पुणे - पुण्याहून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची गती वाढण्यास प्रवाशांना किमान एक वर्ष तरी वाट पाहावी लागणार आहे. कारण, लोणावळा-पुणे लोहमार्गावरील ओव्हरहेड वायरच्या खांबाला एटीडी (ऑटोमेटेड टेन्शन डिव्हाइस) लावण्याचे काम सुरू झाले असून ते पूर्ण होण्यासाठी वर्षाचा कालावधी लागणार आहे. हे काम जोपर्यंत पूर्ण होणार नाही, तोपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस लोणावळा ते पुणे सेक्शनमध्ये ताशी ११० किलोमीटर वेगानेच धावेल.
मुंबई-पुणे-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या गाडीचा वेग ११० किमी प्रति तास आहे. या गाडीची धावण्याची क्षमता ताशी १६० किमीची आहे. मात्र पुणे विभागात अपुरे असलेले ‘एटीडी’चे काम तसेच ट्रॅक अपग्रेड होऊनदेखील परवानगी नसल्याने अद्याप वंदे भारत एक्स्प्रेस ताशी ११० किमी वेगानेच धावणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत आहे. मात्र त्यांच्या प्रवासाच्या वेळेत फारशी बचत होत नाही. ताशी १३० किमी वेगाने धावल्यास प्रवासाचा वेळ निश्चितच कमी होणार आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘ओएचई’साठी मेटलच्या वायरचा वापर केला जातो. उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर या वायर प्रसरण पावतात. तर हिवाळ्यात थंडीमुळे आकसले जातात. वायरचे प्रसारण झाले तर पेंटोग्राफ तुटण्याची शक्यता अधिक असते. जर वायर आक्रसली तर ती तुटण्याची भीती असते. हे सर्व टाळण्यासाठी रेल्वे मास्टच्या दोन्ही बाजूला ‘टेन्शन’ म्हणजे ११०० किलोचे वजन लटकून ठेवते. यामुळे उन्हाळा व हिवाळा या दोन्ही स्थितीत वायरला कोणताच धोका निर्माण होत नाही. पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वेने हेच ‘टेन्शन’ न ठेवल्याने पुणे रेल्वेला आता ‘टेन्शन’ आले आहे.
‘ओएचई’च्या कॅटनरी व कॉन्टॅक्ट वायर या सरळ व ताट राहण्यासाठी ‘टेन्शन’ दिले जाते. यासाठी पोलच्या दोन्ही बाजूला ६६५ किलो वजनाचे काउंटर वेट (मेटलचे प्लेट) ठेवण्यात येते. यासह पुलाचा देखील वापर होतो. प्लेट व पुली मिळून एका बाजूला ११०० किलोचे वजन तयार होते. दोन्ही बाजूला २२०० किलोचे वजन निर्माण झाल्याने ओव्हरहेड वायर सरळ व ताट राहण्यास मदत होते. परिणामी, पेंटोग्राफ सुरक्षित राहून गाडीची गती वाढण्यास मदत होते.
पुणे-लोणावळा दरम्यान ऑटोमेटेड टेन्शन डिव्हाईस बसविण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम पूर्ण होताच रेल्वे ताशी १३० किमी वेगाने धावेल. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे
‘वंदे भारत’चे स्पीड ब्रेकर....
-
मुंबई ते सोलापूर ४५३ किमीचा मार्ग आहे. यात मुंबई विभागात सुमारे १०० किमीचा मार्ग हा उपनगरीय आहे. या भागात लोकलची संख्या जास्त आहे. दर दोन मिनिटांनी लोकल धावते.
-
कर्जत ते लोणावळा हा २८ किमीचा घाट सेक्शन आहे. यात रेल्वेची गती कमालीची कमी होती. गाडी ५५ किमीने धावते.
-
लोणावळा ते पुणे दरम्यान ‘ओव्हरहेड’ वायरच्या खांबाला टेन्शन नाही.
-
पुणे ते दौंडदरम्यान ट्रॅक अपग्रेड; मात्र अद्याप परवानगी नाही.
-
दौंड ते सोलापूरदरम्यान ट्रॅक अपग्रेडचे काम सुरू. पूर्ण होण्यास काही दिवसांचा अवधी लागणार.
रेल्वेचे दुर्लक्ष; प्रवाशांना फटका
पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या विद्युतीकरणानंतर २००८ मध्ये ओएचईचे (ओव्हरहेड) डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेट करंट) मध्ये रूपांतर झाले. मात्र, ते काम अपुरे झाले. त्या वेळी विद्युतीकरणाच्या खांबाला (पोल) एटीडी (ऑटोमेटेड टेन्शन डिव्हाईस) जोडणे आवश्यक होते. मात्र रेल्वेने त्यावेळी दुर्लक्ष केले. त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. एटीडी नसल्याने रेल्वेचा वेग वाढविला जात नाही. ‘ओएचई’च्या कॅटनरी व कॉन्टॅक्ट वायरला जोडून ठेवणारे ‘टेन्शन’ नाही. आता पुणे रेल्वे प्रशासन खांबाला टेन्शन लावण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यास अजूनही वर्ष लागण्याची शक्यता आहे.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं