पुणे : बकाल, गचाळ, बजबजपुरी हे शब्द रामटेकडीने आता आठ वर्षांपूर्वीच मागे टाकले. प्रातःविधीसाठी उघड्यावर बसण्याची सवय गेल्या वीस-बावीस वर्षांमध्ये बदलली. ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’च्या (एसआरए) योजना राबविल्याने रामटेकडीचा चेहरा-मोहरा बदलला; पण, बेसुमार वृक्षतोड आणि टेकडीवरची अतिक्रमणे या दोन्ही आघाड्यांवर ही टेकडी झगडत असल्याचे दिसते.
रामटेकडी आणि त्याचा परिसर म्हणजे पत्र्याची घरे, असे समीकरण होते. पण, आता जवळपास ७० टक्के परिसर बदलला आहे. पूर्वी कचऱ्याचे कंटेनर भरून वहात होते. उघडी गटारे होती, ही स्थिती २००० पर्यंत सर्रास दिसत होती. तिथे असलेल्या खाणी जवळून तेथील लोक जीव मुठीत धरून जात होते. तेथील घरे रामटेकडीवर जात होती. त्यानंतर ‘एसआरए’ची योजना राबविल्याने या परिसर बदलला, अशी माहिती डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
२२ वर्षांपूर्वीची टेकडी कशी होती?
-
या टेकडीवर गर्द झाडी होती.
-
टेकडीवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण होते
-
कचऱ्याचे साम्राज्य होते ,दुर्गंधी होती.
-
उघड्यावरून गटारी वहात होत्या.
-
पत्र्याची घरे. त्या भोवती अस्वच्छता.
-
त्यामुळे पसरणारे साथीचे आजार होते.
-
गुन्हेगारी खूप होती
कुठे आहे रामटेकडी?
वानवडी आणि हडपसर या दोन्ही गावांमध्ये रामटेकडी आहे. त्याच्या जवळच पणेबाबाचा डोंगर आहे. रामटेकडी ही हडपसरच्या बाजूला येते. तर, पणेबाबाचा डोंगर हा वानवडीच्या हद्दीत आहे. पुणे महापालिकेत १९५२ मध्ये वानवडी, हडपसर या भाग आला.
रामटेकडीची परंपरा
रामटेकडीवर उदासीन पंथाची परंपरा आहे. तेथे रामाचे प्राचीन मंदिर आहे. तसेच, इतर देवतांचीही मंदिरे उभारण्यात आली आहे. त्यामुळे या टेकडीला रामटेकडी असे म्हटले जाते. हे नाव नेमकेकधी मिळाले याची नोंद इतिहासात सापडत नाही.
ऐतिहासिक महत्त्व
रामटेकडी परिसरातील सर्व्हेनंबर ४९च्या बाजूला पेशव्यांच्या काळापासून गारपीर आहे. पेशवे आणि इंग्रज यांच्यात लढाई झाली होती. बोटक्लबला मराठ्यांचा सैन्य आणि त्याच्या पुढे इंग्रजांच्या सैन्याचा तळ होता. त्यामुळे रामटेकडी महत्त्व आहे, अशी माहिती माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी दिली.
शुद्ध पाणी पुरवठा
रामटेकडीवर पिण्याचे पाणी आल्याने वानवडी, हडपसर, कोंढवा, मुंढवा, खराडी येथे शुद्ध पाणीपुरवठा करता आला. त्यामुळे या भागात मोठे प्रकल्प साकारले. आता पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केले पाहिजे. त्यासाठी महापालिकेने नियंत्रण असायला हवे, अशी अपेक्षा शिवरकर यांनी व्यक्त केली.
सद्यःस्थिती काय आहे?
टेकडीच्या माथ्यावर मोठी झाडे आहेत. तेथे बेसुमार वृक्षतोड नियमित सुरू असते. टेकडीच्या काही भागावर अतिक्रमण झाल्याच्या खुणा आहेत. या अतिक्रमण वाढण्यापूर्वीच त्यावर कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करतात.
कसा झाला बदल?
या परिसरात ‘एसआरए’ची योजना राबविली. मैलापाणी वाहून देण्याची वाहिनी टाकण्यात आली. टेकडीवर वाढत जाणाऱ्या झोपडपट्ट्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यातून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्यास सुरुवात झाली. हडपसरमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले. रस्ते चांगले झाले. त्यामुळे या भागाचा विकास झाला.
या भागात पन्नास वर्षांपासून राहणारे तात्याबा ठोंबरे म्हणाले, ‘‘येथील लोक पूर्वी उघड्यावर शैचाला बसायचे आता महापालिकेने स्वच्छता गृहे बांधली आहेत. ती स्वच्छ ठेवली जातात. त्यामुळे या भागातील पुढची पिढी उघड्यावर शैलाचा जात नाही.’’ गणपत कोकरे म्हणाले, ‘‘या भाग कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढलेला होता. कचऱ्याचे कंटेनर सगळी दिसत होते. त्यातून दुर्गंधी पसरत होती. आता हा भाग कचऱ्याचा कंटेनरमुक्त झाला आहे.’’
शहर
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Sangram Thopate : पुण्यात काँग्रेसला खिंडार! संग्राम थोपटे आज शेकडो कार्यकर्त्यांसह 'कमळ' हाती घेणार
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
महाराष्ट्र
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
- Ajit Pawar: रिक्षात पुरुषाला बसवलं तर आधी फोटो काढा; अजितदादांचा बहिणांना मोलाचा सल्ला
- Ashwini Bidre Case : मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
- RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर; रायगड जिल्ह्यात पालकांनी जोडले बोगस पुरावे
गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Tragic Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
- Waqf amendment bill : नवा कायदा लागू, राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?