होता.‎ब्रह्मपुत्र आणि गंगा नद्यांवर नियंत्रण आणि बांगलादेशला‎वीज पुरवठा यावरुन भारत बांगलादेशवर दबाव‎आणण्याच्या स्थितीत आहे. निवडणुका जवळ येत‎असताना हसीना अधिक बोलू लागल्या आहेत. ढाका‎सोडल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांच्या पहिल्या‎सार्वजनिक भाषणात त्यांनी युनूस सरकार आणि‎त्यांच्या कट्टर समर्थकांना उलथवून टाकण्याचे आवाहन‎बांगलादेशींना केले. भारत बीएनपीच्या विजयाची आशा‎करत आहे. जनमत सर्वेक्षणात बीएनपीला ७०% पेक्षा‎जास्त पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले आहे.‎बीएनपी भूतकाळात भारतविरोधी होती. परंतु रहमान‎यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने धर्मनिरपेक्ष, विविधता,‎आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणारे आणि‎भारताशी सहकार्य करणारे सरकार चालवण्याची‎वचनबद्धता व्यक्त केली. बीएनपीचा मुख्य प्रतिस्पर्धी‎जमात-ए-इस्लामी आहे. बीएनपी आणि जमातच्या‎कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष सुरू झाले आहेत. आता‎लीगला निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली‎आहे. बीएनपी मध्यम विचारसरणीकडे वळली आहे तर‎जमातने तीव्र अतिरेकी विचारसरणीकडे वाटचाल केली‎आहे. टी-२० विश्वचषकात भारतात सामने न‎खेळवण्याच्या सरकारच्या निर्णयात जमातच्या संयोजक‎नाहिद इस्लाम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.‎परिणामी, बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश‎करण्यात आला. वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर‎रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतर‎बांगलादेशमधील भारतविरोधी भावना शिगेला‎पोहोचली. मीडिया रिपोर्ट्सनुसार “स्पर्धेच्या दुसऱ्या‎फेरीच्या पुढे न जाणाऱ्या संघांना देखील ३,८२,५००‎डॉलरची बक्षीस रक्कम देखील मिळते. ९ व्या ते १२ व्या‎क्रमांकावर असलेल्या संघांना २,४७,५०० डॉलर‎मिळतात. १३ व्या ते २० व्या क्रमांकावर असलेल्या‎संघांना २,२५,०० डॉलर मिळतात. प्रत्येक संघाला‎सामना जिंकल्याबद्दल अतिरिक्त ३१,१५४ डॉलर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मिळतात. आयसीसी सहभागी संघांना ३ ते ५ लाख‎डॉलरची फी देखील देते. ती स्थानिक क्रिकेट बोर्डाला‎जाते. भारताने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी‎बांगलादेशसोबतचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला‎आहे. परंतु निवडणूक जिंकणारा आणि पंतप्रधानपद‎स्वीकारणाऱ्याविरुद्ध भारताला कठोर भूमिका घ्यावी‎लागेल. दावे जास्त आहेत. लाखो निर्वासित बांगलादेशी‎पश्चिम बंगाल ,आसाममध्ये राहतात. दरम्यान‎पाकिस्तान बांगलादेशात नवीन भारतविरोधी “पूर्व‎पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. चीन‎बांगलादेशात पायाभूत सुविधा विकास प्रकल्प तयार‎करत आहे. अमेरिकेने बांगलादेशातही हालचाल‎वाढवली आहे.‎ रहमानची बीएनपी खरोखर समावेशक , सुधारणावादी‎सरकार स्थापन करू शकेल का? शेख हसीना अजूनही‎खात्री बाळगू शकलेल्या नाहीत. परंतु भारताला आशा‎आहे की एक दशकाच्या खंडानंतर बीएनपीच्या‎रहमानची भूमिका नरमाईची झाली असावी.‎
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ भारताला बीएनपी विजयाची आशा आहे.‎हा पक्ष भूतकाळात भारतविरोधी होता.‎परंतु अलीकडेच त्याने धर्मनिरपेक्ष,‎विविधता, विकासाभिमुख आणि‎भारत-अनुकूल सरकार चालवण्याची‎वचनबद्धता व्यक्त केली आहे.‎


Continue Reading

राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:सनसनाटीपेक्षा विश्वासार्हता‎ यास महत्त्व देणारा पत्रकार‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल फोन आपल्या जीवनावर‎अधिराज्य गाजवण्याच्या खूप आधी रेडिओचे जग होते.‎१९७० च्या दशकात भारतात वाढणाऱ्या आपल्यापैकी‎अनेकांसाठी रेडिओ हे व्यापक जगाचे द्वार होते. आणि‎त्यापैकी बीबीसी रेडिओ सेवा होती. दररोज सकाळी‎माझे दिवंगत आजोबा – एक पोलिस अधिकारी – एक‎तास योग आणि ध्यान केल्यानंतर त्याचे दैनिक बुलेटिन‎ऐकत असत. ते मला म्हणायचे, तुम्हाला बातम्या हव्या‎असतील तर बीबीसी ऐका. बातम्यांच्या जगात बुडलेल्या‎एका जिज्ञासू मुलाप्रमाणे बीबीसी माझा पहिला साथीदार‎बनला. आणि त्यासोबतच मिस्टर बीबीसी म्हणून‎ओळखले जाणारे एकमेव मार्क टली (नंतर सर मार्क‎टली) देखील आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग‎बनले.‎ मला आठवतंय १९८४ मध्ये बीबीसीने इंदिरा गांधींच्या‎हत्येची घोषणा केली. तेव्हा मी एका सलुनमध्ये होतो.‎ऑल इंडिया रेडिओने शोकाकुल संगीत वाजवले. पण‎मार्क टलीच्या स्पष्ट आणि प्रभावी आवाजाने या‎भयानक बातमीची पुष्टी झाली. काही वर्षांनंतर १९९२‎मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. तेव्हा मी मुंबईत‎रिपोर्टर होतो. तरीही आम्ही सर्वात अचूक आणि‎घटनास्थळी रिपोर्टिंगसाठी बीबीसी आणि टलीकडे‎वळलो. कारसेवकांच्या जमावाने टलीचा पाठलाग केला‎होता आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु‎या भयानक अनुभवाला न जुमानता त्यांनी शक्य‎तितक्या स्पष्टतेने घटना सादर केल्या.‎ ते विश्वासार्हतेचा आवाज होते. कालांतराने आणि एका‎विशाल देशात वर्षानुवर्षे कानाकोपऱ्याचा प्रवास करून‎हे गुण विकसित झाले. बीबीसीचे भारतातील ब्युरो चीफ‎म्हणून त्यांनी अनेक दशकांमध्ये घडणाऱ्या ऐतिहासिक‎आणि विनाशकारी घटना पाहिल्या. मला आठवतंय‎१९९० च्या दशकाच्या मध्यात माझ्या कॅमेरामनसोबत‎उत्तर प्रदेशला प्रवास करत होतो. आम्ही लखनौजवळील‎एका गावात पोहोचलो. तेथे आंब्याच्या बागेच्या‎मालकाने आम्हाला चहासाठी त्यांच्या घरी आमंत्रित‎केले. त्यांनी आम्हाला काही वर्षांपूर्वी काढलेला‎टलीसोबतचा त्यांचा फोटो असलेला एक अल्बम‎दाखवला. त्यांनी उत्साहाने घोषित केले, “हा माझा‎चाहता क्षण होता. टली साहेब हे त्या काळातील एक‎सेलिब्रिटी होते. ते स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी‎आवाज उंच करण्याची गरज नसते. शांत, संयमी आणि‎अधिकारपूर्ण स्वरात बोलणे पुरेसे असते. त्या महान‎पत्रकारासोबत माझाही चाहता क्षण होता. १९९४ मध्ये मी‎दिल्लीला आलो आणि राजधानीतील सत्तेचे कॉरिडॉर‎समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. राजकारण्यांपेक्षा मी‎मार्क टलीला भेटण्यास उत्सुक होतो. मी अपॉइंटमेंट‎घेण्यासाठी फोन केला तेव्हा त्यांनी लगेच प्रतिसाद दिला‎आणि सांगितले की त्यांना मला भेटून आनंद होईल.‎त्यांना सहकारी पत्रकारांचा सहवास आवडला.त्यांनी‎त्यांच्या कथा , विस्तृत अनुभव, काळजी होती‎त्यांच्याशी शेअर केले. केवळ माहितीसाठी भारतीय‎पत्रकारांशी संपर्क साधणाऱ्या त्या “परदेशी’‎पत्रकारांसारखे टली मुळीच नव्हते; आयुष्यभर मैत्री‎जोपासत असत. कदाचित म्हणूनच त्यांना इंग्लंडपेक्षा‎भारतात जास्त घरासारखे वाटले. भारताबद्दलचे त्यांचे‎प्रेम आणि जिव्हाळा खरा होता. तो कल्पनारम्य नव्हता.‎टलीसाठी भारत हे ऑडिओव्हिज्युअल अनुभवांचा एक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎चैतन्यशील जग होते. त्याने काही टीव्ही माहितीपट‎बनवले – भारतीय रेल्वे प्रवासांवर एक संस्मरणीय‎चित्रपट देखील समाविष्ट होता – परंतु रेडिओ हा त्याचा‎पहिला प्रेम होता. कदाचित माध्यमाचा साधेपणा त्यांना‎आवडत होता.‎ एकदा मी त्यांना टीव्ही चर्चेसाठी आमंत्रित केले. खूप‎समजावल्यानंतर ते आले. पण त्यांना तो अनुभव विशेष‎आवडला नाही. ते म्हणाला, “हे सर्व खूप गोंगाटाचे नाही‎का?’ या अर्थाने ते सौम्य काळातील पत्रकार होते. ते‎सनसनाटी आणि गोंगाटापेक्षा विश्वासार्हता आणि‎सत्याला प्राधान्य देत. मला अजूनही इंडिया इंटरनॅशनल‎सेंटरमध्ये झालेला आमचा शेवटचा संवाद आठवतो. ते‎हसले आणि म्हणाले “मला वाटते की आजच्या भारतात‎पत्रकार असणे सोपे नाही! मी त्यांच्याकडे पाहिले आणि‎मान हलवली. कधीकधी चेहऱ्यावरील हावभाव हजार‎शब्दांपेक्षा जास्त शब्द बोलतात. त्यांच्या पुस्तकाच्या‎शीर्षकात म्हटल्याप्रमाणे, भारतात कधीही पूर्णविराम‎नसतो. अलविदा सर मार्क, शुभ यात्रा.‎
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आपल्या‎शेवटच्या संभाषणात ते म्हणाले, “मला‎वाटते की आजच्या भारतात पत्रकार‎असणे सोपे नाही! मी मान हलवली.‎अनेकदा चेहऱ्यावरील भाव हजार‎शब्दांपेक्षा जास्त बोलतात.‎


Continue Reading

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:यूजीसीच्या नवीन नियमांवरून गदारोळ का?‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎नवीन यूजीसी नियमांवर इतका गदारोळ का? खरे तर‎नवीन नियमांमुळे जातीआधारित टिप्पण्यांमध्ये समाविष्ट‎असलेल्या वर्गांची व्याप्ती वाढवली आहे. पूर्वी या कक्षेत‎केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा‎समावेश होता. कारवाईतील कठोरताही कमी होती.‎ हेदेखील खरे आहे – दलित वर्गावर वर्षानुवर्षे अन्याय‎होत आहे हे कुणीही स्वीकारू शकते आणि त्यांच्यावर‎झालेल्या अन्यायाची भरपाई करण्यासाठी या वर्गाचे‎उत्थान करणे योग्य ठरले असावे. पण आता ओबीसी‎(इतर मागासवर्गीय) आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय‎(ईबीसी) वर्गदेखील या कक्षेत जोडले गेले आहेत. या‎कक्षेतून फक्त सामान्य किंवा अनारक्षित वर्ग वगळण्यात‎आला आहे.‎ नवीन नियमांमुळे सामान्य वर्गावर आपोआप आरोप‎होतील. दुसऱ्या शब्दांत, त्यांना डिफॉल्ट गुन्हेगार घोषित‎केले जाईल, असा विरोध करणाऱ्यांचा युक्तिवाद आहे.‎
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सामान्य वर्गासाठी कोणताही‎दिलासा नसला तरी असे म्हटले जात आहे की राखीव‎वर्गाने खोटी तक्रार दाखल केली तरी शिक्षेची तरतूद नाही.‎हे निषेधाचे एक प्रमुख कारण आहे.‎
असेही म्हटले जात आहे की सरकार मागासवर्गीयांची ‎‎सहानुभूती मिळवण्यासाठी हे करत राहते. मोठ्या प्रमाणात ‎‎निषेध झाल्यानंतर हे नवीन नियम मागे घेतले जातील‎किंवा योग्य सुधारणा केल्या जातील. परंतु नियम मागे ‎‎घेतल्यानंतरही त्या वर्गांची सरकारबद्दल सहानुभूती कायम ‎‎राहील! विरोधी वर्गाचा असा युक्तिवाद आहे की सरकार‎हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे.‎
तसेही समग्रतेला नकार आणि फक्त तुकडे हेच‎वास्तविक आहे, असे दाखवण्याचे राजकारण ‎‎स्वातंत्र्यापूर्वीही होते. आजही सुरू आहे. नेत्यांनी प्रथम‎लहान गटांना सतत अन्यायाला बळी पडलेल्यांना ‎‎भडकावले, नंतर त्यांना पोकळ आश्वासनांची अफू दिली ‎‎आणि शेवटी त्यांना अतिरेकीपणाच्या टप्प्यावर पोहोचू‎दिले. नंतर या काही गटांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या‎नाहीत. तेव्हा त्यांनी संपूर्ण शासनव्यवस्थेला आणि शेवटी ‎‎संपूर्ण देशाला अन्याय्य म्हणण्यास सुरुवात केली होती.‎
म्हणूनच तुकड्यांचे राजकारण उलटे झाले तेव्हा तेच ‎‎राज्यकर्ते हेच तुकडे घेऊन विखुरलेल्या जातींना एकत्र ‎‎करताना दिसून आले. हे करताना ही मंडळी आम्ही‎समग्रतेला ओळख देणे आणि लहान वर्गांची एकजूट‎करत आहोत, असे सांगत होती. कारण असे करणे एकूण ‎‎सामाजिक विकासासाठी अपरिहार्य आणि अनिवार्य‎बनले होते. स्वातंत्र्यापूर्व काळात ब्रिटिशांनी असेच केले‎होते. त्यांनी प्रथम समाजातील लहान वर्गांना स्वतंत्र‎ओळख देऊन फोडाफोडी केली. वर्षानुवर्षे ते या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎युक्त्यांवर अवलंबून राहून राज्य करण्यात यशस्वी झाले.‎प्रत्यक्षात राजकारणाला आत्मा नसतो. राजकारणी‎लोकांकडे मते मागण्यासाठी जाणार नाही त्या दिवशी‎राजकारणाचा आत्मा जागृत होईल. हा आंतरिक‎आत्मविश्वास आणि बाह्य शक्तीमधील फरक आहे.‎भयमुक्त असणे आणि घाबरणे यात हाच फरक आहे.‎राजकारणाला आत्मा नसतो. त्यामुळे त्यात आंतरिक‎शक्तीचाही अभाव असतो. …आणि म्हणूनच‎काळाबरोबर प्रत्येक शक्ती स्वतःची जाणीव गमावते.‎आश्वासनांवर आधारित सिंहासन मिळवण्याची कल्पना‎तिच्या पायातील बेडी बनते. आपल्या प्राचीन इतिहासात‎एक नाव आहे : मीरदाद. काही लोक त्यांच्याकडे हा प्रश्न‎घेऊन गेले. आपण इतके दुःखी का आहोत? मीरदाद‎म्हणाले, “याचे उत्तर केवळ आपण श्वास घेत असलेल्या‎हवेतूनच मिळू शकते. ती हवा आपल्या स्वतःच्या‎विचारांच्या विषाने भरलेली आहे. हे विष आपले‎घर-रस्त्यांवर आणि आपल्या दारांमध्ये कोरले गेले आहे.‎म्हणूनच आपण आता चेतनेचे किंवा महाचेतनेचे‎वारसदार नाही. …आज आपण किंकाळ्या, जखमा‎आणि रस्त्यावर वाहणाऱ्या रक्ताचे वारसदार आहोत.‎ अखरे तर सत्ता आणि सरकार, आसन आणि सिंहासनाचे‎लोकांना घाबरवण्याचे जणू कर्तव्य बनले आहे. ते केवळ‎शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही गुलाम‎करतात. म्हणूनच… दररोज आपल्या पोटी आनंदाचा सूर्य‎जन्मतोआणि हाच सूर्य अनाथ होत असतो.‎ नवीन नियमांमुळे सामान्य वर्ग‎आरोपांनी वेढला जाईल?‎ नवीन नियमांमुळे सामान्य वर्ग आरोपांनी‎वेढला जाईल असे आंदोलकांचे म्हणणे‎आहे. त्यांना दोषी ठरवले जाईल. असे‎म्हटले जात आहे की राखीव वर्गाने खोटी‎तक्रार दाखल केली तरी त्यांच्यासाठी‎शिक्षेची तरतूद नाही.‎


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मुलांचे मानसिक आरोग्य‎ राखण्यासाठी ध्यानाशी जोडा‎


आज पालकांना त्यांच्या मुलांच्या मानसिक आरोग्याची खूप‎काळजी वाटते. भारतीय तरुणांना जगातील सर्वात जास्त‎करिअर-केंद्रित मानले जाते. भविष्याबद्दलची ही गांभीर्य तरुण‎पिढीमध्ये दिसून येते. पण हे बालपण प्रौढत्वात जाते तेव्हा काय‎होईल? असे म्हटले जाते की इच्छेच्या प्रवासावर निघालेल्या‎लोकांची झोप उडते. इच्छा हा मानवी स्वभाव आहे. नंतर इच्छा‎उत्कटतेत बदलते. उत्कटतेचे वासनेत रूपांतर होते आणि वासना‎नंतर अडचणीचे कारण बनते. पूर्वी तरुण लोक लवकर प्रतिक्रिया‎देत असत. परंतु आता मुलेही तेच करू लागली आहेत. कृतीला‎प्रतिक्रियेइतकी ऊर्जा लागत नाही. मानवी मनात एक चुंबक असतो.‎आपण परिस्थितीबद्दल विचार करतो त्या परिस्थितीला ते आकर्षित‎करते. आज मुले विचार करत आहेत त्याची त्या वयात गरज नसते.‎आणि प्रौढत्वात पोहोचण्यापूर्वी काही गोष्टी त्यांच्या मनात रुजल्या‎तर त्यांच्या प्रतिक्रिया धोकादायक ठरू शकतात. मुलांचे मानसिक‎आरोग्य राखण्यासाठी, त्यांना लवकर ध्यानाशी जोडले पाहिजे.‎


Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:सायबर सुरक्षा आता कचऱ्याच्या समस्येशीही दोन हात करत आहे!


मी त्यांना ‘लिटर वॉरियर्स’ म्हणतो, कारण यातील प्रत्येक जण मॉर्निंग वॉकदरम्यान जाणाऱ्या वाहनांतून फेकलेल्या फास्ट फूड कंटेनरचे १०० तुकडे उचलतो. त्यातील काही गोठलेल्या रस्त्यावरून एक-एक तुकडा काढतात, काही फोटो काढतात आणि एआय पॉवर्ड टूलमध्ये अपलोड करतात. हे टूल लोकेशन, कचऱ्याचा प्रकार आणि ज्या फास्ट फूड आउटलेटमधून ते आले आहे त्याचे नाव नोंदवते. इंग्लंडच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या या प्रयोगादरम्यान लिटर वॉरियर्सना आढळले की, बहुतेक कचरा मॅकडोनाल्ड्स आणि कोस्टा कॉफीच्या अशा आउटलेट्समधून आला आहे, जे संरक्षित नॅशनल लँडस्केपपासून अनेक मैल दूर आहेत. कचऱ्याच्या पिशव्या भरताना ते न खाल्लेल्या बिग मॅक, चीज बर्गर, नगेट्स आणि फ्रेंच फ्राइजने भरलेली एक पिशवीही गोळा करतात. हे स्वयंसेवक ‘फास्ट लिटर’ नावाच्या अभियानासह या लढाईच्या आघाडीवर आहेत. हे एक अभियान आहे, ज्याचे नाव लोकांनी ग्रामीण भागात, विशेषतः चालत्या कारमधून खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे पॅकेजिंग फेकण्याच्या प्रवृत्तीवरून ठेवले आहे.ग्लूस्टरशायर विद्यापीठाचे सायबर तज्ज्ञ आणि स्ट्राउड डिस्ट्रिक्ट कौन्सिलच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून या टीमने सामान्यतः दुर्लक्षित राहिलेल्या या समस्येला ‘फास्ट लिटर’ नाव दिले आहे. आता ते पहिला डेटा सेट गोळा करत आहेत, जेणेकरून कचऱ्याची समस्या किती व्यापक झाली आहे हे समजेल. यामुळे हा कचरा निर्माण करणारे आणि तो फेकला जाणारे हॉटस्पॉट ओळखले जातील. यामुळे भविष्यात या वॉरियर्सना कारवाई करण्यास आणि टार्गेटेड अँटी-लिटर कँपेन राबवण्यास मदत मिळेल. पुढील महिन्यात येणारे एआय वॉवर्ड ॲप आता नव्याने समोर येणाऱ्या ग्राहक वर्तणुकीवर लक्ष केंद्रित करत आहे, जे कारमध्ये बसून खाणे आणि कचरा कुठेही किंवा ग्रामीण भागात फेकण्याशी संबंधित आहे.या वॉरियर्सचे मानणे आहे की, एआयच्या मदतीने कचऱ्याची अशी मोजदाद मॅकडोनाल्ड्स आणि कोस्टा कॉफीसारख्या कंपन्यांवर स्वच्छतेचा खर्च उचलण्यासाठी दबाव टाकण्यास मदत करेल. सायबर सुरक्षेचे सीनियर लेक्चरर आणि या प्रोजेक्टचे प्रमुख अन्वेषक रिचर्ड कुक यांनी गेल्या वर्षाच्या ताळेबंदाचा हवाला देत सांगितले की, फास्ट फूड हा सर्वाधिक नफा देणारा व्यवसाय आहे आणि ब्रिटनमध्ये मॅकडोनाल्ड्सचा ऑपरेटिंग प्रॉफिट ११ दशलक्ष पौंडांवरून ७६ दशलक्ष पौंडांपर्यंत वाढला होता. एआयच्या मदतीने त्यांनी अशी बारीक माहितीही शोधली आहे, जी सहसा दुर्लक्षित केली जाते. उदाहरणार्थ, या रेस्टॉरंटच्या इन-स्टोअर डायनिंग सुविधेच्या तुलनेत त्यांच्या ड्राइव्ह-थ्रू आउटलेट्समुळे रस्त्यांवर कचरा कसा वाढत जातो. एकूण २,६८० ड्राइव्ह-थ्रू पैकी १,०८० एकट्या मॅकडोनाल्ड्सचे आहेत आणि कोस्टा कॉफी तसेच स्टारबक्सही हळूहळू वाढत आहेत. एआयमुळे उघड झाले आहे की, हा कचरा माती आणि संपूर्ण इकोसिस्टिममध्ये कसा मिसळत आहे. डेटा सेट वाढण्यासोबतच एआय टूल केवळ लिटर हॉटस्पॉट्सचा अंदाजच लावणार नाही, तर काही विशिष्ट भागात परवानगी देण्यापूर्वी नागरी संस्थांनाही विचार करण्यास मदत करेल. कुक यांच्या मते, जिथे कचऱ्याचा प्रश्न आहे, तिथे कुणीही याबद्दल अनेक लढाया लढू शकतो. त्यांना आशा आहे की, त्यांचा हा प्रोजेक्ट अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध नक्कीच यशस्वी होईल, ज्या स्वतः नफा कमवतात आणि स्वच्छतेची जबाबदारी नागरी संस्थांवर ढकलतात. हे लिटर वॉरियर्स मानतात की, फूड-ऑन-द-गो व्यवसायासाठी एक ‘व्हॉलंटरी कोड ऑफ प्रॅक्टिस’ लागू केली पाहिजे, ज्यामध्ये आउटलेट्सवर अँटी-लिटर साइनेज, परिसराच्या आसपास दररोज कचरा उचलण्याची सक्ती, जनजागृती आणि कठोर कारवाईच्या तरतुदी असल्या पाहिजेत. खरे तर, मी स्वतःही एक प्रोजेक्ट केला होता की मॅकडोनाल्ड्सने केवळ अमेरिकेतच नाही, तर मुंबईत १९९९-२००० मध्ये त्यांचे आउटलेट उघडल्यानंतर आसपासची सफाई कशी केली होती. जेव्हा मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री कव्हर करत होतो, तेव्हा ते सर्वात जबाबदार फास्ट फूड आउटलेट्सपैकी एक होते.


Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:यशस्वी होण्यासाठी लीडर, पालक आणि शिक्षक – हे सर्व एका टेलरकडून शिका!


This post was originally published on this site.


Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:यशस्वी होण्यासाठी लीडर, पालक आणि शिक्षक – हे सर्व एका टेलरकडून शिका!


This post was originally published on this site.


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:धर्माला योगाशी जोडावे लागेल,‎या युगात ते अत्यंत गरजेचे‎


This post was originally published on this site.


Continue Reading