पुणे : तब्बल 12 हेक्टर परिसरात केलेले लाखो घनमीटर कचऱ्याचे केलेले क्यापिंग, त्यावरच उभारलेलेले हिरवेगार "अमृतवन', खाणीवरील कॉंक्रीटीकरण, साठलेल्या कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया (बायोमायनींग), त्याद्वारे खतनिर्मिती, मिथेन निर्मिती एवढेच काय, काही प्रमाणात होणारी वीज निर्मिती अशा टप्प्याटप्प्याने उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो प्रकल्प आता पर्यावरण पुरक होऊ लागला आहे.
दुर्गंधीमुक्त, देशी वृक्षांच्या हिरवाईने बहारलेला हा परिसर विद्यार्थी, अभ्यासकांसाठी "वेस्ट मॅनेजमेंट टुरीझम' करण्याच्या दिशेने महत्वपुर्ण पाऊल टाकत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्यावतीने उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत, कार्यकारी अभियंता सुधीर चव्हाण, उपअभियंता राजेंद्र तिडके, अभियंता संकेत जाधव यावेळी उपस्थित होते. खेमनार यांच्यासह राऊत, चव्हाण व तिडके व जाधव यांनी प्रकल्पातील विविध कामांची व टप्प्यांची माहिती दिली.
महापालिकेच्या हद्दीतील निर्माण होणाऱ्या कचरा उघड्यावर न टाकता त्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभुमीवर महापालिकेकडून शहरात गोळा होणाऱ्या 2200 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहे. दरम्यान, वेळोवेळी नागरीकांचे होणारे आंदोलन,
आगीच्या घटनांमुळे देवाची उरुळी - फुरसुंगी कचरा डेपो येथे उघड्यावर कचरा टाकण्याचे महापालिकेकडून बंद करण्यात आले. तसेच मागील दोन वर्षांपासून भुमी ग्रीन या संस्थेकडून साठलेल्या कचऱ्याचे बायोमायनींग करुन 21 एकर जागा रिकामी करण्यात आली. डिसेंबर महिन्यापर्यंत 20 लाख मेट्रीक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ.खेमनार यांनी सांगितले.
माती, पाणी, वायु प्रदूषण मुक्तीकडे वाटचाल !
उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो येथील कचऱ्यामुळे होणारे माती व पाणी दुषीत होण्यापासून रोखण्यासाठी कचरा डेपोच्या जागेत शास्त्रीय भु-भराव (एसएलएफ) टाकण्यात आला. कचऱ्यातील रसायन माती, पाण्यात मिसळू नये, यासाठी प्लॅस्टिकचा वापर करुन एसएलएफ तयार करण्यात आले. त्यावर एकीकडे वाहिन्यांद्वारे रसायन एका ठिकाणी जमा होऊन त्यापासून होणारी मिथेन गॅस हवेत नष्ट केला जात आहे.
दुसरीकडे त्यावर उभारलेल्या हलक्या झाडांमुळे हा परिसर हिरवागार दिसू लागला. त्याचबरोबर प्रकल्पाच्या ठिकाणी साठलेल्या कचऱ्यातुन (बायोमायनींग) विघटनशील व अविघटनशील कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यातील विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीवर भर दिला जात आहे. तर प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील कचरा साठवून तो सिमेंट कारखान्यांना इंधन म्हणून पुरविला जातो.
परिणामी विघटनशील व अविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे होते. पहिल्या टप्प्यात 1 हजार मेट्रीक टन क्षमतेने बायोमायनींग करण्यात आली आहे. तर तीन वर्षात 11.76 लक्ष मीटर टन कचऱ्यावर बायोमायनींग करुन 21 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या टप्प्यांमुळे परिसरातील माती, पाण्याचे प्रदूषण थांबले, याबरोबरच डेपोला आग लागण्याच्या घटना कमी होऊन हवेतील प्रदूषणही कमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कचरा डेपोच्या ठिकाणची वैशिष्ट्ये
- 200 मेट्रीक टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया
- कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मितीला प्राधान्य
- शेतकऱ्यांना नाममात्र दरात खताची विक्री
- सौर उर्जा प्रकल्पाद्वारे 100 किलो वॅट वीज निर्मिती, डेपोच्या परिसरात विजेचा वापर
- "अमृतवन' अंतर्गत देशी प्रजातीची तब्बल 16 हजार झाडांची लागवड
- 15 ते 20 फुटापर्यंत झाडांची वाढ
शहर
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
- Pune : पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारील लाकडी वाड्याला भीषण आग
- Pahalgam Terror Attack : मुलीच्या डोळ्यासमोर बापाचा जीव घेतला, पुण्यातील दोघांना दहशतवाद्यांनी मारले
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
महाराष्ट्र
- Pahalgam Terror Attack : सिंधू पाणी करार थांबवला, अटारी-वाघा बॉर्डर बंद; भारताचा पाकिस्तानवर 'कायदेशीर स्ट्राइक', सरकारने घेतले ५ मोठे निर्णय
- Akola News: भाजप आमदाराला शिव्या देणं भोवलं, अकोल्यात पोलीस निरीक्षकावर मोठी कारवाई
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
- Ajit Pawar: रिक्षात पुरुषाला बसवलं तर आधी फोटो काढा; अजितदादांचा बहिणांना मोलाचा सल्ला
गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pahalgam Terror Hits Tourism : दहशतवादी हल्ल्याचा फटका पर्यटनाला; विमानाच्या तिकीट दरात घसरण, पण श्रीनगरहून परतीचा प्रवास महाग
- Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली
- Pahalgam Terror Attack : मुलीच्या डोळ्यासमोर बापाचा जीव घेतला, पुण्यातील दोघांना दहशतवाद्यांनी मारले
- Jammu and Kashmir : काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी; देशभरात संतापाची लाट