उमाताईंनी मराठीत अनुवादित केलेल्या कन्नड साहित्यापैकी बहुतेक वेळा भैरप्पा, शिवराम कारंत किंवा गिरीश कार्नाड यांचे साहित्य वाचले जाते. ‘के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी’ या गुणी लेखकाचे साहित्य मात्र त्यामानाने कमी वाचले गेले. चौकटीबाहेरचे वाचनही व्हावे या उद्देशाने पूर्णचंद्र तेजस्वी या डाव्या चळवळीतील लेखकाचे ‘चिदंबर रहस्य’ हे साहित्य अकादमी पुरस्कार (१९८७) प्राप्त पुस्तक वाचले. गर्दी, गजबज, गोंगाट यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात रमणाऱ्या लेखकाच्या नावावर कर्नाटकात मलेनाडजवळ कॅाफी आणि वेलदोड्याच्या कित्येक एकारांच्या इस्टेटी होत्या. ‘कार्व्हालो’ ही त्यांची मराठीत अनुवादित झालेली व गाजलेली पहिली साहित्यकृती. कन्नड महाकवी कुवेंपू यांचे ते सुपुत्र होते. २००७ साली पूर्णचंद्र तेजस्वी निवर्तले. वेलदोड्याच्या उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्यात लक्षणीय घट झाल्याचे लक्षात आल्यानंतर तोवर निद्रिस्त असलेल्या सरकारला जाग येते. वेलदोड्याच्या घटलेल्या उत्पादनाची कारणे शोधण्यासाठी, तसेच ‘वेलदोडा संशोधन केंद्रा’चे प्रमुख जोगीहाळ यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करण्यासाठी श्यामनंदन अंगडी नावाच्या इंटेलिजन्स ॲाफिसरची केसरूर या गावात नियुक्ती केली जाते. या कामात त्याला जयराम नावाच्या लेखकाच्या कल्पनाशक्तीची बरीच मदत होते. तसेच संशोधन केंद्रातील इतर कर्मचारी, केसरूरच्या ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक रामचंद्र यांचीही त्याला साथ मिळते. प्राध्यापक रामचंद्र विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत आणि अडीअडचणीला विद्यार्थी त्यांच्याकडे विनासंकोच धाव घेतात. बंडखोरी इथल्या विद्यार्थ्यांच्या रक्तातच आहे आणि ते त्यांच्या प्राचार्यांनाही जुमानत नाहीत. मुलींबद्दल त्यांना ओढ वाटते, पण मुली समोर असल्या की मग यांची तंतरते, असा तो काळ. ब्राह्मण, लिंगायत, वोक्कलिग, गोसावी, हरिजन अशा अनेक जाती आणि त्यांच्या अनेक कहाण्या परस्परांच्या चष्म्यातून पाहायला मिळतात. ‘आम्ही जात सोडून दिली आहे’ हे उच्चारवाने सांगत फिरणारे क्रांतिकारक मित्र हातघाईच्या प्रसंगात परस्परांना जातीवाचक शिवीगाळ करतात, तेव्हा जातीची मुळे समाजात किती खोलवर रुजली आहेत, हे लक्षात येते. हिंदू समाजाला एक करण्यापेक्षा त्यांच्यात विभाजनाचे बीज कालवणे किती सहजपणे शक्य आहे, अशा आशयाचा संवाद येतो तो अतिशय प्रत्ययकारी आहे. मुसलमान समाजाने केलेली अतिक्रमणे आणि बांधकामे, पद्धतशीरपणे घडवून आणलेली लोकसंख्यावाढ आणि गुंडगिरीच्या जोरावर चालवलेली शिरजोरी, त्याकडे आत्ममग्न हिंदूंचा कानाडोळा याकडेही पुस्तक लक्ष वेधते. सुलेमान बेरी आणि त्याचे चेलेचपाटे उघडपणे खलनायकी भूमिकेत असतानाही लेखकाने रामाचारी यांचा कावेबाजपणा अधिक गडदपणे ठसवला आहे, हे जाणवते. गंभीर विषय, उपहासगर्भ शैली व नर्मविनोदी फोडणीच्या जोडीने मांडल्याने वाचकांना खेळकरपणा जाणवत राहतो. इंग्लिशगौडा, रफी, जयंती, संशोधन केंद्रातील संचालक पाटील, कृष्णेगौडा, बाबू गोसावी, जादूगार मुत्तू व अन्य बहुतेक पात्रांच्या वाट्याला सशक्त भूमिका आली आहे. विविध पात्रांकडून गावपातळीवरील गलिच्छ राजकारणाला असणारे अनेक सूक्ष्म पदर अलगदपणे उलगडत जातात. सरतेशेवटी या राजकारणाची परिणती धार्मिक हिंसाचारात होते, ही अन्यथा वास्तवात घडणारी कथावस्तू पुस्तकात वाचणे जड जाते. पुस्तकाची गोष्ट मोबाइल, इंटरनेट, टीव्ही किंवा संपर्काची अत्याधुनिक साधने असणाऱ्या काळातली नाही. ती ज्या काळात लिहिली गेली, त्यापेक्षा आज निसर्गाचा ऱ्हासही कितीतरी पटीने जास्त झाला, होत आहे आणि जातीय द्वेषही वाढला आहे. तरीही कथानकाच्या मूळ गाभ्याचा संदर्भ टिकून आहे, ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. वेलदोड्याचे उत्पादन नेमके का कमी होते?, त्यामागे नैसर्गिक वातावरणातील चढउतार कारणीभूत असतात, की कोणते षडयंत्र असते?, उत्पादन वाढवण्याचा कोणता उपाय जोगीहाळांना ठाऊक असतो?, जोगीहाळांचा खरोखरच मृत्यू झाला असतो का?, कृष्णेगौडाच्या घरावर दगडं टाकणारे ‘भूत’ कोण असते?, यातील चिदंबर रहस्य नेमके कोणते? अशा अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी हे पुस्तक मुळातून वाचणेच श्रेयस्कर ठरेल. त्यांची उत्तरे देणं म्हणजे स्पॅायलर ठरेल. तामिळनाडूतील ‘चिदंबर नटराज मंदिरा’त गर्भगृहातील सोन्याच्या बिल्वपत्रांच्या पडद्यामागे नटराजाची कोणतीही मूर्ती नाही, तिथे नटराज निराकार रूपात (अंबर - आकाश) आहे, असे मानले जाते. मायेचा पडदा दूर झाल्यावरच, चेतनेला (चिद्) निराकार (अंबर -आकाश) रूपातील ईश्वराचे रहस्य समजते, असा प्रतीकात्मक अर्थ येथे अभिप्रेत आहे. पुस्तक वाचताना, वेगवेगळे तर्क बांधताना, शेवटाकडे पोहोचल्यावरच शीर्षकाचा उलगडा होतो. कर्नाटकच्या चिकमंगलूर जिल्ह्यात केसरूर नावाच्या एका काल्पनिक गावात घडलेले हे कथानक भारताच्या कोणत्याही गावात सहजच घडू शकेल, इतके सार्वत्रिक अपिल त्यात आहे. तात्कालीक कारणे आणि फायद्यांसाठी फारसा विचार न करता बिनदिक्कत विधीनिषेधशून्यतेने निसर्गाला ज्ञात-अज्ञातपणे वेठीला धरणारी माणसाची प्रवृत्ती, निसर्गासह आत्मविनाशाला कारणीभूत गुन्हेगारी वृत्ती, सरकारी संशोधन केंद्रांतील अनागोंदी, त्याबद्दलची सरकारी अनास्था, भ्रष्टाचारी यंत्रणा, मनुष्यमात्रांची दांभिकता आणि भाबडेपणा, जातीय विद्वेष आणि धार्मिक उन्माद या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर कथानक पुढे सरकत जाते. ‘कांतारा’, ‘दशावतार’ यांसारख्या सिनेमांना डोक्यावर घेणाऱ्या प्रेकक्षांना आवडेल असे हे गूढरम्य पुस्तक.
ते वाचकाला अंतर्मुख करते आणि तत्त्वचिंतनाच्या पातळीवर विचार करण्यास प्रवृत्त करते. शेवटच्या प्रसंगातील दोघांनाच असे दृश्य दिसू शकते, जे इतर कोणाला दिसू शकत नाही; पण त्याकरता त्यांना अनेक खस्ता खाऊन, चढण चढून जावे लागते या सूचक रूपकाचा अफलातून दाखला देण्यात आला आहे. माणसाच्या आकलनाला असणाऱ्या मर्यादांसाठी केलेला चिदंबराच्या उपमेचा वापर अप्रतिम आहे. साचेबद्ध पद्धतीने ठरलेल्या पठडीतील शेवट न करता तो वाचकांच्या विचारशक्तीला आवाहन करतो, हे महत्त्वाचे. वाचकांना सुरुवातीपासून खिळवून ठेवण्याची किमया साधताना शेवटाकडे येताना पुस्तक जी उंची गाठते, त्याने ते जास्त प्रभावी होते. वास्तविक आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब साहित्यात पाहताना वाचाकाला हसू आले, बुचकळ्यात पडले, उत्सुकता ताणली गेली, विचार करण्यास भाग पडले, अस्वस्थ वाटले, तर ती साहित्यकृती यशस्वी मानावी, असा साधारण संकेत आहे. ‘चिदंबर रहस्य’ हे सगळे अनुभव वाचकांना सहजपणे देते. लेखक - के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी मराठी अनुवाद - उमा वि. कुलकर्णी प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस मूल्य - ₹ 195 /- पृष्ठसंख्या - 196 संबंधित वृत्त बुक रिव्ह्यू:'काजवा' म्हणजे अंधाऱ्या रात्री स्वतःच्या प्रकाशात वाट शोधणारा बेमालूम संघर्षमय प्रवास! बुक रिव्ह्यू:'पुस्तके साद आणि दाद'मध्ये मुखापासून उगमाकडे जाणारा प्रवास; मूळ साहित्यकृती वाचायला येतो हुरूप! 'वसुंधरेचे शोधयात्री':साहसी दर्यावर्दींचा चित्तथरारक इतिहास मांडणारे लेखक डॉ. अनुराग लव्हेकर यांची मुलाखत, ऐका आणि पाहा VIDEO https://link.divyamarathi.com/lHdELfz6JPb
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




