Mumbai : राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे ‘अर्थपूर्ण’ काम एकीकडे जोरात सुरु आहे. मात्र त्याचवेळेस ग्रामीण आरोग्याची मदार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत वाईट असून जवळपास २३३ प्राथमिक आरोग्य केंद्र एक तर मोडकळीला आली आहेत वा धोकादायक म्हणून जाहीर झालेली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पावसाळ्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गळती होत असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी वा नव्याने बांधण्यासाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केले असले तरी या योजनेला म्हणावी तशी गती मिळताना दिसत नसल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे डॉक्टरांच्या निवासांची अवस्था अत्यंत दयनीय असून त्याबाबत विचारही करण्यास आरोग्य विभागातील उच्चपदस्थ तयार नाहीत.
राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून राज्यातील सध्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्यात तसेच नवीन आरोग्य केंद्र कोठे स्थापन करण्याची गरज आहे ते निश्चित करण्यास काही महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी विभागाला सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने अहवाल तयार केला असून राज्यातील आरोग्य विभागाच्या १९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी तब्बल २३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती मोडकळीला आल्याचे वा धोकादायक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय बहुतेक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने रुग्णांवर उपचार करणे कठीण होत असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण आरोग्याचा पाया असून गावखेड्यातील रुग्णांसाठी ही आरोग्य केंद्रे मोठा आसरा असतात. बहुतेक आरोग्य केंद्रे ही अत्यंत जुनी झालेली असून नव्याने या आरोग्य केंद्रांच्या इमारतींची बांधणी करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अहवालाची प्रत ‘लोकसत्ता‘कडे आहे.
|
ठाणे जिल्ह्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे मोडकळीला आली आहेत अथवा धोकादायक स्थितीत आहेत. या सर्व केंद्रांमध्ये गळती होत असते. पालघरमध्ये सात, अमरावती येथे १२, रायगड येथे १३, पुणे येथील १० तर नागपूर येथील २६ प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांची परिस्थिती फारच दयनीय असून आरोग्य केंद्रांच्या बहुतेक इमारती या धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील २९ आरोग्य केंद्रांची पाहणीच झालेली नसल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सरासरी ५० ते १०० रुग्णांवर उपचार केले जातात. या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विस्तार व बळकटीकरण करण्याची गरज असताना त्याकडेही आजघडीला कोणी लक्ष देताना दिसत नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची दूरावस्था झाली आहे तर पावसाळ्यात आनेक आरोग्य केंद्रांमध्ये गळती होत असते, अशा परिस्थितीत रुग्ण तपासणीतही अडचणी येतात. येथे उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांच्या निवासस्थानापासून अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचेही या केंद्रांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. धोकादायक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी नवीन केंद्र युद्ध पातळीवर उभारणे आवश्यक असून आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नव्याने करण्यात आले आहे तर काही ठिकाणी बांधकाम सुरु आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था दयनीय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र त्याकडे लक्ष देणाऱ्या आरोग्य संचलनालयातील वा मंत्रालयातील उच्चपदस्थांना वेळ नसल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले. ग्रामीण भागात कोणत्या ठिकाणी वाढीव प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहे त्या दृष्टीने आरोग्यमंत्री आढावा घेत आहेत. आरोग्य सेवेचा विस्तार करण्याचाही त्यांचा मनोदय आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णालयीन दुरुस्तीसाठी वेळेवर वित्त विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जात नाही. एवढेच नव्हे तर मोडकळीला आलेल्या वा धोकादायक झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीही निधी मिळत नाही. आरोग्य विभागाला नवीन बांधकाम अथवा दुरुस्ती आदी काहीही करायाचे झाले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे करावी लागतात. यात प्रचंड दिरंगाई होत असल्यामुळे आरोग्य विभागाअंतर्गत स्वतंत्र बांधकाम कक्ष निर्माण करण्याचा प्रस्तावही आरोग्य विभागाने तयार केला होता. मात्र त्याला सरकारची मान्यता मिळताना दिसत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले मात्र याठिकाणी डॉक्टरांच्या निवासाची दूरवस्था असून त्याबाबत ठोस पावले उचलली जाताना दिसत नाही. गंभीर बाब म्हणजे आदिवासी व अतिदुर्गम भागात काम करणार्या भरारी पथकातील २८१ डॉक्टरांना राहाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. भरीरी पथकात जवळपास ४० टक्के महिला डॉक्टर असून त्यांना कधी प्रथमिक आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी तर कधी उपकेंद्रात जसे मिळेल तसे राहावे लागते असे या डॉक्टरांनी सांगितले. एकीकडे चांगली दर्जेदार प्रथमिक आरोग्य केंद्र नाहीत तर दुसरीकडे तेथे वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टरांच्या निवासाची दूरावस्था आहे. याबाबत ठोस पावले उचलण्याऐवजी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांमधील खाटा ५० ते १०० पर्यंत वाढवून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे म्हणजेच बांधकामे करत सुटण्याचे ‘अर्थपूर्ण’ कामे जोरात सुरु आहेत.
शहर
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Thane Water : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात
- Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला
महाराष्ट्र
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Corona Virus : आषाढी वारीच्या तोंडावर चिंता वाढली; माळशिरस तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण
- Beed : अवकाळीने सर्व हिरावले; शेतात सडलेल्या टमाट्यांचा लाल चिखल, शेतकऱ्याचे अश्रू अनावर
- Shocking Crime : गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण