UPSC Result : यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली

UPSC CSE Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. इशिता किशोरने परीक्षेत ऑल इंडिया प्रथम रँक मिळवला आहे. तिच्या पाठोपाठ गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर लॉग इन करून निकाल तपासता येईल. आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती.

इशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली आहे. यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा पाहायला मिळतोय. वसंत दाभोळकरने ७६ वा क्रमांक, प्रतिक जराड १२२ वा क्रमांक, जान्हवी साठे १२७ वा क्रमांक, गौरव कायंदे-पाटील १४६ वा क्रमांक तर ऋषिकेश शिंदे १८३ वा क्रमांक, अमर राऊत २७७ वा क्रमांक, अभिषेक दुधाळ २७८ वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे २८१ वा क्रमांक, स्वप्नील पवारने २८७ वा क्रमांक, अनिकेत हिरडेने ३४९ वा क्रमांक पटकावला आहे.

UPSC CSE Result: असा पाहा निकाल

निकाल पाहण्यासाठी, सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in आणि upsconline.nic.in ला भेट द्या. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि होमपेजवर उपलब्ध असलेल्या “UPSC सिव्हिल सर्व्हिसेस रिझल्ट २०२२” वर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर UPSC निकाल २०२२ ची PDF दिसेल.
यात निवड झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची यादी पाहता येईल.
रोल नंबर शोधण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट "Ctrl+F" वापरा. जर उमेदवाराचा रोल नंबर यादीत असेल तर तो/ती पात्र असणे आवश्यक आहे. यानंतर निकालाची प्रिंट आउट डाउनलोड करता येईल.

निवड झालेल्या टॉप १० उमेदवारांची यादी

१) इशिता किशोर
२) गरिमा लोहिया
३) उमा हरति एन
४) स्मृति मिश्रा
५) मयूर हजारिका
६) गहना नव्या जेम्स
७) वसीम अहमद
८) अनिरुद्ध यादव
९) कनिका गोयल
१०) राहुल श्रीवास्तव

UPSC मार्किंग योजना

उत्तीर्ण होण्यासाठी यूपीएससीची प्राथमिक परीक्षा आवश्यक आहे. एकूण १७५० गुणांची लेखी परीक्षा असते. UPSC CSE लेखी परीक्षा (मुख्य) परीक्षेत एकूण ९ पेपर असतात परंतु त्यापैकी केवळ ७ पेपर्समध्ये मिळालेले गुण अंतिम गुणवत्ता क्रमवारीत समाविष्ट केले जातात. एकूण २५० गुणांचे ७ पेपर आहेत. ज्याच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते (UPSC मार्किंग स्कीम). आयएएस मुलाखत २७५ गुणांची दिल्लीतील UPSC कार्यालयात घेतली जाते



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply