Pune : यंदाच्या गणेशोत्सवात आवाजाने कमाल मर्यादा गाठली असून, सर्वत्र ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठा आवाज सतत कानावर पडल्याने बहिरेपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही जणांना तात्पुरत्या स्वरूपात हा त्रास जाणवत असून, काहींना दीर्घकालीन समस्या निर्माण होत आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणात वाढ होते. डॉल्बीसह ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशा पथकांचे मोठे आवाज सातत्याने नागरिकांच्या कानावर पडतात. मोठा आवाज सतत कानावर पडण्याचे कोणतेही फायदे नसले तरी दुष्परिणाम अनेक आहेत. सतत मोठा आवाज कानावर पडल्यास एका अथवा दोन्ही कानाने ऐकू न येण्याचा त्रास सुरू होतो. अशा रुग्णांची संख्या सध्या शहरात वाढल्याचे चित्र आहे.
याबाबत आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. वैशाली बाफना म्हणाल्या की, कोणताही मोठा आवाज कानावर पडल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. सतत मोठा आवाज कानावर पडल्याने एकाग्रता कमी होणे, डोकेदुखी, तणाव अशा समस्या निर्माण होतात. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हातातून घरात अथवा बाहेर अपघात घडू शकतात. ढोल-ताशा अथवा फटाक्यांचा मोठा आवाज अचानक कानावर पडल्यास कर्णपटलाला छिद्र पडू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास यातून कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याचा धोका निर्माण होतो. रुग्णाने वेळेत उपचार घेतल्यास हा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.
याबाबत कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अभिजीत मंत्री म्हणाले की, मोठा आवाज कानावर पडल्यानंतर शरीरावर अनेक परिणाम होतात. त्यात छातीत धडधड वाढणे, तणाव अशा तक्रारी वाढतात. याचबरोबर ऐकू येणे बंद होते. अनेक रुग्ण हा त्रास तात्पुरत्या स्वरूपाचा असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. उपचाराला उशीर झाल्याने त्यांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतो. त्यांना पुढील आयुष्य कर्णयंत्र लावून काढावे लागते. यामुळे बहिरेपणाचा त्रास होऊ लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बहिरेपणाचा सर्वाधिक धोका कोणाला?
- ढोल-ताशा, डॉल्बी, डीजे अथवा ध्वनिवर्धकाच्या सातत्याने संपर्कात असलेल्या व्यक्ती.
- सतत मोठा आवाज कानावर पडणारे औद्योगिक कामगार.
- ईयरफोनचा सातत्याने वापर करणारे व्यक्ती.
काळजी काय घ्यावी?
- डीजे, ढोल-ताशा यांच्या आवाजात सातत्याने राहू नका.
- मोठा आवाज कानावर पडणार असेल तर कानात ईयरप्लग अथवा कापसाचा बोळा घाला.
- हेडफोन अथवा ईयरफोनचा वापर मर्यादित करा.
- हेडफोन अथवा ईयरफोन वापरापासून दर तासाला किमान ५ मिनिटांची विश्रांती घ्या.
- गॅझेटवर आवाजाची पातळी नेहमी किमान ठेवा.
-
स्पिकरच्या भिंतीमुळे कानाला यंत्र
स्पिकरच्या भिंती उभारण्याचा व्यवसाय करणारा व्यावसायिकाला कायमचा बहिरेपणा आल्याचे उदाहरण डॉ. अभिजीत मंत्री यांनी दिले. ते म्हणाले की, माझ्याकडे बहिरेपणाची तक्रार घेऊन एक ४० ते ४५ वर्षीय रुग्ण आला होता. त्याचा स्पिकरच्या भिंती उभारण्याचा व्यवसाय होता. त्याला समस्या सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी तो माझ्याकडे आला होता. उपचारास विलंब झाल्याने त्याला कायमस्वरूपी बहिरेपणा आला. कानाला यंत्र लावून त्याला आता ऐकावे लागत आहे. त्यामुळे त्याने हा व्यवसाय बंद केला आहे.
शहर
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Sangram Thopate : पुण्यात काँग्रेसला खिंडार! संग्राम थोपटे आज शेकडो कार्यकर्त्यांसह 'कमळ' हाती घेणार
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
महाराष्ट्र
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
- Ajit Pawar: रिक्षात पुरुषाला बसवलं तर आधी फोटो काढा; अजितदादांचा बहिणांना मोलाचा सल्ला
- Ashwini Bidre Case : मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
- RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर; रायगड जिल्ह्यात पालकांनी जोडले बोगस पुरावे
गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Tragic Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
- Waqf amendment bill : नवा कायदा लागू, राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?