वाई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्या बद्दल आक्रमक झालेले खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाईची मागणी केली आहे. खासदार उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे की, छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र तर त्यांना अस्मिता मानून आपली वाटचाल करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्याची स्थापना केली. तंजावरपासून अफगाणिस्तानपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर महाराजांनी समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार आपण पुढे नेत आहोत. गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे, हे अभिमानास्पद आहे. मात्र काही व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या आस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे.
यापूर्वीही राज्यपाल कोशारी यांनी समर्थ रामदास स्वामी गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केल होते. शिवाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापुर्वी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. ही सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांचा जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वतः बदलायला तयार नाहीत. त्यांची महाराष्ट्रात अडीच वर्षे कारकिर्द होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत. २०१४ साली आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा भव्य असा पायाभरणी समारंभ केलात. इतकच नाही तर भारतीय नौदालाचा ध्वज शिवरायांना अर्पण केलात. या निर्णयाने लाखो शिवप्रेमी आनंदलेले असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र अशोभनीय वर्तन केले आहे, हे खेदाने नमूद करावे लागत आहे. या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने राज्यपाल पदावरून दूर करावे, अशी आमची मागणी आहे. आपण यांवर योग्य ती कार्यवाही कराल याची मला खात्री आहे अशा आशयाचे पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देसन्द्र फडणवीस यांनाही त्याची प्रत पाठविली आहे.राज्यपाल कोश्यारी उद्या पासून दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यामुळे उदयनराजेंच्या पत्राला महत्व आले आहे.
शहर
- Pune : कुठे आहेत ‘स्मार्ट’ प्रकल्प? स्मार्ट सिटी योजनेवर स्वयंसेवी संस्था आणि विरोधकांकडून प्रश्न
- Pune : सर्वांत महाग घरे लॉ कॉलेज रस्त्यावर, प्रतिचौरस फुटांसाठी १६ हजार ८१६ रुपये दर, कोरेगाव पार्कपेक्षा अधिक
- Mumbai : इगतपुरी-आमणे समृद्धी महामार्ग : लोकार्पणाआधीच महामार्गावरून अनधिकृतपणे वाहने धावू लागली
- Mumbai : मुंबईकरांवर कचरा शुल्काचा बोजा; १०० रुपये ते ७५०० रुपये आकारणार
महाराष्ट्र
- Ulhasnagar : खिडकीत बसलेली दोन मुले दुसऱ्या मजल्यावरून कोसळली; ग्रील तुटल्याने घडली घटना
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”