मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यात केवळ महिला, लहान मुली, सामान्य जनताच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचे नेतेही सुरक्षित नसल्याची टीका विरोधकांनी रविवारी केली. काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. तर विरोधक केवळ राजकारण करीत असल्याचा पलटवार फडणवीस यांनी केला.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती संपूर्णत: ढासळल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्रालयाचा कारभार पाहणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. तर महायुती सरकारने आता विविध योजनांची जाहिरात करण्यापेक्षा ‘तुमची सुरक्षा तुम्ही करा, सरकार जबाबदार नाही’ असे फलक जागोजागी लावावेत, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सिद्दिकी यांच्या हत्येवरून सरकारला लक्ष्य केले. राज्याच्या राजधानीत अशा हत्या होणार असतील तर कायद्याचे राज्य आहे कुठे, असा सवाल ठाकरे यांनी केला. ‘‘सत्ताधारी पक्षाचा नेताच सुरक्षित नसेल, तर सरकार सर्वसामान्य जनतेची सुरक्षा कशी करेल,’’ असा सवाल राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
Pune : बाणेर टेकडीवर पुन्हा लूट, फिरायला आलेल्या तरुणासह मैत्रिणीला मारहाण |
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस आणि अजित पवार यांनी एका गुन्ह्याचे नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला लवकरच गजाआड करू, असे फडणवीस म्हणाले. तर या धक्कादायक घटनेचे राजकारण करण्यापासून विरोधकांनी स्वत:ला रोखावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. भाजपचे केंद्रीय नेते शहानवाज हुसेन आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनीही विरोधकांवर राजकारण करीत असल्याचा आरोप केला.
अजित पवार गटाला धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या २५ वर्षांत मुंबईत आपले अस्तित्व निर्माण करता आले नव्हते. पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांनी मुंबईत विशेष लक्ष घालत बाबा सिद्दिकी व त्यांच्या आमदार पुत्राला आपल्याकडे ओढले. यातून अल्पसंख्याकबहुल भागात पक्षाची ताकद वाढविण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न होता. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांना पक्षात विशेष महत्त्वही देण्यात आले होते. मात्र त्यांच्या हत्येमुळे पक्षाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. महिला, राजकारणी, सत्ताधारी सारेच असुरक्षित आहेत. राज्यकर्ते म्हणून काम करण्यात हे लायकीचे नाहीत. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (ठाकरे)
या घटनेमुळे आम्ही अत्यंत व्यथित आहोत. याची दाहकता पचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा केवळ राजकीय धक्का नव्हे, तर आम्हा सर्वांचे व्यक्तिगत नुकसान आहे. मात्र विरोधकांनी घटनेचे राजकारण करू नये. – अजित पवार, उपमुख्यमंत्री
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं