
Mumbai Pollution : एकीकडे मुंबईचा प्रदूषण वाढतंय तर दुसरीकडे पूर्व उपनगरात कांजुरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सगळ्या विरोधात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पर्यावरणवाद्यांनी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दिवसाला जवळपास 5 हजार मेट्रिक टन इतका कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये येतोय आणि त्यामुळे विक्रोळीपासून ते मुलुंडपर्यंत (Mulund) प्रदूषण तर वाढलेच शिवाय या संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी मागील अनेक दिवसांपासून पसरलेली पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणाहून प्रवास करताना कारची काच खाली करून प्रवास करावा अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
106 हेक्टर परिसरात हे कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड पसरलेला आहे. आजूबाजूला कांदळवन, पूर्व द्रुतगती मार्ग आणि लगतच विक्रोळी भांडुप कांजूरमार्ग नाहूरचा रहिवासी भाग आहे. रोज या डम्पिंग ग्राउंडमध्ये मुंबईतील 5000 मॅट्रिक टनपेक्षा अधिक कचरा टाकला जात आहे. या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट बायोरिऍक्टर पद्धतीने केली जात असताना ओला आणि सुका कचरा याचं कुठलंही वर्गीकरण केलं जात नसल्याचं पर्यावरणवाद्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रदूषणांविरोधात तातडीने ॲक्शन मोडमध्ये काम करण्यात यावं यासाठी पर्यावरणवाद्यांनी थेट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण नाही...डम्पिंगमुळे प्रदूषणात वाढ
ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नसल्याने इथेच तो कुजतो आणि त्यामुळे दुर्गंधी सुटते शिवाय मिथेन वायूचा थर जमा होत असल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पर्यावरणवादी दयानंद स्टॅलिन यांनी म्हटले. विक्रोळीपासून ते मुलुंडपर्यंत या डम्पिंग ग्राउंडचा दुर्गंधीचा वास पसरत असल्याने सुगंधी द्रव्याची फवारणी या दुर्गंधी पासून मुक्तता व्हावी म्हणून मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. मात्र, ही फवारणी करूनसुद्धा दुर्गंधी जात नसल्याने आजारांचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे.
दुर्गंधी कशी पसरतेय हे आपण पाहतोय. मुख्यमंत्री जेव्हा ठाण्याला जातात तेव्हा त्यांनी एकदा या ठिकाणाहून जाताना आपल्या कारची काच खाली करावी आणि त्रास बघावा, अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिक मामा मांचेकर यांनी दिली.
घरांसाठी कोट्यवधी मोजले, पण दुर्गंधीने त्रास वाढवला...
या भागात राहता यावं यासाठी करोडो रुपये खर्च करून उच्चभ्रू सोसायटीमध्ये लोकांनी घर घेतली. मात्र, करोड रुपये खर्च करून सुद्धा अशा दुर्गंधीमध्ये या लोकांना राहावं लागत असल्याने वारंवार तक्रारी या स्थानिकांकडून केल्या जात आहेत. हे डम्पिंग ग्राउंड तळोजाला हलवण्याचे मध्ये योजले असताना नंतर कुठले हालचाली झाल्या नसल्याची माहिती आहे. तर अनेक लेखी तक्रार येऊन सुद्धा सुगंधी द्रव्यची फवारणी मारून या तक्रारीकडे मुंबई महापालिकेकडून काना डोळा केला जात असल्याची तक्रार आहे.
दीड ते दोन कोटी रुपयांना या चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतले मात्र ज्या प्रकारे दुर्गंधी येते ते पाहता जेवण सुद्धा जात नाही. अनेक जण आजारी आहेत प्रदूषण मुंबईची वाढले आहे तक्रारी करून सुद्धा कुठली ॲक्शन घेतली जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली.
मुंबई प्रदूषण वाढत असताना वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलीही हालचाल प्रशासनाकडून होत नसल्याने या त्रासात स्थानिकांना राहावं लागते त्यामुळे तातडीने प्रशासनाने या सगळ्याची दखल घ्यावी आणि यातून मुक्तता करावी हीच अपेक्षा आता या सर्व स्थानिकांची आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

